शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

...अन् पालकमंत्र्यांनी बघितला चक्क काळा कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST

उद्योगांच्या विरोधात नाही. मात्र, प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमांचे कंपन्यांकडून पालन होत नसेल त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. याचे भान कंपन्यांनी ठेवावे. कंपन्यांच्या परिसरातील गावात ईपीएस नेहमी सुरू ठेवावे. तसेच मातीचा धुराळा उडणार नाही, यासाठी नियमित टँकरने पाणी मारावे. सार्वजनिक ठिकाणी एअर क्वॉलिटी मॉनेटरिंग सिस्टम बसवा, अशा कडक शब्दात पालकमंत्र्यांनी यंत्रणेला सुनावले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्यातील उद्योगांकडून होणाऱ्या जीवघेण्या प्रदूषणाने अस्वस्थ आहेत. अखेर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चार दिवसांपासून मुक्कामी असलेल्या पालकमंत्र्यांनी शुक्रवारी यंत्रणेच्या ध्यानीमनी नसताना आपला ताफा थेट ताडाळी एमआयडीसीकडे वळविला. येरूर शिवारातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी केला असता शेतात काळा कापूस दिसला. त्यावरील धूळ निरखून बघितली आणि लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन प्रदूषण ओकणाऱ्या  कंपन्यांविरुद्ध कडक पाऊल उचलण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. उद्योगांच्या विरोधात नाही. मात्र, प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमांचे कंपन्यांकडून पालन होत नसेल त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. याचे भान कंपन्यांनी ठेवावे. कंपन्यांच्या परिसरातील गावात ईपीएस नेहमी सुरू ठेवावे. तसेच मातीचा धुराळा उडणार नाही, यासाठी नियमित टँकरने पाणी मारावे. सार्वजनिक ठिकाणी एअर क्वॉलिटी मॉनेटरिंग सिस्टम बसवा, अशा कडक शब्दात पालकमंत्र्यांनी यंत्रणेला सुनावले.  त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी नीलेश तायवाडे, वेस्टर्न कोल फिल्डचे गुप्ता यांच्यासह चमन मेटॅलिक, ग्रेस इंडस्ट्रीज, गोपानी स्टील, विमला इन्फ्रास्टक्चर आदी उपस्थित होते.

या कापसाला कोण भाव देणार?- काळा पडलेल्या कापसाला बाजारभावाच्या ५० टक्केसुद्धा भाव मिळत नाही. एकतर या कंपन्यांनी स्थानिकांना अत्यल्प रोजगार दिला आणि  नागरिकांच्या शेती व जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सोबतच नागरिकांना डोळ्यांचे आजार, कॅन्सर, दमा, हृदयरोग यासारखे रोग दिले आहेत. जनावरेसुद्धा आजारी पडत आहेत, ही अतिशय गंभीर बाब असल्याचे ना. वडेट्टीवार यांनी नमूद केले.

गावकरी भरभरून बोलले, उ‌द्योगांची केली पोलखोलपालकमंत्र्यांनी शेतकरी प्रदीप जोगी आणि गुणवंत चंदनखेडे यांच्या शेतातील कापूस अक्षरश: काळा पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी गावकऱ्यांनी मंत्र्यांसमोर समस्या मांडल्या. काळ्या पडलेल्या शेतमालाला भाव मिळत नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र, रस्त्यावर कंपन्या पाणी मारत नाही. प्रदूषणाचे धूलिकण नागरिकांच्या शरीरात जातात. अशा कंपन्यांविरोधात सक्त कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली. यावेळी प्रकाश देवतळे, रामू तिवारी, येरूरचे सरपंच मनोज आमटे, माजी पंचायत समिती सभापती विजय बलकी, नकोडाच्या ग्रामपंचायत सदस्या ममता मोरे, विद्या डांगे, मधुकर बरडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारpollutionप्रदूषण