शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
3
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
4
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
5
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
6
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
7
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
8
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
9
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
10
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
11
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
12
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
13
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
14
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
15
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
16
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
17
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
18
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
19
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
20
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम

गोयेगाववासीयांना प्यावे लागते काळे पाणी

By admin | Updated: May 7, 2015 00:58 IST

गोवरी डीप कोळसा खाणीतील शक्तीशाली ब्लॉस्टिंगने गोयेगाव येथील बोअरवेलचे खड्डे खचत चालले आहे.

गोवरी : गोवरी डीप कोळसा खाणीतील शक्तीशाली ब्लॉस्टिंगने गोयेगाव येथील बोअरवेलचे खड्डे खचत चालले आहे. त्यामुळे निघणारे पाणी हे कोळशासारखे काळे आहे. या काळ्या दूषित पाण्यामुळे गोयेगाववासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून कोळसा खाणींचा नाहक फटका गावकऱ्यांना बसत आहे.राजुरा शहरापासून १० कि.मी. अंतरावरील गोयेगाव हे जेमतेम ९०० लोकसंख्या असलेले गाव. गावात जाताना वळणवाटेने या गावात प्रवेश करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय म्हणून १ ते ७ पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या परिसरातील जमीन काळी कसदार आणि अतिशय सुपीक आहे. मात्र या परिसरात कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे असल्याने वेकोलिने शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहनाची प्रक्रिया पूर्ण करून गोयेगाव गावालगत दोन-तीन वर्षापूर्वी गोवरी डीप ही खुली कोळसा खाण सुरू केली.कोळसा उत्खननासाठी खाणीत शक्तीशाली ब्लॉस्टींग केले जाते. या ब्लॉस्टींगची क्षमता इतक्या मोठ्या प्रमाणात असते की भूकंप झाल्यासारखी घरे हलू लागतात. बोअरवेलचे खड्डे ब्लॉस्टींगने खचू लागल्याने त्यातून निघणाऱ्या काळ्या पाण्यावर गोयेगाववासीयांना आपली तहान भागवावी लागत आहे. गोयेगाव येथील पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने येथे गेल्या अनेक वर्षांपूर्वी जलशुद्धीकरण टाकी लावण्यात आली. यासाठी शासनाने लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र शासनाचे काम वर्षानुवर्षे थांबलेलेच आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने जलशुद्धीकरणाकरिता लावलेली टाकी निकामी झाली असून ती आता शोभेची वास्तू ठरली आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले असते तर जलशुद्धीकरणाचा लाभ गावकऱ्यांना झाला असता. शुद्ध पाण्यापासून गोयेगाववासीय जनता वंचित झाल्याने नाईलाजाने गावकऱ्यांना फ्लोराईयुक्त व काळ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. कोळसा खाणींचा नाहक फटका गोयेगाववासीयांना बसल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेले शेणखतांचे ढिगारे येणाऱ्या - जाणाऱ्या वाटसरूंच्या स्वागतासाठी उभे आहे. पावसाळ्यात मुख्य रस्त्यावर शेणखताची दुर्गंधी अस्वस्थ करणारी ठरत असतानाही ते ढिगारे हटविण्याचे सौजन्य ग्रामपंचायतींने दाखविले नाही. गावातील रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या नाल्या घाणीने तुंबल्या आहेत. मात्र गावाच्या विकासाप्रति उदासीन असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला गावकऱ्यांच्या आरोग्याशी काही देणेघेणे नसल्याचे नेहमी दिसून येत आले आहे. (वार्ताहर)