शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

वाहनाचा विमा संपलाय? दंड होईल विम्याच्या रकमेपेक्षाही अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:00 IST

वाहन विमा न केल्यास कायदेशीर गुन्हा : ५० टक्के वाहनचालक विमा काढण्याकडे करतात दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा उतरवणे आवश्यक आहे. वाहन चालवण्यासाठी मोटार विमा महत्त्वाचा आहे. वाहनाच्या विम्याची मुदत संपल्यानंतर अनेकजण विमा काढत नाहीत. मात्र, विमा संपताच तो काढणे अत्यंत आवश्यक आहे. विमा नसणारे वाहन बेकायदा ठरते. अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते; मात्र खासगी चारचाकी वाहनधारक काही प्रमाणात आणि दुचाकीचे तर ५० टक्के वाहनधारक विमा उतरविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

विमा रकमेपेक्षा दंड जास्तमोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १४६ आणि १४७ अन्वये मोटार वाहन विमा ही कायदेशीर आवश्यकता आहे. अपघातापासून असणाऱ्या धोक्यापासून आर्थिक संरक्षण मिळते. अपघात, दंगल, चोरी, आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते. नसलेल्या दंड आकारला जातो.

दुचाकीसह सर्वच वाहनांचा विमा आवश्यकअनेक प्रकारचे विमा उपलब्ध आहेत. त्यात वाहनाचा विमादेखील अगदी महत्त्वाचा आहे. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी किंवा मोठ्या अवजड वाहनांसाठीही विम्याचे नियम बदलतात. त्यामुळे दुचाकीसह सर्वच वाहनांचा विमा आवश्यक आहे.

शेकडो जणांवर कारवाई चंद्रपूर प्रादेशिक परिवहन विभागाने मागील पाच महिन्यांच्या कालावधीत वाहनांचे इन्शुरन्स संपलेल्या शेकडो वाहनांवर कारवाई केली आहे. विमा न उतरवलेले किंवा विम्याची मुदत संपलेल्या वाहनाचा अपघात झाल्यास जखमी, मृतास कोणत्याही प्रकारचे विमा लाभ मिळत नाहीत.

वाहन विम्याचे प्रकार तरी किती ?कार विमा : हा विमा केवळ तुमच्या कारमुळे झालेल्या अपघातामुळे दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या नुकसानीसाठी संरक्षण देतो.दुचाकी विमा : या विम्यामध्ये तुमच्या दुचाकीमुळे झालेल्या अपघातामुळे दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या नुकसानीचे संरक्षण मिळते.

"प्रत्येकाने वाहनाचा विमा उतरवणे आवश्यक आहे. विमा नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई सुरू आहे. वाहनाला विमा नसल्यास अनेक वेळा वाहनाच्या किमतीपेक्षा अधिक दंड होतो. तसेच एखादा अपघात झाला तर विमा नसेल तर कोणताही लाभ मिळत नाही. "- किरण मोरे, प्रभारी आरटीओ, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर