शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

चंद्रपूर जिल्ह्यात महाबीजकडून हरभरा, गव्हाचे बिजोत्पादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 16:31 IST

चंद्रपूर जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, सिंचन क्षेत्रात वाढ होत असल्याने खरीपासोबतच आता रब्बी हंगामाकडेही शेतकरी लक्ष देऊ लागला.

चंद्रपूर -रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार गहू व हरभरा मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) ५९९ क्विंटल गहू आणि ६७० क्विंटल  असे एकूण १ हजार २६९ क्विंटल बियाणे अनुदानावर देण्याचा निर्णय घेतला आहे.  शुक्रवारपर्यंत हे बियाणे राज्यातील  सर्व जिल्ह्यांत पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 चंद्रपूर जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, सिंचन क्षेत्रात वाढ होत असल्याने खरीपासोबतच आता रब्बी हंगामाकडेही शेतकरी लक्ष देऊ लागला. केवळ धानाच्या शेतीवर अवलंबून न राहता अन्य पिकांकडेही शेतकरी आकृष्ट झाला. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून कडधान्याच्या लागवड क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. परंतु, पारंपरिक बियाणे वापरल्याने अनेक शेतकºयांना दरवर्षी आर्थिक फ टका बसतो, हे लक्षात घेऊन यंदा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) रब्बी हंगामासाठी ५९९ क्विंटल गहू आणि ६७० क्विंटल हरभरा बिजोत्पादनासाठी देण्याचा निर्णय घेतला. परिणामी, या दोन्ही पिकांच्या लागवड क्षेत्रांत होण्याची आशा निर्माण झाली आहे. ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना गहू प्रति क्विंटल ५० टक्के अनुदान आणि हरभरा बियाणेसाठी ६० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

राज्यात १ लाख २४ हजार ४०० हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्टरब्बी हंगामाकरिता महाबीजकडून राज्यातील २७ जिल्ह्यांत ८० हजार क्विंटल गहू आणि ३३ हजार क्विंटल हरभरा बियाणे केवळ बिजोत्पादनासाठी पुरविण्यात येणार आहे. हे बियाणे १ लाख २४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रांत  लागवड करण्याचे उद्दिष्ट महाबीजने पुढे ठेवले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी