शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कर्ज काढून उभे केलेले गोटफार्म पावसात उद्ध्वस्त; युवकाचे स्वप्न पुरात वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2022 15:38 IST

वर्धा नदी फुगल्याने पूर आला व संपूर्ण गोटफार्म, शेती पाण्याखाली आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आशिष खाडे

पळसगाव (चंद्रपूर) : मागील काही दिवसांमध्ये शेतीला लागवड खर्च अधिक आणि उत्पादन कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच निसर्गसुद्धा साथ देत नसल्याची स्थिती आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील मनोज वसंत देरकर (२७) यांनी भाडेतत्त्वावर शेती घेऊन जंगलालगत गोटफॉर्म सुरू केले. पण, आलेल्या पुरामुळे त्याचे मोठे नुकसान झाले असून, बघितलेले स्वप्न पुरात वाहून गेले.

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील मनोज देरकर यांनी नोकरीच्या मागे न धावता कर्ज घेऊन स्वतःचा गोटफार्म सुरू केला. यासाठी त्याने शेतीसुद्धा भाडेतत्त्वावर घेतली. व्यवसायाला सुरुवात करून अगदी चार महिने झाले. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या जोरावर शेतामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला लावला. यासोबतच गोटफार्ममध्ये कुक्कुटपालनदेखील सुरू केले होते. मात्र, ७ जुलैला वरुणराजा कोपल्याने ढगफुटीसारखी स्थिती होती. वर्धा नदी फुगल्याने पूर आला व संपूर्ण गोटफार्म, शेती पाण्याखाली आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता शेतीचे भाडे, सोबतच झालेला खर्च काढायचा कुठून, हा प्रश्न त्याला पडला आहे. त्यामुळे शासनाने मदत करण्याची मागणी केली जात आहे.

शेती परवडत नसल्याने जोडधंदा म्हणून कर्ज काढून गोटफार्म सुरु केले. शेती भाड्याने घेतली. यामध्ये भाजीपाला, कुक्कुटपालन सुरू केले. मात्र आलेल्या पुरामुळे सर्वकाही गेले. त्यामुळे शासनाने मदत केल्यास पुन्हा व्यवसाय उभा करणे शक्य होईल.

- मनोज देरकर, शेतकरी, पळसगाव

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस