शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पीकविम्याकडे निम्म्या शेतकऱ्यांची पाठ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 16:41 IST

Chandrapur : नागभीड तालुक्यात १४,२८२ शेतकऱ्यांनीच काढला विमा

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुक्यात पीकविम्याकडे निम्म्या शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. नागभीड तालुक्यात २७ हजार ८०० शेतकरी खातेदार आहेत. मात्र, ११ जुलै २०२४ पर्यंत १४ हजार २८२ शेतकऱ्यांनीच पीकविमा काढला आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेची शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणावर जाहिरात करून एक रुपयांत पीकविमा काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावर्षी १५ जुलै २०२४ ही पीकविमा भरण्याची शेवटची तारीख आहे. राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत आहे. एक रुपयात पीकविमा ही योजना त्यापैकीच एक योजना. या योजनेची जाहिरात शासनाकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या जाहिरातीवरून शेतकरीही पोर्टलवर नोंदणी करून पीकविमा काढत आहेत. जे शेतकरी बँका आणि सोसायट्यांमार्फत पीककर्ज घेतात, त्यांच्या पीककर्जातून पीकविम्याची रक्कम कपात करण्यात येते. वैयक्तिकरीत्याही काही शेतकरी पीकविमा काढत आहेत. एक रुपयात पीकविमा, अशी जाहिरात शासनाकडून करण्यात येत असली तरी पूर्ण कागदपत्रांसाठी १०० ते १५० रुपये यासाठी खर्च होत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या योजनेच्या जाहिरातीमध्ये भात पीक वगळून असा एक उल्लेख करण्यात आला आहे. यावरून अनेक शेतकऱ्यांमध्ये संदेह निर्माण झाला आहे. मागील वर्षीच्या पत्रकात भात, ऊस व ताग असा उल्लेख करण्यात आला होता. याकडे 'लोकमत'ने लक्ष वेधले होते. यावर्षी ऊस व ताग हे शब्द जाहिरातीतून वगळण्यात आले असले, तरी भात हा शब्द कायम आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पीकविम्याबद्दल संभ्रम कायम आहे.

कंपनी लाभ देत नाहीया तालुक्यात दरवर्षी निसर्गाच्या अव- कृपेमुळे, कधी विविध रोगांच्या आक्र मणामुळे तर कधी अन्य कारणांमुळे धान पिकाचे उत्पादन निम्म्यावर होत असते. असे असूनही पीकविमा कंपनी शेतकऱ्यांना कोणताच लाभ देत नाही. त्यामुळे शेतकरी पीकविमा काढण्यास टाळाटाळ करतात, अशी शेतकऱ्यांमध्ये ओरड आहे.

लोनमुळे वाढला आकडाअनेक शेतकरी तालुक्यातील सेवा सहकारी सोसायट्यांचे सभासद आहेत. हे शेतकरी सोसायट्यांकडून पीककर्ज उचलत असतात. त्यांच्या पीककर्जातून विम्याची रक्कम कपात करण्यात येते. शिवाय बँकांकडूनही पीककर्ज देण्यात येते. बँकांही पीककर्जातून पीकविम्याची रक्कम कपात करीत असतात. त्यामुळेच हा आकडा १४ हजारां- पर्यंत गेला अशी यासंदर्भात चर्चा आहे.

"नागभीड तालुक्यात २७ हजार ८०० शेतकरी सभासद आहेत. त्यापैकी ११ जुलैपर्यंत १४ हजार २८२ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांचे प्रमाण आणखी वाढेल."- शिवकुमार पुजारी, तालुका कृषी अधिकारी नागभीड. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर