शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

मोबाइलला अधिक महत्व देणे, घटस्फोटाचे ठरत आहे कारण 

By साईनाथ कुचनकार | Updated: October 2, 2023 15:57 IST

भारतीय परिवार बचाव संघटना : पोलीस प्रशासनाला दिले निवेदन

चंद्रपूर : सध्याच्या काळात मोबाइल हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग झाला आहे. मात्र कौटुंबिक सुख-समाधानापेक्षा मोबाइलला महत्व देणे मागील काही वर्षांमध्ये घटस्फोटाचे कारण ठरत आहे. या सर्व प्रकारात मोबाइल व माहेर कारणीभूत ठरत आहे. या समस्येला आळा बसावा, यासाठी अधिकाधिक जनजागृती करावी सोबतच कुटुंब तोडण्यापेक्षा तडजोड घडवून आणावी, यासाठी येथील भारतीय परिवार बचाव संघटनेने वरोरा येथील पोलिस निरीक्षक अमोल कासारे यांना निवेदन दिले.

यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, वसंत भलमे, मोहन जीवतोडे, प्रदीप गोविंदवार, सुदर्शन नैताम, सचिन बरबटकर, प्रशांत मडावी, नितीन चांदेकर, गंगाधर गुरूनुले, स्वप्नील सूत्रपवार आदी उपस्थित होते. निवेदनामध्ये मागील काही वर्षांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहेत. घटस्फोटाची आकडेवारी कुटुंब व्यवस्थेला हादरवून टाकणारी असल्याचे नमूद करण्यात आले असून मोबाइल व माहेर खरे खलनायक ठरत असल्याचे म्हटले आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या एकूण दाव्यापैकी ४० टक्के वाज हे मोबाइल आणि माहेरच असल्याचेही यावेळी निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल हा पती-पत्नीत संशय निर्माण करीत आहे. तर काही ठिकाणी माहेर पती व सासरला बोटावर नाचविण्याचा सल्ला देतात. आपल्या मुलीचा संसार चांगल्या प्रकारे चालावा, असे वाटत असेल तर लग्नानंतर माहेरच्यांनी विनाकारण मुलीच्या संसारात, कुटुंबात लुडबुड करणे टाळावे. पती-पत्नीला संसारात रुळू द्यावे त्याचे मन संसारात रमू द्यावे.

- डाॅ. नंदकिशोर मैंदळकर, जिल्हाध्यक्ष भारतीय परिवार बचाव संघटना

काय आहे कारण?

पती-पत्नीच्या नाजूक नात्यावर मोबाइल व माहेर भारी पडत आहे. मोबाइलवर सतत बोलणे, व्हाॅट्सॲपवर चॅटिंग करणे, मोबाइलवर बोलत असताना कौटुंबिक महत्त्व कमी करणे, वडीलधाऱ्यांचा मान न राखणे, यातून होणाऱ्या गैरसमजुतीतून विसंवाद आणि वाढणारा संशय हे पती-पत्नीमधील कौटुंबिक वादाचे कारण ठरत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकMobileमोबाइलchandrapur-acचंद्रपूर