शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात पार पडली पोंभुर्ण्याची ग्रामसभा

By admin | Updated: August 17, 2014 23:05 IST

तालुका मुख्यालयाचे ठिकाणी असलेल्या पोंभुर्णा ग्रामपंचायत अंतर्गत घेण्यात आलेली ग्रामसभा विविध मुद्यावर गाजली. दारु दुकान बंद करण्याच्या महिलांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

देवाडाखुर्द : तालुका मुख्यालयाचे ठिकाणी असलेल्या पोंभुर्णा ग्रामपंचायत अंतर्गत घेण्यात आलेली ग्रामसभा विविध मुद्यावर गाजली. दारु दुकान बंद करण्याच्या महिलांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी पोलीस बंदोबस्तामध्ये ग्रामसभा पार पडली. महाराष्ट्र शासनातर्फे ग्रामीण भागातील नागरिकांना शेतीला सिंचनाची व रस्त्यांची सोय करण्याच्या दृष्टीने वैयक्तीक व सार्वजनिक हितासाठी लाभार्थ्यांना सिंचन विहीरी, शेततळे, शेतबोळी, शेतात जाणारे रस्ते व बंधारे अशा अनेक लाभाच्या योजनेची माहिती तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी दरवर्षी ग्रामसभेचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने पोंभुर्णा ग्रामपंचायतीमध्ये दुपारी १२ वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली. यामध्ये गावातील २५० महिला-पुरुष उपस्थित होते. सर्वप्रथम सभेमध्ये उपस्थित असलेल्या महिलांनी दारूबंदीवर हल्ला चढविला. वस्तीमध्ये देशी दारूचे दोन दुकान असून ते बंद करण्यात यावे. याबाबत ठरावात नोंद करण्याची मागणी केली. परंतु त्यांच्या मागणीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते गिरीधरसिंह बैस यांनी मागील सभेमधील विषयांचा वाचन न करताच सभेला सुरुवात केली. याबाबत त्यांनी उपस्थित काही नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सदर ग्रामसभा अनाधिकृत असल्याबाबत आक्षेप नोंदविला. ग्रामपंचायत अंतर्गत स्पिकरची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे उपस्थित नागरिकांच्या गोंगाटामुळे विषयाची बरोबर माहिती मिळत नव्हती. ग्रामसभेमध्ये उपस्थित लोकांच्या गोंगाटाने विषयाचे गांभीर्य समजणे कठीण झाले होते. त्यामुळे नागरिकांना शांत करण्यासाठी पोलिसांना पाचारन करण्यात आले. अखेर पोलिसांनी उपस्थित नागरिकांना शांत केले. यानंतर मागील वर्षी झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामाची तात्काळ चौकशी करुन रोजगार सेवकांना कामावरुन कमी करण्यात यावे, अशी मागणी येथील माजी सरपंच ओमेश्वर पद्मगिरीवार, बंडू बुरांडे, नरेंद्र धोडरे, आशिष कावटवार, किशोर गुज्जनवार, लालाजी उराडे आदींनी केली. तर उपस्थित काही महिलांनी गावामध्ये असलेल्या नाल्यांचा उपसा योग्य न झाल्याने वस्तीमध्ये अनेक प्रकारच्या डासांची उत्पती वाढत असून विविध आजार निर्माण होण्याची शक्यता वर्तविली. या अनुषंगाने गावातील सुविधांकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी केली. तसेच मुबलक पाणी असताना सुद्धा नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप काही महिलांनी यावेळी केला. ग्रामपंचायतीने गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायतीच्या कामाचे कंत्राट घेत असल्याने काम निकृष्ठ दर्जाचे होत असून कामे दर्जाहीन झाली आहेत. त्यामुळे कोणतेही काम टेंडर काढून नोंदणीकृत कंत्राटदारामार्फत देण्यात यावे याबाबत माहिती दिली. नागरिकांच्या प्रश्नाने ही सभा चांगलीच गाजली. उपस्थित ग्रामविस्तार अधिकारी शेंडे व सरपंच लक्ष्मण कोडाप यांची मात्र दमछाक झाली. (वार्ताहर)