शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री स्वत:च्या पुढाकारातून वाटप करणार ४० हजार कुटुंबांना किराणा पॉकिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

कोरोनाचा कहर जगात सुरू आहे. तो जिल्ह्यात पोहचला नसला तरी जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला लागण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. जिल्हा प्रशासनही जिल्ह्यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. कोरोना नावाच्या अदृश्य शत्रूविरुद्ध लढण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्व राजकीय मंडळीही आपापल्या परीने हातभार हातभार लावत आहे.

ठळक मुद्देआर्थिक अडचणीतील कुटुंबांसाठी वडेट्टीवार पालकत्वाच्या भूमिकेत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या प्रकोपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अनेकांचा रोजगार हिरावला गेल्यामुळे अन्यधान्याची दुकाने सुरू असूनही ते खरेदी करू शकत नाही. अशा कुटंबाची काळजी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना स्वस्थ बसू देत नाही. अखेर त्यांनी शासकीय परिघाबाहेर जावून काही दानशुरांची मदत घेऊन जिल्ह्यातील तब्बल ४० हजार कुटुंबांना अत्यावश्यक किराणा वस्तंूचेपॉकेट देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी पालकच म्हणून पुढे आले आहेत.कोरोनाचा कहर जगात सुरू आहे. तो जिल्ह्यात पोहचला नसला तरी जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला लागण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. जिल्हा प्रशासनही जिल्ह्यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. कोरोना नावाच्या अदृश्य शत्रूविरुद्ध लढण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्व राजकीय मंडळीही आपापल्या परीने हातभार हातभार लावत आहे. बाहेर राज्यातील मंडळी, चंद्रपूर जिल्ह्यात अडकून पडले आहे. त्यांच्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थाही भोजन व्यवस्था करीत आहे. परंतु ज्यांच्याकडे दोनवेळेचे पोट भरण्यासाठी आर्थिक चणचण आहे. अनेकांकडे शिधापत्रिका नाही. यामध्ये अल्पभुदारकांसह अन्य कुटुंबाचाही समावेश आहे. त्यांची चिंता पालकमंत्री या नात्याने विजय वडेट्टीवार यांना लागणे स्वाभाविक आहे. त्यांनी शांत न बसता शासनस्तरावर पुढाकार सर्वकष पुढाकार घेतला. परंतु काही मदत शासकीय चाकोरी बाहेर जावून करणे गरजेचे असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांच्यातला एक लोकनेता जागा झाला. त्यांनी जिल्ह्यातील ४० गरजू कुटुंबांना किराणा सामानातील अत्यावश्यक वस्तू गरजूंना देण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी त्यांच्यापुढेही आर्थिक मर्यादा होती. अशातच त्यांनी काही दानशुरांकडे हा प्रस्ताव ठेवला आणि यासाठी अनेक हात पुढे आले. सुमारे दोन कोटी रुपयांचा हा बजेट आहे. यामध्ये १५ हजार पॉकीटाच्या खर्चाचा वाटा स्वत: ना. वडेट्टीवार यांनी उचलण्याचे ठरविले. पॉकेट तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ६ एप्रिलपासून प्रत्येक तालुक्यात गरजु कुटुंबांना या किराणा पॉकेटचे वाटप केले जाणार आहे.वितरण तहसील कार्यालयामार्फतही सर्व किराणा धान्याची पॉकेट प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात जमा केली जाणार आहे. यामाध्यमातूनच त्याचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. यामध्ये १० किलो तांदूळ, २ किलो डाळ, १ किलो खाद्य तेल, जिरं, सावण यासारख्या अत्यावश्यक वस्तूंचा या पॉकेटात समावेश असणार आहे.५ एप्रिलला ब्रह्मपुरीतून होणार प्रारंभकिराणा साहित्याच्या पॉकिटाचा वाटप ४ एप्रिलपासून ब्रह्मपुरी येथून केला जाणार आहे. यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एकेक दिवस निश्चित केला असून त्या नुसार हा वाटप केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार