शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

शासनाने पाठ फिरवली

By admin | Updated: October 31, 2015 01:57 IST

केंद्र सरकारची वर्षपूर्ती होऊन सहा महिने झाले. राज्य सरकारची वर्षपूर्ती झाली. मात्र सर्व सामान्य जनतेला विद्यमान सरकारने ...

राष्ट्रवादीचे निवेदन : महागाई कमी करण्याची मागणीचंद्रपूर : केंद्र सरकारची वर्षपूर्ती होऊन सहा महिने झाले. राज्य सरकारची वर्षपूर्ती झाली. मात्र सर्व सामान्य जनतेला विद्यमान सरकारने वेठीस धरून शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली. जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले.राज्यातील व केंद्रातील सरकार केवळ घोषणाबाज आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितार्थ धोरण राबविण्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. वर्षभराच्या कालावधीत काहीच केले नाही. याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढून धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, कृषी पंपाना नियमित वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलत देण्यात यावी, महागाईवर नियंत्रण आणण्यात यावे, इंधनावरील अधिभार रद्द करण्यात यावा यासह अन्य १३ प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, हिराचंद बोरकुटे, दीपक जयस्वाल, शशीकांत देशकर, बेबी उईके, ज्योती रंगारी, डी. के. आरीकर, महेंद्र लोखंडे आदींचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)