शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

तूर डाळी स्वस्त करण्यात सरकार अपयशी

By admin | Updated: November 13, 2015 01:00 IST

जीवनावश्यक घटक असलेल्या आहारातील तुरीचे भाव गगणाला भीडले आहेत. सरकारला याची कल्पना असूनही केवळ दर कमी करण्याचे पोकळ आश्वासनच दिले जात आहे.

काँग्रेसचा आरोप : सरकारचे आश्वासन फसवे चंद्रपूर : जीवनावश्यक घटक असलेल्या आहारातील तुरीचे भाव गगणाला भीडले आहेत. सरकारला याची कल्पना असूनही केवळ दर कमी करण्याचे पोकळ आश्वासनच दिले जात आहे. ऐन दिवाळीच्या दिवसातही डाळ २०० रूपये किलोच्या भावाने विकली जात असल्याने सरकार दरवाढ रोखण्यात अपयशी ठरली असून सरकारचे आश्वासनही पोकळ निघाल्याची टीका चंद्रपर जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.तुर डाळीचे भाव कमी करण्याचे आश्वासन सरकारने दसऱ्याच्या दरम्यान जनतेला दिले होते. मात्र आजही दर कायमच असल्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेला माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, प्रदेश सचिव सुनिता लोढीया, अ‍ॅड. विजय मोगरे, प्रदेश अनुसुचित जाती विभागाचे महासचिव संजय रत्नपारखी उपस्थित होते. डाळीच्या दरवाढीच्या पुराव्यादाखल नागरकर यांनी चंद्रपुरातील धान्य बाजारातून खरेदी केलेल्या दोन किलो डाळीच्या पावत्यांसह डाळच सादर केली. ते म्हणाले, आजही जनतेला महाग डाळ विकत घ्यावी लागत आहे. ८० रूपये किलोवर हा दर जायला नको असतानाही नाईलाजाने नागरिकांना खरेदी करावी लागत आहे. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. सरकावरने साठेबाजांवर कावरवाईचा फार्स केला. मात्र जप्तीनंतर ही डाळ त्यांना परत देण्याचे औदार्यही या सरकारने दाखविले, याबद्दल आश्चर्य आहे. यावरून हे सरकार कुणाच्या पाठीशी उभे आहे, याची कल्पना येते. गरिबांना अंत्योदय आणि बीपीएलमध्ये डाळ मिळणे दूरच, साधे धान्यही मिळत नाही. काँग़्रेसच्या काळात बीपीएल, एपीएल घटकातील जनतेला धान्य सहज मिळायचे. सर्वसामान्यांच्या योजना या सरकारने बंद करण्याचा सपाटा चालविल्याने सरकारचे निर्णय चुकीचे ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याचा निषेध करत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. डाळीचे दर न उतरल्यास काँग्रेसकडून आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला. पत्रकार परिषदेला शहर उपाध्यक्ष सुलेमान अली, श्याम राजुरकर, ज्योती कमवेलकर आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)