शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कर्ज काढून उभे केलेले गोटफार्म पावसात उद्ध्वस्त; युवकाचे स्वप्न पुरात वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2022 15:38 IST

वर्धा नदी फुगल्याने पूर आला व संपूर्ण गोटफार्म, शेती पाण्याखाली आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आशिष खाडे

पळसगाव (चंद्रपूर) : मागील काही दिवसांमध्ये शेतीला लागवड खर्च अधिक आणि उत्पादन कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच निसर्गसुद्धा साथ देत नसल्याची स्थिती आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील मनोज वसंत देरकर (२७) यांनी भाडेतत्त्वावर शेती घेऊन जंगलालगत गोटफॉर्म सुरू केले. पण, आलेल्या पुरामुळे त्याचे मोठे नुकसान झाले असून, बघितलेले स्वप्न पुरात वाहून गेले.

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील मनोज देरकर यांनी नोकरीच्या मागे न धावता कर्ज घेऊन स्वतःचा गोटफार्म सुरू केला. यासाठी त्याने शेतीसुद्धा भाडेतत्त्वावर घेतली. व्यवसायाला सुरुवात करून अगदी चार महिने झाले. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या जोरावर शेतामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला लावला. यासोबतच गोटफार्ममध्ये कुक्कुटपालनदेखील सुरू केले होते. मात्र, ७ जुलैला वरुणराजा कोपल्याने ढगफुटीसारखी स्थिती होती. वर्धा नदी फुगल्याने पूर आला व संपूर्ण गोटफार्म, शेती पाण्याखाली आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता शेतीचे भाडे, सोबतच झालेला खर्च काढायचा कुठून, हा प्रश्न त्याला पडला आहे. त्यामुळे शासनाने मदत करण्याची मागणी केली जात आहे.

शेती परवडत नसल्याने जोडधंदा म्हणून कर्ज काढून गोटफार्म सुरु केले. शेती भाड्याने घेतली. यामध्ये भाजीपाला, कुक्कुटपालन सुरू केले. मात्र आलेल्या पुरामुळे सर्वकाही गेले. त्यामुळे शासनाने मदत केल्यास पुन्हा व्यवसाय उभा करणे शक्य होईल.

- मनोज देरकर, शेतकरी, पळसगाव

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस