शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांचा आठव्या वर्गाला ठेंगा

By admin | Updated: July 7, 2014 23:30 IST

आरटीई अ‍ॅक्टनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याचे निर्देश आहेत. माात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या ६० शाळांमध्ये अद्यापही आठवा वर्गच सुरू करण्यात आला नाही.

प्रशासकीय दुर्लक्ष : ६० शाळांचा समावेशचंद्रपूर : आरटीई अ‍ॅक्टनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याचे निर्देश आहेत. माात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या ६० शाळांमध्ये अद्यापही आठवा वर्गच सुरू करण्यात आला नाही. परिसरातील खासगी संस्थाचालकांच्या स्वार्थासाठी मुख्याध्यापकांनी विद्यार्थी नसल्याचे कारण पुढे करून आठवा वर्ग सुरू केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या १ हजार १६३ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. या शाळांत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. ८२३ शाळांत पाचवा, तर ३१३ शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू होणार होते. या वर्गांना शिकविण्याची जबाबदारी अतिरिक्त ठेवलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकावर सोपविली जाणार होती. मात्र ६० शाळांतील मुख्याध्यापकांनी खासगी संस्थाचालकांपुढे नांगी टाकत वरिष्ठांकडे विद्यार्थी नसल्याचे कारण समोर केले आहे. ज्या शाळांत आठवा वर्ग सुरू होणार आहे. याच परिसरात खासगी संस्थांंच्या शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र अजूनही ६० शाळांमध्ये आठवा वर्ग सुरू झाले नाही. पाचव्या वर्गाचीही अशीच परिस्थिती आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्यांना खासगी शाळेत पुन्हा प्रवेश घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. हे वर्ग सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी टीसी न देण्याबाबत सांगितले होते. (शहर प्रतिनिधी)