शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धानाच्या हमीभावात राज्य शिफारशीपेक्षा ५३ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

केंद्र सरकारने कपाशीला २६० रूपये, सोयाबीन १७०, तूर २००, बाजारी १५० रूपये आणि उडिदाच्या हमीभावात ३०० रूपयांची वाढ जाहीर केली. खरीप भाताचा हमीभाव गतवर्षीच्या तुलनेत २. ९ टक्के म्हणजे ५३ रूपयांनी वाढविल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे ‘ए’ ग्रेडच्या भाताला यंदा १ हजार ८ हजार ८६८ रूपये हमीभाव मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.

ठळक मुद्देदीडपट हमीभावावर प्रश्नचिन्ह : सोयाबीन हमीभावातही ३३ टक्क्यांची तफावत

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने यंदाच्या २०२०-२१ च्या खरीप हंगामाकरिता धानाला १ हजार ८६८ प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ५३ टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, राज्यातील सहा कृषी विद्यापीठांच्या अभ्यास अहवालावर आधारित राज्य सरकारने १५ टक्के नफा गृहीत धरून शिफारस केलेल्या हमीभावापेक्षा केंद्र सरकारच्या भावात तब्बल ५३ टक्क्यांचीघट झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. सोयाबीन हमीभावातही ३३ टक्क्यांची तफावत असल्याने दीडपट हमीभाव दिल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.केंद्र सरकारने कपाशीला २६० रूपये, सोयाबीन १७०, तूर २००, बाजारी १५० रूपये आणि उडिदाच्या हमीभावात ३०० रूपयांची वाढ जाहीर केली. खरीप भाताचा हमीभाव गतवर्षीच्या तुलनेत २. ९ टक्के म्हणजे ५३ रूपयांनी वाढविल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे ‘ए’ ग्रेडच्या भाताला यंदा १ हजार ८ हजार ८६८ रूपये हमीभाव मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे. राज्य सरकारने गतवर्षीच्या खरीप हंगामात १५ टक्के नफा गृहित धरून भाताला ३ हजार ९२१ रूपये हमीभाव देण्याची शिफारस केंद्र सरकारने केली होती. त्यावेळी केंद्र सरकारने १ हजार ८१५ रूपये हमीभाव जाहीर केला. राज्याच्या शिफारस केलेल्या दरापेक्षा ५४ टक्क्यांनी घट होती. यंदा १ हजार ८६८ हजार रूपये हमीभाव जाहीर केल्याने राज्य शिफारशीच्या तुलनेत ५३ टक्क्यांनी घट झाली आहे.मागील वर्षातील हमीभावाची तुलनासोयाबीनला गतवर्षी ५ हजार ७५५ हमीभावाची शिफारशी करूनही ३ हजार ७१० रूपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. त्यामध्येही ३६ टक्क्यांची घट दिसून आली होती. यंदाच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने ३ हजार ८८० रूपये हमीभाव जाहीर केला. या शिफारशीच्या तुलनेत केंद्र सरकारने दिलेल्या हमीभावात ३३ टक्क्यांची घट झाली आहे. नाचणी, मका, तूर, बाजरी, मूग, ज्वारी, भूईमूग, सूर्यफूल, तीळ आदी पिकांबाबतही राज्याने केलेल्या शिफारशीत सुमारे ३५ टक्क्यांची घट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे वाढत चाललेला उत्पादनाचा खर्च पाहता केंद्र सरकारने हमीभावातील केलेली वाढ तुटपुंजी असल्याची टीका शेती प्रश्नांचे अभ्यासक करीत आहेत.१ लाख ७६ हजार क्षेत्रात धान लागवडचंद्रपूर, भंडारा व गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक भात लागवड केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ७६ हजार ९३ हेक्टर क्षेत्रात भात, १ लाख ८५ हजार २२८ हेक्टर क्षेत्रात कापूस, ४९ हजार ५६२ क्षेत्रात सोयाबीन आणि २९ हजार ६४० हेक्टरमध्ये तूर लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी धान व अन्य पिकांचा हमीभाव जाहीर केले जाते. मात्र, धान लागवडीसाठी होणारा उत्पादन खर्च विचारातच घेत नाही.केंद्र सरकारने उत्पादन खर्चाचे प्रामाणिकपणे मूल्यांकन करून २०२०-२१ च्या खरीप हंगामातील पिकांना हमीभाव जाहीर केला नाही. विदर्भातील धान उत्पादक नव्हे तर सर्वच अधिसूचित २८ शेतमाल घेणाऱ्या शेतकऱ्यांचा केंद्र सरकारने विश्वासघातच केला आहे. खरिपाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजे निव्वळ धूळफेक आहे.- अ‍ॅड. वामनराव चटप,माजी आमदार व कृषी अभ्यासक,राजुरा.

टॅग्स :agricultureशेती