शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या ठिकाणी जाताय मोबाईल सांभाळा; दररोज सरासरी चार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST

स्मार्ट मोबाइल आता चैनीची वस्तू नाहीतर सर्वसामान्यांची गरज बनली आहे. संवादाचे प्रमुख माध्यम म्हणून मोबाईलकडे बघितले जाते. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाल्याने तसेच अनेक खासगी कंपनीतील कामे ऑनलाईन सुरू झाल्याने लहान थोरापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांकडे स्मार्ट मोबाईल दिसून येतात. त्यामुळे मोबाईल चोरटे सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे हे चोरटे गर्दीचे ठिकाणी संधी शोधून मोबाईल पळवीतात.

ठळक मुद्देचोरीच्या तक्रारीत होतेय वाढ : पोलीस दफ्तरी गहाळ म्हणून नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्मार्ट मोबाईलचा वापर जसजसा वाढत आहे. अशातच मोबाईल चोरीच्या घटनाही वाढत आहेत. विशेष म्हणजे, गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मोबाईल सांभाडणे गरजेचे आहे. सन २०२० मध्ये १ हजार ३४७ मोबाईल गहाळ झाल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे.  साधारणतः दिवसातून चार मोबाईल चोरीला जात असल्याचे वास्तव आहे.स्मार्ट मोबाइल आता चैनीची वस्तू नाहीतर सर्वसामान्यांची गरज बनली आहे. संवादाचे प्रमुख माध्यम म्हणून मोबाईलकडे बघितले जाते. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाल्याने तसेच अनेक खासगी कंपनीतील कामे ऑनलाईन सुरू झाल्याने लहान थोरापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांकडे स्मार्ट मोबाईल दिसून येतात. त्यामुळे मोबाईल चोरटे सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे हे चोरटे गर्दीचे ठिकाणी संधी शोधून मोबाईल पळवीतात. चंद्रपुरात तर जबरीने मोबाईल पळविण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. सायबर पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून सन २०१९ मध्ये दोन हजार ९७९ तर २०२० मध्ये १३४७ मोबाईल गहाळ झाले आहेत. पोलिसांनी ऑनलाईन तपास करून ३० ते ४० टक्के मोबाईल शोधले आहेत. 

७५६ मोबाईल शोधण्यात यशमोबाईल चोरी झाल्यानंतर संपूर्ण कागदपत्राच्या आधारे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर हा तपास सायबर विभागाकडे जातो. तक्रार मिळताच पोलीस मोबाईल ट्रेस करतात. मोबाईल ट्रेस झाल्यानंतर पोलिसांना शोध लावणे शक्य होते.  सन २०१९ मध्ये दोन हजार ९७९ पैकी १४८० तर सन २०२० मध्ये १३४७ पैकी ६५६ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

याठिकाणी सांभाळा मोबाईलचंद्रपूर येथील बस स्थानक, रेल्वे स्थानक येथून मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी गेल्याची तक्रार आहेत. यासोबतच चंद्रपुरातील गोल बाजार, भाजी बाजार येथून मोबाईल चोरी गेल्याच्या तक्रारी आहेत. तर बाबुपेठ येथून जबरीने मोबाईल पळवल्याचाही तक्रारी आहेत.

५० टक्के मोबाईलचा शोध लागतच नाहीमोबाईल चोरी केल्यानंतर संपूर्ण कागदपत्राच्या आधारे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणे गरजेचे असते. परंतु बहुतांश जणांकडे कागदपत्र नसल्याने तक्रार करत नाही. तर बहुतेकांनी तक्रार केल्यानंतरही मोबाईल ट्रेस होत नसल्याचे कारण पोलिसांकडून सांगण्यात येते. त्यामुळे चोरी गेलेल्या ५० टक्के मोबाईलचा शोध लागत नसल्याचे वास्तव आहे.

मोबाईल चोरीला जाताच हे करामोबाईल चोरीला गेल्यानंतर तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार करा. मोबाईलमधील ई-मेल व इतर पासवर्ड बदलून घ्यावे, ऑनलाईन बँकिंग असल्यास त्वरित संबंधित बँकेला याची कल्पना द्यावी, खात्यातील व्यवहार बंद करावेत. आपण वापरत असलेला मोबाईल क्रमांक ब्लॉक करावा जेणेकरून गैरवापर होणार नाही.

टॅग्स :MobileमोबाइलThiefचोर