शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
4
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
5
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
6
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
7
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
8
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
9
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
10
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी
13
कामगारांच्या कामाचे ९ चे झाले १२ तास, पण ओव्हरटाइमचा मिळणार जादा मोबदला; रजेचेही निकष बदलले
14
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
15
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
16
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
17
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
18
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
19
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
20
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

शासनाने पाठ फिरवली

By admin | Updated: October 31, 2015 01:57 IST

केंद्र सरकारची वर्षपूर्ती होऊन सहा महिने झाले. राज्य सरकारची वर्षपूर्ती झाली. मात्र सर्व सामान्य जनतेला विद्यमान सरकारने ...

राष्ट्रवादीचे निवेदन : महागाई कमी करण्याची मागणीचंद्रपूर : केंद्र सरकारची वर्षपूर्ती होऊन सहा महिने झाले. राज्य सरकारची वर्षपूर्ती झाली. मात्र सर्व सामान्य जनतेला विद्यमान सरकारने वेठीस धरून शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली. जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले.राज्यातील व केंद्रातील सरकार केवळ घोषणाबाज आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितार्थ धोरण राबविण्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. वर्षभराच्या कालावधीत काहीच केले नाही. याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढून धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, कृषी पंपाना नियमित वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलत देण्यात यावी, महागाईवर नियंत्रण आणण्यात यावे, इंधनावरील अधिभार रद्द करण्यात यावा यासह अन्य १३ प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, हिराचंद बोरकुटे, दीपक जयस्वाल, शशीकांत देशकर, बेबी उईके, ज्योती रंगारी, डी. के. आरीकर, महेंद्र लोखंडे आदींचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)