शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

विधायक कार्यातून ‘तो’ ठरतोय युवकांसाठी दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST

चंद्रपूर : समाजात विधायक कामात सातत्यपूर्ण योगदान देऊन बदल घडवू पाहणारी मोजकी तरुणाई दिसते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील ...

चंद्रपूर : समाजात विधायक कामात सातत्यपूर्ण योगदान देऊन बदल घडवू पाहणारी मोजकी तरुणाई दिसते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील अवघ्या २३ वर्षांचा दीपक चटप यांचे नाव यामध्ये अग्रगण्य ठरत आहे. केवळ चंद्रपूरच नव्हे तर राज्य, देशपातळीवरील सार्वजनिक क्षेत्रात अभ्यासपूर्ण चळवळीतील त्याचे काम भल्याभल्यांना दिशादर्शक ठरत आहे.

मूळचा लखमापूर येथील छोट्याशा गावातून पुढे आलेल्या दीपकने पुण्यातील नामांकित आयएलएस विधि महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षणाकरिता नुकतीच त्याची लंडन येथील विद्यापीठात निवड झाली. पद्मश्री डॉ. अभय बंग याच्या मार्गदर्शनात निर्माण शिबिरातून दीपकला दिशा मिळाली. तो बालवयापासून शेतकरी चळवळीत सक्रिय आहे. दीपकने शालेय जीवनात राज्यातील नामांकित वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा जिंकून अभ्यासू वक्ता म्हणून नावलौकिक मिळाला. देशातील नामांकित कोरो इंडिया संस्थेची फेलोशिप दीपकला मिळाली. राज्याच्या युवा धोरण चर्चासत्रात दीपकने विदर्भातील युवकांची भूमिका मांडली. न्यायमूर्ती गिरटकर यांच्यासोबत मुंबई उच्च न्यायालयात काम केले. महाराष्ट्राच्या विधानसभेत हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०१७ साली इंटर्नशिप करून विद्यमान जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमाने विविध प्रश्नांवर वाचा फोडली. यासोबतच युवकांना घेऊन पाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना लाखोचे साहित्य वितरित केले. तसेच कोरपना तालुक्यातील ३५ गावांतील ६० कुषोषित बालकांना 'जाणीव माणुसकीची' अभियान राबवून पोषण आहार संच व मोफत आरोग्य तपासणी कार्ड वितरित केले.

बॉक्स

अरबी समुद्राच्या प्रदूषणासंदर्भात टाकलेलेल्या याचिकेला यश

विधिज्ञ असिम सरोदे यांच्यासोबत मुंबई येथील अरबी समुद्राच्या प्रदूषणासंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केल्याने तत्काळ शासन व हाजी अली दर्गाह ट्रस्टने पुढाकार घेत जलप्रदूषणावर आळा घातला. राज्य मानवाधिकार आयोगाकडे मंत्र्यालयातील शेतकरी आत्महत्याविषयक तक्रार दाखल केल्याने शेतकऱ्यांना मोबदला मिळाला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता विशेष न्यायाधिकरण अस्तित्वात यावे, म्हणून कृषी न्यायाधिकरण कायद्याचा मसुदा तयार करून लोकसभेत खासदार राजीव सातव यांच्यामार्फत अशासकीय विधेयक मांडले.

बॉक्स

दोन पुस्तके प्रकाशित

दीपकचा वयाच्या १७ व्या वर्षी ‘लढण्याची वेळ आलीय’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. पाणीविषयक कायदे या पुस्तकाचे संपादन केले. नुकतेच ‘कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ हे नव्या कायद्यावरील त्याचे प्रकाशित पुस्तक चर्चेत आहे. त्यासोबतच अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानची स्थापना करून नवोदितांना साहित्याचे चळवळीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.