लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा उतरवणे आवश्यक आहे. वाहन चालवण्यासाठी मोटार विमा महत्त्वाचा आहे. वाहनाच्या विम्याची मुदत संपल्यानंतर अनेकजण विमा काढत नाहीत. मात्र, विमा संपताच तो काढणे अत्यंत आवश्यक आहे. विमा नसणारे वाहन बेकायदा ठरते. अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते; मात्र खासगी चारचाकी वाहनधारक काही प्रमाणात आणि दुचाकीचे तर ५० टक्के वाहनधारक विमा उतरविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
विमा रकमेपेक्षा दंड जास्तमोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १४६ आणि १४७ अन्वये मोटार वाहन विमा ही कायदेशीर आवश्यकता आहे. अपघातापासून असणाऱ्या धोक्यापासून आर्थिक संरक्षण मिळते. अपघात, दंगल, चोरी, आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते. नसलेल्या दंड आकारला जातो.
दुचाकीसह सर्वच वाहनांचा विमा आवश्यकअनेक प्रकारचे विमा उपलब्ध आहेत. त्यात वाहनाचा विमादेखील अगदी महत्त्वाचा आहे. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी किंवा मोठ्या अवजड वाहनांसाठीही विम्याचे नियम बदलतात. त्यामुळे दुचाकीसह सर्वच वाहनांचा विमा आवश्यक आहे.
शेकडो जणांवर कारवाई चंद्रपूर प्रादेशिक परिवहन विभागाने मागील पाच महिन्यांच्या कालावधीत वाहनांचे इन्शुरन्स संपलेल्या शेकडो वाहनांवर कारवाई केली आहे. विमा न उतरवलेले किंवा विम्याची मुदत संपलेल्या वाहनाचा अपघात झाल्यास जखमी, मृतास कोणत्याही प्रकारचे विमा लाभ मिळत नाहीत.
वाहन विम्याचे प्रकार तरी किती ?कार विमा : हा विमा केवळ तुमच्या कारमुळे झालेल्या अपघातामुळे दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या नुकसानीसाठी संरक्षण देतो.दुचाकी विमा : या विम्यामध्ये तुमच्या दुचाकीमुळे झालेल्या अपघातामुळे दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या नुकसानीचे संरक्षण मिळते.
"प्रत्येकाने वाहनाचा विमा उतरवणे आवश्यक आहे. विमा नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई सुरू आहे. वाहनाला विमा नसल्यास अनेक वेळा वाहनाच्या किमतीपेक्षा अधिक दंड होतो. तसेच एखादा अपघात झाला तर विमा नसेल तर कोणताही लाभ मिळत नाही. "- किरण मोरे, प्रभारी आरटीओ, चंद्रपूर