शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

जिल्ह्यातील शाळांमध्ये लागणार आता तक्रारपेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

अनेकदा ग्रामीण भागातील शाळांना शहरात येऊन तक्रारी कराव्या लागतात. याचबरोबर अनेकदा या तक्रारींचा निपटाराही होत नाही. यामुळे अनेक समस्या तशाच राहतात. त्या वेळेत सोडविल्या जात नाही. या तक्रारी भविष्यात वेळेवर सोडविल्या जाव्यात, यासाठी ही तक्रारी पेटीची योजना आखण्यात आली आहे. तक्रार निवारण समिती तक्रार पेटीतील तक्रारींचे निवारण करतील.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार : महिन्याच्या पहिल्या सोमवारी शाळेत शिक्षण दिन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी सद्यस्थितीत कोणतीही औपचारिक व्यवस्था नाही. त्यामुळे शाळा स्तरावर तक्रारींचे निराकरण होण्यात अडचणी येत आहेत. त्या तक्रारींचे निराकरण तातडीने व्हावे, या उद्देशाने लोकशाही दिनाच्या धर्तीवर आता दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षण दिनाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच शासनाकडून शाळा स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि विभागीय स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक शाळांमध्ये तक्रार पेटीही बसविण्यात येणार आहे. या तक्रार पेटीत येणाऱ्या प्रत्येक तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे.शाळेतील असुविधांपासून ते विविध प्रशासकीय कामांबाबत तक्रारी करण्यासाठी सध्या कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नाही. यामुळे अनेकदा ग्रामीण भागातील शाळांना शहरात येऊन तक्रारी कराव्या लागतात. याचबरोबर अनेकदा या तक्रारींचा निपटाराही होत नाही. यामुळे अनेक समस्या तशाच राहतात. त्या वेळेत सोडविल्या जात नाही. या तक्रारी भविष्यात वेळेवर सोडविल्या जाव्यात, यासाठी ही तक्रारी पेटीची योजना आखण्यात आली आहे. तक्रार निवारण समिती तक्रार पेटीतील तक्रारींचे निवारण करतील. या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांनी केलेल्या गणवेश मिळाला नाही, कोणत्याही प्रकारचे शोषण झाले, शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन झाले, अशा प्रकारच्या तक्रारींचे तातडीने निराकारण होऊ शकते. इतकेच नव्हे तर संस्थाचालकही यात संस्थात्मक वादाबाबतच्या तक्रारी करू शकणार आहेत. तर शाळा मान्यता प्रस्तावापासून ते इतर वादांच्या तक्रारी या माध्यमातून करून त्या सोडवू शकणार आहेत. तक्रारी करण्यासाठी दरवेळेस शिक्षण अधिकारी कार्यालयात न जाता त्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी ही यंत्रणा उभी करण्यात आल्याची माहिती आहे. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी विविध ठिकाणी शिक्षण दिनाचे आयोजन केले जाणार आहे.अशा असणार तक्रार निवारण समित्याशाळा स्तरावर मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा समावेश असलेली तक्रार निवारण समिती असेल. यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींचे, शिक्षकांच्या तक्रारींचे निराकारण होऊ शकते. यानंतर जिल्हा स्तरावर तक्रार निवारण समिती असून यात जिल्हा शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी कार्यरत असतील. तसेच विभागीय स्तरावर उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, पालक, शाळा व संस्था यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळांचे अध्यक्ष, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण उपनिरिक्षक यांची एक समिती असणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा