शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

गुरुजींनी विद्यार्थ्यांना सोडले वाऱ्यावर

By admin | Updated: December 18, 2015 01:18 IST

बल्लारपूर पंचायत समितीत एकूण २८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. यातील एकूण १०४ शिक्षकांपैकी ....

अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरबल्लारपूर पंचायत समितीत एकूण २८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. यातील एकूण १०४ शिक्षकांपैकी तब्बल ४९ तर जिल्ह्यातील ३ हजार शिक्षकांनी बंगलोर येथील अधिवेशनासाठी वाट धरली. परिणामी शिक्षणांचा खेळखंडोबा निर्माण होऊन गुरुजींनी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्याने पालकांत असंतोष पसरला आहे.सार्वजनिक शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था आजघडीला बिकट झाली आहे. दिवसेंदिवस विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. अशातच शालेय शिक्षण विभागाने बंगलोर येथील शिक्षकांच्या अधिवेनशनासाठी जाणाऱ्या शिक्षकांना १४ ते २३ डिसेंबर दरम्यान नैमित्तीक रजा मंजूर केल्याचे ऐकविण्यात येत आहे. मात्र याचे नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे काही शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनाच वाऱ्यावर सोडून गेले आहेत. अशा शाळेत केवळ एकाच शिक्षकाला चार वर्गाचा भार सांभाळण्याची वेळ आली आहे.देशाचे भावी नागरिक घडविणाऱ्या शिक्षकांनी केवळ अधिवेशनाचे निमित्त करुन विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणे उचित नाही. विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शालेय अभ्यासक्रमासह त्यांच्यातील कल्पनाशक्तीला बळ देण्याचे कार्य त्यांनाच पार पाडावे लागते. व्यक्तिमत्वाचा विकास घडविण्यासाठी त्यांचे योगदान मोठे असते. मुलांच्या मनावर विद्यार्जनासह कल्पकता बिंबवण्याचे कार्य शिक्षकच पार पाडतो. असे असले तरी कार्यरत शिक्षकांपैकी अर्धे शिक्षकच रजा घेऊन गेल्याने गुरुजी प्रतीचा आदर कमी होण्याचा प्रकार या निमित्ताने आजघडीला घडला आहे.शालेयस्तरावर शिक्षकांना जनगणना, मतदार यादीचे कामे, बीएलओ तत्वाची कामे दिल्यास विद्यार्थ्यांचे शालेय शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड शिक्षक संघटनाच्या माध्यमातून केली जाते. मात्र अधिवेशनाच्या नावावर शिक्षकांनी घेतलेला निर्णय पटणारा नाही. अधिवेशन आहे त्यावेळी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अवश्य जावे, न्याय मागण्या त्यात कराव्या. परंतु, महिन्यापूर्वी दिवाळीच्या सुट्या संपताच पुन्हा अधिवेशनासाठी एका आठवड्याची रजा घेणे, ही बाब शिक्षण क्षेत्रात योग्य नाही. यामुळेच पालकांत असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षक समाजातील महत्त्वाचा घटक आहे. यामुळेच गुरु परंपरा आजतागायत पाळली जात आहे. समाजाचे आपण देणे लागतो, याची त्यांना जाणीव आहे. याच बांधिलकीतून पालक वर्ग त्यांच्यावर लहान वयात संस्कार करण्याची जबाबदारी सोपवितात. उत्तम विद्यार्थी व नागरिकही बनतील, अशी आशा बाळगतात. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी ग्रामीण भागातीलच आहे. आधिच शिक्षणात तो शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे आहे. असे अताना गुरुजींनी विद्यार्थ्यांपैकी आपुलकी न बाळगता आठवड्याभरासाठी का होईना, रजेवर गेल्याने गुरुजींच्या कार्य शैलीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.