शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

७६६ हेक्टरमध्ये धोका पत्करून हळद लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:54 IST

धान, सोयाबीन व भाजीपाला या दोनच पिकांवर अवलंबून राहणाऱ्या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात प्रथमच मिरची तसेच हळद पिकाची लागवड करून परंपरेच्या परिघाबाहेर जाण्याचा धाडसी प्रयत्न केला.

ठळक मुद्देपाच तालुक्यात पीकपालट : मिरची लागवडीतही वाढ

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : धान, सोयाबीन व भाजीपाला या दोनच पिकांवर अवलंबून राहणाऱ्या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात प्रथमच मिरची तसेच हळद पिकाची लागवड करून परंपरेच्या परिघाबाहेर जाण्याचा धाडसी प्रयत्न केला. ६९४ हेक्टरमध्ये मिरची, तर ७६६ हेक्टर क्षेत्रात हळद लागवड करून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे.जिल्ह्यातील शेतजमिन केवळ धान व सोयाबीन उत्पादनासाठीच पूरक असल्याचा समज आजही अनेक शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे या दोन पिकांना टाळून आर्थिकदृष्ट्या नफा मिळवून देणाऱ्या अन्य पिकांचा फारसा विचार करीत नाही. गतवर्षी कृषी विभागाने धान, सोयाबिन, कापूस व भाजीपाला पिकांविषयी जागृती मोहीम राबविली.मात्र, अन्य नगदी पिकांच्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले नाही. परिणामी, आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी नव्या पिकांविषयी स्वत:च माहिती जाणून घेतली. त्यामध्ये प्रामुख्याने हळदी पिकाचा समावेश होता.हे पीक घेणाºया शेतकऱ्यांची संख्या आधीच कमी असताना चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, जिवती, राजुरा आणि ब्रह्मपुरी तालुक्यात मिरची पिकांचीही लागवड केली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी २५० ते ३०० हेक्टर क्षेत्रांत हळदीचे पीक लागवडीखाली होते. यंदा हे क्षेत्र ७६६ हेक्टर क्षेत्रापर्यंत विस्तारले. शेतकºयांना योग्य मार्गदर्शन आणि शासनाकडून प्रोत्साहन मिळाल्यास हळद लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ होवू शकते.तीळ उत्पादनाकडेही कलभात शेती करणाऱ्या मूल, सावली, नागभीड, ब्रह्मपुरी व सिंदेवाही या पाच तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगामात पहिल्यांदाच ५७१ हेक्टर क्षेत्रात तिळाची लागवड झाली. अन्य पिकांमध्ये आंतरपिक म्हणून तिळ लागवडीचा विचार न करता बहुतेक शेतकऱ्यांनी या पिकाची स्वतंत्र निवड केल्याचे यंदा दिसून आले आहे. सावली तालुक्यात सर्वाधिक २५२ हेक्टर क्षेत्रावर तीळ लागवड करण्यात आली आहे.आधुनिक कृषी प्रशिक्षणच तारणारमिरची, हळद व तिळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठी जोखीम पत्करून यंदा शेती केली. यातून किती उत्पादन निघेल, याची अद्याप खात्री नाही. परंतु, पारंपरिक पिकांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी अन्य जिल्ह्यातील शेतकºयांकडून माहिती मिळवून नव्या प्रयोगाची कास धरली. त्यामुळे कृषी विभागाने पुढील हंगामात या तिन्ही पिकांसाठी गावागावांत प्रशिक्षण सुरू केल्यास हताश शेतकºयांना संजीवनी मिळू शकेल.