शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पीकविम्याकडे निम्म्या शेतकऱ्यांची पाठ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 16:41 IST

Chandrapur : नागभीड तालुक्यात १४,२८२ शेतकऱ्यांनीच काढला विमा

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुक्यात पीकविम्याकडे निम्म्या शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. नागभीड तालुक्यात २७ हजार ८०० शेतकरी खातेदार आहेत. मात्र, ११ जुलै २०२४ पर्यंत १४ हजार २८२ शेतकऱ्यांनीच पीकविमा काढला आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेची शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणावर जाहिरात करून एक रुपयांत पीकविमा काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावर्षी १५ जुलै २०२४ ही पीकविमा भरण्याची शेवटची तारीख आहे. राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत आहे. एक रुपयात पीकविमा ही योजना त्यापैकीच एक योजना. या योजनेची जाहिरात शासनाकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या जाहिरातीवरून शेतकरीही पोर्टलवर नोंदणी करून पीकविमा काढत आहेत. जे शेतकरी बँका आणि सोसायट्यांमार्फत पीककर्ज घेतात, त्यांच्या पीककर्जातून पीकविम्याची रक्कम कपात करण्यात येते. वैयक्तिकरीत्याही काही शेतकरी पीकविमा काढत आहेत. एक रुपयात पीकविमा, अशी जाहिरात शासनाकडून करण्यात येत असली तरी पूर्ण कागदपत्रांसाठी १०० ते १५० रुपये यासाठी खर्च होत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या योजनेच्या जाहिरातीमध्ये भात पीक वगळून असा एक उल्लेख करण्यात आला आहे. यावरून अनेक शेतकऱ्यांमध्ये संदेह निर्माण झाला आहे. मागील वर्षीच्या पत्रकात भात, ऊस व ताग असा उल्लेख करण्यात आला होता. याकडे 'लोकमत'ने लक्ष वेधले होते. यावर्षी ऊस व ताग हे शब्द जाहिरातीतून वगळण्यात आले असले, तरी भात हा शब्द कायम आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पीकविम्याबद्दल संभ्रम कायम आहे.

कंपनी लाभ देत नाहीया तालुक्यात दरवर्षी निसर्गाच्या अव- कृपेमुळे, कधी विविध रोगांच्या आक्र मणामुळे तर कधी अन्य कारणांमुळे धान पिकाचे उत्पादन निम्म्यावर होत असते. असे असूनही पीकविमा कंपनी शेतकऱ्यांना कोणताच लाभ देत नाही. त्यामुळे शेतकरी पीकविमा काढण्यास टाळाटाळ करतात, अशी शेतकऱ्यांमध्ये ओरड आहे.

लोनमुळे वाढला आकडाअनेक शेतकरी तालुक्यातील सेवा सहकारी सोसायट्यांचे सभासद आहेत. हे शेतकरी सोसायट्यांकडून पीककर्ज उचलत असतात. त्यांच्या पीककर्जातून विम्याची रक्कम कपात करण्यात येते. शिवाय बँकांकडूनही पीककर्ज देण्यात येते. बँकांही पीककर्जातून पीकविम्याची रक्कम कपात करीत असतात. त्यामुळेच हा आकडा १४ हजारां- पर्यंत गेला अशी यासंदर्भात चर्चा आहे.

"नागभीड तालुक्यात २७ हजार ८०० शेतकरी सभासद आहेत. त्यापैकी ११ जुलैपर्यंत १४ हजार २८२ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांचे प्रमाण आणखी वाढेल."- शिवकुमार पुजारी, तालुका कृषी अधिकारी नागभीड. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर