शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

ग्रामपंचायतींना दैनिक खर्च भागविणेही झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST

मूल : ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने वीज देयक भरण्यासंबंधी घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी तालुक्यातील ...

मूल : ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने वीज देयक भरण्यासंबंधी घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी तालुक्यातील सरपंचांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतीला दिलेले पथदिवे वापराचे देयक ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदान आणि स्वनिधीतून भरावे, असा निर्णय घेतला आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय शासन स्तरावर घेतला असला तरी ग्रामपंचायतीची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेतल्यास अन्यायकारक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट कोसळले. रोजगार आणि उद्योगाअभावी नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने ग्रामपंचायतीमध्ये भरावे लागणारे विविध कर नागरिकांनी भरले नाही. नागरिकांकडून जमा होणाऱ्या विविध कराच्या रकमेशिवाय ग्रामपंचायतीकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. करापोटी मिळणारे उत्पन्न मोठ्या संख्येने घटल्याने ग्रामपंचायतीला विविध विकास कामांशिवाय दैनिक खर्चही भागविणे अडचणीचे झाले आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीने लाखो रुपयांचे आलेले वीज देयक १५ व्या वित्त आयोगाचा अनुदान किंवा स्वनिधीमधून भरायचे कसे, हा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

शासनाने ग्राम विकास विभागाने वीज देयकाची रक्कम भरण्यासंबंधी घेतलेला निर्णय वास्तविकता जाणून घेतला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे वीज देयक भरण्यासंबंधी घेतलेला निर्णय मागे घेऊन वीज देयकाची रक्कम माफ करावी, अथवा त्याकरिता वेगळा निधी दिला जावा, अशी मागणी तालुक्यातील सरपंच व उपसरपंचाच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. संवर्ग विकास अधिकाऱ्यांमार्फत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सदर निवेदन पाठविण्यात आले आहे.

शिष्टमंडळात अखिल गांगरेड्डीवार, चंदू पाटील मारकवार, पलिंदर सातपुते, जितेंद्र लोणारे, विलास चापडे, हिमानी वाकुडकर, सागर देऊलकर, हरिभाऊ येनगंटीवार, प्रदीप वाढई, रवींद्र कामडी, राहुल मुरकुटे, सूरज चलाख, पाटील वाळके, दुर्वास कडस्कर दीपक वाढई, राकेश निमगडे, गोपिका जाधव, कोमल रंदये, मेघा मडावी, योगिता गेडाम, अतुल बुरांडे, रेवत मडावी आदी उपस्थित होते.