शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

गोयेगाववासीयांना प्यावे लागते काळे पाणी

By admin | Updated: May 7, 2015 00:58 IST

गोवरी डीप कोळसा खाणीतील शक्तीशाली ब्लॉस्टिंगने गोयेगाव येथील बोअरवेलचे खड्डे खचत चालले आहे.

गोवरी : गोवरी डीप कोळसा खाणीतील शक्तीशाली ब्लॉस्टिंगने गोयेगाव येथील बोअरवेलचे खड्डे खचत चालले आहे. त्यामुळे निघणारे पाणी हे कोळशासारखे काळे आहे. या काळ्या दूषित पाण्यामुळे गोयेगाववासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून कोळसा खाणींचा नाहक फटका गावकऱ्यांना बसत आहे.राजुरा शहरापासून १० कि.मी. अंतरावरील गोयेगाव हे जेमतेम ९०० लोकसंख्या असलेले गाव. गावात जाताना वळणवाटेने या गावात प्रवेश करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय म्हणून १ ते ७ पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या परिसरातील जमीन काळी कसदार आणि अतिशय सुपीक आहे. मात्र या परिसरात कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे असल्याने वेकोलिने शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहनाची प्रक्रिया पूर्ण करून गोयेगाव गावालगत दोन-तीन वर्षापूर्वी गोवरी डीप ही खुली कोळसा खाण सुरू केली.कोळसा उत्खननासाठी खाणीत शक्तीशाली ब्लॉस्टींग केले जाते. या ब्लॉस्टींगची क्षमता इतक्या मोठ्या प्रमाणात असते की भूकंप झाल्यासारखी घरे हलू लागतात. बोअरवेलचे खड्डे ब्लॉस्टींगने खचू लागल्याने त्यातून निघणाऱ्या काळ्या पाण्यावर गोयेगाववासीयांना आपली तहान भागवावी लागत आहे. गोयेगाव येथील पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने येथे गेल्या अनेक वर्षांपूर्वी जलशुद्धीकरण टाकी लावण्यात आली. यासाठी शासनाने लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र शासनाचे काम वर्षानुवर्षे थांबलेलेच आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने जलशुद्धीकरणाकरिता लावलेली टाकी निकामी झाली असून ती आता शोभेची वास्तू ठरली आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले असते तर जलशुद्धीकरणाचा लाभ गावकऱ्यांना झाला असता. शुद्ध पाण्यापासून गोयेगाववासीय जनता वंचित झाल्याने नाईलाजाने गावकऱ्यांना फ्लोराईयुक्त व काळ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. कोळसा खाणींचा नाहक फटका गोयेगाववासीयांना बसल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेले शेणखतांचे ढिगारे येणाऱ्या - जाणाऱ्या वाटसरूंच्या स्वागतासाठी उभे आहे. पावसाळ्यात मुख्य रस्त्यावर शेणखताची दुर्गंधी अस्वस्थ करणारी ठरत असतानाही ते ढिगारे हटविण्याचे सौजन्य ग्रामपंचायतींने दाखविले नाही. गावातील रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या नाल्या घाणीने तुंबल्या आहेत. मात्र गावाच्या विकासाप्रति उदासीन असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला गावकऱ्यांच्या आरोग्याशी काही देणेघेणे नसल्याचे नेहमी दिसून येत आले आहे. (वार्ताहर)