शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळी स्वस्त करण्यात सरकार अपयशी

By admin | Updated: November 13, 2015 01:00 IST

जीवनावश्यक घटक असलेल्या आहारातील तुरीचे भाव गगणाला भीडले आहेत. सरकारला याची कल्पना असूनही केवळ दर कमी करण्याचे पोकळ आश्वासनच दिले जात आहे.

काँग्रेसचा आरोप : सरकारचे आश्वासन फसवे चंद्रपूर : जीवनावश्यक घटक असलेल्या आहारातील तुरीचे भाव गगणाला भीडले आहेत. सरकारला याची कल्पना असूनही केवळ दर कमी करण्याचे पोकळ आश्वासनच दिले जात आहे. ऐन दिवाळीच्या दिवसातही डाळ २०० रूपये किलोच्या भावाने विकली जात असल्याने सरकार दरवाढ रोखण्यात अपयशी ठरली असून सरकारचे आश्वासनही पोकळ निघाल्याची टीका चंद्रपर जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.तुर डाळीचे भाव कमी करण्याचे आश्वासन सरकारने दसऱ्याच्या दरम्यान जनतेला दिले होते. मात्र आजही दर कायमच असल्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेला माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, प्रदेश सचिव सुनिता लोढीया, अ‍ॅड. विजय मोगरे, प्रदेश अनुसुचित जाती विभागाचे महासचिव संजय रत्नपारखी उपस्थित होते. डाळीच्या दरवाढीच्या पुराव्यादाखल नागरकर यांनी चंद्रपुरातील धान्य बाजारातून खरेदी केलेल्या दोन किलो डाळीच्या पावत्यांसह डाळच सादर केली. ते म्हणाले, आजही जनतेला महाग डाळ विकत घ्यावी लागत आहे. ८० रूपये किलोवर हा दर जायला नको असतानाही नाईलाजाने नागरिकांना खरेदी करावी लागत आहे. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. सरकावरने साठेबाजांवर कावरवाईचा फार्स केला. मात्र जप्तीनंतर ही डाळ त्यांना परत देण्याचे औदार्यही या सरकारने दाखविले, याबद्दल आश्चर्य आहे. यावरून हे सरकार कुणाच्या पाठीशी उभे आहे, याची कल्पना येते. गरिबांना अंत्योदय आणि बीपीएलमध्ये डाळ मिळणे दूरच, साधे धान्यही मिळत नाही. काँग़्रेसच्या काळात बीपीएल, एपीएल घटकातील जनतेला धान्य सहज मिळायचे. सर्वसामान्यांच्या योजना या सरकारने बंद करण्याचा सपाटा चालविल्याने सरकारचे निर्णय चुकीचे ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याचा निषेध करत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. डाळीचे दर न उतरल्यास काँग्रेसकडून आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला. पत्रकार परिषदेला शहर उपाध्यक्ष सुलेमान अली, श्याम राजुरकर, ज्योती कमवेलकर आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)