शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

चंद्रपुरात हे चाललंय काय? जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेसह दोन मुलांना जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2021 8:58 PM

Chandrapur News जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे आठ जणांना भानामतीच्या संशयावरून अमानुषपणे मारहाणीची घटना ताजी असताना चंद्रपूर जिल्ह्यातीलच नागभीड तालुक्यात मिंडाळा या गावात घटनेची पुनरावृत्ती झाली.

ठळक मुद्देजिवतीच्या प्रकरणाची चंद्रपूर जिल्ह्यातच पुनरावृत्ती पाच जणांना घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे आठ जणांना भानामतीच्या संशयावरून अमानुषपणे मारहाणीची घटना ताजी असताना चंद्रपूर जिल्ह्यातीलच नागभीड तालुक्यात मिंडाळा या गावात घटनेची पुनरावृत्ती झाली. जादूटोणाच्या संशयावरून वृद्ध महिलेसह तिच्या दोन मुलांना एका कुटुंबातील सदस्यांनी पाण्याच्या टाकीला दोराने बांधून अमानुषपणे मारहाण केल्याची खळबळजनक घटना मिंडाळा बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक केली आहे. (Is this going on in Chandrapur? Two children, including an elderly woman, were beaten up on suspicion of witchcraft)मिंडाळा येथील इंदिरा उपासराव कामठे (७०) हिचा मुलगा अशोक कामठे हा जादूटोणा करतो. घरातून नेहमीच जादूटोण्याद्वारे पैसे गायब करतो, असा आरोपींचा संशय होता. या संशयातूनच मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अशोकच्या आई व बहिणीला मारहाण करण्यात आली.

यावेळी अशोक नागभीड येथे होता. आरोपींनी नागभीड गाठून अशोकला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून मिंडाळाला आणले. यानंतर त्याला गावातील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी अँगलला दोराने बांधून जबर मारहाण केली.

या अमानुष मारहाणीने कामठे कुटुंबीय प्रचंड घाबरले होते. मात्र, त्यांना नागभीडला येण्यासाठी कोणतेही वाहन नव्हते, तसेच संध्याकाळ होत असल्याने त्या दिवशी तक्रार दाखल केली नाही. मात्र, बुधवारी सकाळीच अशोकच्या आईने नागभीड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. अशोक मारहाणीपासून घरी नसल्याचे समजते.या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी प्रमोद सडमाके, सीताराम सडमाके, मयुरी सडमाके सर्व रा. मिंडाळा आणि मयुरीची आई, रा. कानपा या सर्वांना १४३, १४७, १४९, ४५२, ३२४, ३४२, ३६३, ३६८, ३२३ सहकलम ३ (१), (२) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी भेट दिली आहे. सध्या गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सामाजिक न्याय विभाग सुस्तचंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथील अमानुष घटनेची शाई वाळत नाही तोच चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे अशाच प्रकारची घटना घडल्याने पुन्हा जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कायद्याबाबतची जनजागृती करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाला आहे. मात्र, हा विभाग याबाबत कुठेही जनजागृती करताना दिसत नाही. ही बाब या घटना घडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी