ब्रह्मपुरी : गोसेखुर्द धरण या ना त्या कारणाने परिसरात नेहमीच चर्चेत राहत असते. गराडी नाल्याजवळ मागील वर्षी चाचणीदरम्यान बांधकाम वाहून गेल्याने पाणी सोडण्याकरिता विभागाला कसरत करावी लागली. दरम्यान शेतकऱ्याच्या व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पाईपद्वारे पाणी सोडण्यात विभागाला काही अंशी यश आले. पण गोसेखुर्द धरणाचे काम कोणत्या दर्जाचे झाले आहे, याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा पाहावयास मिळणार आहे. धरणाच्या साईडिंग वॉलमधून चांदगाव जवळ गराडी नाल्यापुढे पाणी झिरपून लिक झाल्याने समोरच्या शेताला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाण्याला पुन्हा वाट फुटल्याची चर्चा होताना दिसून येत आहे.गोसेखुर्द धरणाचा उजवा कालवा ब्रह्मपुरी तालकुयातील तोरगाव, खेड, दुधवाही, चांदगाव, जूगनाळा, गांगलवाडी, मुडझा आदी भागातून आसोला मेंढा तलावाकडे गेला आहे. परंतु ब्रह्मपुरी तालुक्यात गोसीखुर्द कालव्याचे क्रमांक एक ते क्रमांक पाचपर्यंतचे सर्वच विभाग आहेत. तरीही कामे अपूर्ण असून पूर्ण झालेले कामे निकृष्ट असल्याचे बोलले जात आहे. केवळ बोलले जात असले त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न असताना त्याचा प्रत्ययही जेव्हा दिसून लागतो तेव्हा त्यावर विश्वास ठेवावाच लागत असल्याने चांदगाव जवळ हाता पाण्याला पाळीच्या अंतर्गत भागातून वाट फुटल्याने शेजारच्या शेतजमिनीला डबक्याचे रूप प्राप्त झाले आहे. पाईप लाइन टाकलेल्या भागात पाणी वाहून जात असताना मात्र दुसरीकडे साईडिंग वॉलची सुद्धा अशी दुर्दशा असल्याने गोसेखुर्द धरणाच्या पाण्याचे नवनवीन प्रयोग पाहावयास येत असल्याने परिसरातील शेतकरी हतबल आहे. (तालुका प्रतिनिधी)
गोसेखुर्द धरणाच्या पाण्याला वाट
By admin | Updated: November 17, 2015 02:00 IST