शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

‘त्या’ शासन निर्णयाने वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 14:44 IST

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने २०१२-१३ मध्ये एक शासन निर्णय निर्गमीत केला होता. त्या निर्णयाची चालू सत्रापासून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपाच टक्के आरक्षणाचा फटका२०१२-१३ च्या निर्णयाची आता अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने २०१२-१३ मध्ये एक शासन निर्णय निर्गमीत केला होता. त्या निर्णयाची चालू सत्रापासून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या शैक्षणिक सत्रात मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी केवळ पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आल्याने ओबीसी विद्यार्थ्यांना आता वसतिगृहाची दारे बंद झाली आहेत.राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली २७१ वसतिगृहे सुरू आहेत. जिल्हास्तरावर नव्याने १०० व विभागीयस्तरावर सात वसतिगृहे नव्याने सुरु करण्यात आली आहेत. या वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत वेळोवेळी नियमावली तयार करण्यात आली आहे. यात सर्व स्तरावर सुरू असलेल्या व भविष्यात सुरु होणाऱ्या सर्व शासकीय मागासवर्गीय वसतिगृहात यापुढे ओबीसी मुलामुलींना केवळ पाच टक्के आरक्षण निश्चित केले आहे.एका वसतिगृहात २०० ते २५० विद्यार्थी या प्रवर्गाचे अर्ज करीत असतील तर त्यापैकी केवळ दोन ते तीन विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. मग अन्य विद्यार्थ्यांनी कुठे राहुन शिक्षण घ्यावे, असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. हा निर्णय इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात अडसर बनला आहे.सदर शासन निर्णय २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून अंमलात आणण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले होते. परंतु, त्यांची अंमलबजावणी न केल्याने इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आजपर्यंत वसतिगृहात प्रवेश मिळत होता. परंतु, हा शासन निर्णय जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने या वर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून सक्तीचे करण्याचे आदेश दिल्याने इतर मागासवर्गीय मुला, मुलींनी कसे शिक्षण घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी