शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

कर्ज काढून उभे केलेले गोटफार्म पावसात उद्ध्वस्त; युवकाचे स्वप्न पुरात वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2022 15:38 IST

वर्धा नदी फुगल्याने पूर आला व संपूर्ण गोटफार्म, शेती पाण्याखाली आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आशिष खाडे

पळसगाव (चंद्रपूर) : मागील काही दिवसांमध्ये शेतीला लागवड खर्च अधिक आणि उत्पादन कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच निसर्गसुद्धा साथ देत नसल्याची स्थिती आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील मनोज वसंत देरकर (२७) यांनी भाडेतत्त्वावर शेती घेऊन जंगलालगत गोटफॉर्म सुरू केले. पण, आलेल्या पुरामुळे त्याचे मोठे नुकसान झाले असून, बघितलेले स्वप्न पुरात वाहून गेले.

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील मनोज देरकर यांनी नोकरीच्या मागे न धावता कर्ज घेऊन स्वतःचा गोटफार्म सुरू केला. यासाठी त्याने शेतीसुद्धा भाडेतत्त्वावर घेतली. व्यवसायाला सुरुवात करून अगदी चार महिने झाले. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या जोरावर शेतामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला लावला. यासोबतच गोटफार्ममध्ये कुक्कुटपालनदेखील सुरू केले होते. मात्र, ७ जुलैला वरुणराजा कोपल्याने ढगफुटीसारखी स्थिती होती. वर्धा नदी फुगल्याने पूर आला व संपूर्ण गोटफार्म, शेती पाण्याखाली आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता शेतीचे भाडे, सोबतच झालेला खर्च काढायचा कुठून, हा प्रश्न त्याला पडला आहे. त्यामुळे शासनाने मदत करण्याची मागणी केली जात आहे.

शेती परवडत नसल्याने जोडधंदा म्हणून कर्ज काढून गोटफार्म सुरु केले. शेती भाड्याने घेतली. यामध्ये भाजीपाला, कुक्कुटपालन सुरू केले. मात्र आलेल्या पुरामुळे सर्वकाही गेले. त्यामुळे शासनाने मदत केल्यास पुन्हा व्यवसाय उभा करणे शक्य होईल.

- मनोज देरकर, शेतकरी, पळसगाव

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस