शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

बेघर झालेल्या कुटुंबाला दिला मदतीचा हात

By admin | Updated: May 31, 2014 23:23 IST

राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे बुधवारी लागलेल्या आगीत पाच घरांची राखरांगोळी झाली. त्यात एकाही कुटुंबाला आगीतून घरातील साहित्य बाहेर काढता आले नाही. आगीमुळे पाच घरांचा संसार

विरूर (स्टे) : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे बुधवारी लागलेल्या आगीत पाच घरांची राखरांगोळी झाली. त्यात एकाही कुटुंबाला आगीतून घरातील साहित्य बाहेर काढता आले नाही. आगीमुळे पाच घरांचा संसार उघड्यावर आल्याने पुढील जीवन कसे जगावे, असा प्रश्न अपघातग्रस्तांवर निर्माण झाला. ही बाब लक्षात घेऊन विरूर येथील काही समाजसेवकांनी मदतीचा हात पुढे करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.बुधवारी ४ वाजताच्या सुमारास अचानकपणे वारलु देवाजी नारनवरे यांच्या घराला आग लागली. जोरदार वारा असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता-पाहता अवती-भोवतीच्या अन्य घरांनाही आगीने आपल्या विळख्यात घेतले. त्यांच्या घरात दोन बेड, टिव्ही, आलमारी, फ्रिज, होम थिएटर, कपडे, धान्य व जीवनावश्यक वस्तुसह जनावरांचे वैरणसुद्धा जळून खाक झाले. आगीमुळे घरातील एकही वस्तु बाहेर काढता आली नाही. संपुर्ण घराची राखरांगोळी झाली. जोरदार वारा असल्याने घराच्या आजुबाजुला असलेले विनोद नारनवरे, आनंदराव नारनवरे, बंडू खंडू झाडे व राहुल भगवान झाडे यांच्या घरालाही आगीने वेढले. त्यांच्याही घरातील धान्य, सामान, कपडे आदी सामान जळून खाक झाले. सदर घटनेची माहिती मिळताच, गावकर्‍यांसह विरूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सर्वप्रथम वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. आगीतून  बचावलेल्या घरातील जीवनावश्यक वस्तू व सिलिंडर बाहेर काढण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, गावकर्‍यांनी चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा येथील अग्नीशमन दलांना पाचारण करण्यात आले. आग विझविण्यात यश आले. मात्र या आगीने पाचजणांचा संसार उघड्यावर आला.लोकप्रतिनिधींनी शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र तो निधी कधी मिळेल, याची शाश्‍वती नाही. विरूर येथील सरपंच भास्कर सिडाम, तंटामुक्त अध्यक्ष रवींद्र ताकसांडे, श्रीनिवास इलंदुला, तिरूपती नल्लाला, संतोष ढवस, गुलाब ताकसांडे, रवींद्र चांदेकर, भुपेंद्र बोंडे, विशाल उपरे, शाहु नारनवरे व गावकर्‍यांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा केली. त्या रकमेतून कपडे, भांडे, आलमारी, पंखा व जीवनावश्यक वस्तु खरेदी करून दिल्या. तसेच गावकर्‍यांनी तांदूळ, गहू, दाळ आदि धान्य गोळा करून अपघातग्रस्तांना दिले. त्यामुळे आगग्रस्तांना दिलासा मिळाला. (वार्ताहर)