शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

बेघर झालेल्या कुटुंबाला दिला मदतीचा हात

By admin | Updated: May 31, 2014 23:23 IST

राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे बुधवारी लागलेल्या आगीत पाच घरांची राखरांगोळी झाली. त्यात एकाही कुटुंबाला आगीतून घरातील साहित्य बाहेर काढता आले नाही. आगीमुळे पाच घरांचा संसार

विरूर (स्टे) : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे बुधवारी लागलेल्या आगीत पाच घरांची राखरांगोळी झाली. त्यात एकाही कुटुंबाला आगीतून घरातील साहित्य बाहेर काढता आले नाही. आगीमुळे पाच घरांचा संसार उघड्यावर आल्याने पुढील जीवन कसे जगावे, असा प्रश्न अपघातग्रस्तांवर निर्माण झाला. ही बाब लक्षात घेऊन विरूर येथील काही समाजसेवकांनी मदतीचा हात पुढे करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.बुधवारी ४ वाजताच्या सुमारास अचानकपणे वारलु देवाजी नारनवरे यांच्या घराला आग लागली. जोरदार वारा असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता-पाहता अवती-भोवतीच्या अन्य घरांनाही आगीने आपल्या विळख्यात घेतले. त्यांच्या घरात दोन बेड, टिव्ही, आलमारी, फ्रिज, होम थिएटर, कपडे, धान्य व जीवनावश्यक वस्तुसह जनावरांचे वैरणसुद्धा जळून खाक झाले. आगीमुळे घरातील एकही वस्तु बाहेर काढता आली नाही. संपुर्ण घराची राखरांगोळी झाली. जोरदार वारा असल्याने घराच्या आजुबाजुला असलेले विनोद नारनवरे, आनंदराव नारनवरे, बंडू खंडू झाडे व राहुल भगवान झाडे यांच्या घरालाही आगीने वेढले. त्यांच्याही घरातील धान्य, सामान, कपडे आदी सामान जळून खाक झाले. सदर घटनेची माहिती मिळताच, गावकर्‍यांसह विरूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सर्वप्रथम वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. आगीतून  बचावलेल्या घरातील जीवनावश्यक वस्तू व सिलिंडर बाहेर काढण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, गावकर्‍यांनी चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा येथील अग्नीशमन दलांना पाचारण करण्यात आले. आग विझविण्यात यश आले. मात्र या आगीने पाचजणांचा संसार उघड्यावर आला.लोकप्रतिनिधींनी शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र तो निधी कधी मिळेल, याची शाश्‍वती नाही. विरूर येथील सरपंच भास्कर सिडाम, तंटामुक्त अध्यक्ष रवींद्र ताकसांडे, श्रीनिवास इलंदुला, तिरूपती नल्लाला, संतोष ढवस, गुलाब ताकसांडे, रवींद्र चांदेकर, भुपेंद्र बोंडे, विशाल उपरे, शाहु नारनवरे व गावकर्‍यांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा केली. त्या रकमेतून कपडे, भांडे, आलमारी, पंखा व जीवनावश्यक वस्तु खरेदी करून दिल्या. तसेच गावकर्‍यांनी तांदूळ, गहू, दाळ आदि धान्य गोळा करून अपघातग्रस्तांना दिले. त्यामुळे आगग्रस्तांना दिलासा मिळाला. (वार्ताहर)