शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

७६६ हेक्टरमध्ये धोका पत्करून हळद लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:54 IST

धान, सोयाबीन व भाजीपाला या दोनच पिकांवर अवलंबून राहणाऱ्या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात प्रथमच मिरची तसेच हळद पिकाची लागवड करून परंपरेच्या परिघाबाहेर जाण्याचा धाडसी प्रयत्न केला.

ठळक मुद्देपाच तालुक्यात पीकपालट : मिरची लागवडीतही वाढ

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : धान, सोयाबीन व भाजीपाला या दोनच पिकांवर अवलंबून राहणाऱ्या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात प्रथमच मिरची तसेच हळद पिकाची लागवड करून परंपरेच्या परिघाबाहेर जाण्याचा धाडसी प्रयत्न केला. ६९४ हेक्टरमध्ये मिरची, तर ७६६ हेक्टर क्षेत्रात हळद लागवड करून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे.जिल्ह्यातील शेतजमिन केवळ धान व सोयाबीन उत्पादनासाठीच पूरक असल्याचा समज आजही अनेक शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे या दोन पिकांना टाळून आर्थिकदृष्ट्या नफा मिळवून देणाऱ्या अन्य पिकांचा फारसा विचार करीत नाही. गतवर्षी कृषी विभागाने धान, सोयाबिन, कापूस व भाजीपाला पिकांविषयी जागृती मोहीम राबविली.मात्र, अन्य नगदी पिकांच्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले नाही. परिणामी, आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी नव्या पिकांविषयी स्वत:च माहिती जाणून घेतली. त्यामध्ये प्रामुख्याने हळदी पिकाचा समावेश होता.हे पीक घेणाºया शेतकऱ्यांची संख्या आधीच कमी असताना चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, जिवती, राजुरा आणि ब्रह्मपुरी तालुक्यात मिरची पिकांचीही लागवड केली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी २५० ते ३०० हेक्टर क्षेत्रांत हळदीचे पीक लागवडीखाली होते. यंदा हे क्षेत्र ७६६ हेक्टर क्षेत्रापर्यंत विस्तारले. शेतकºयांना योग्य मार्गदर्शन आणि शासनाकडून प्रोत्साहन मिळाल्यास हळद लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ होवू शकते.तीळ उत्पादनाकडेही कलभात शेती करणाऱ्या मूल, सावली, नागभीड, ब्रह्मपुरी व सिंदेवाही या पाच तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगामात पहिल्यांदाच ५७१ हेक्टर क्षेत्रात तिळाची लागवड झाली. अन्य पिकांमध्ये आंतरपिक म्हणून तिळ लागवडीचा विचार न करता बहुतेक शेतकऱ्यांनी या पिकाची स्वतंत्र निवड केल्याचे यंदा दिसून आले आहे. सावली तालुक्यात सर्वाधिक २५२ हेक्टर क्षेत्रावर तीळ लागवड करण्यात आली आहे.आधुनिक कृषी प्रशिक्षणच तारणारमिरची, हळद व तिळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठी जोखीम पत्करून यंदा शेती केली. यातून किती उत्पादन निघेल, याची अद्याप खात्री नाही. परंतु, पारंपरिक पिकांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी अन्य जिल्ह्यातील शेतकºयांकडून माहिती मिळवून नव्या प्रयोगाची कास धरली. त्यामुळे कृषी विभागाने पुढील हंगामात या तिन्ही पिकांसाठी गावागावांत प्रशिक्षण सुरू केल्यास हताश शेतकºयांना संजीवनी मिळू शकेल.