शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

मुली म्हणतात, शेतकरी नवरा नको गं बाई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:36 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला अस्मानी व सुलतानी संकटाला सामोर जावे लागत आहे. मात्र शासनाकडूनसुद्धा उपाययोजना होत नसल्याने शेतकरी अधोगतीकडे चालला आहे. त्याची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. मात्र पैसा हेच सर्वस्व समजणाºया मुलींचीही संख्या कमी नाही.

ठळक मुद्देनोकरीवालाच मुलगा हवा; मुलींसह आईवडिलांच्या अपेक्षा वाढल्या

परिमल डोहणे ।चंद्रपूर : निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला अस्मानी व सुलतानी संकटाला सामोर जावे लागत आहे. मात्र शासनाकडूनसुद्धा उपाययोजना होत नसल्याने शेतकरी अधोगतीकडे चालला आहे. त्याची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. मात्र पैसा हेच सर्वस्व समजणाºया मुलींचीही संख्या कमी नाही. त्यामुळे शेतकरी नवरा त्यांना सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे विवाहयोग्य मुली शेतकरी मुलाला कमी प्रतिष्ठेचे समजून शासकीय नोकरदाराला पसंती देत असून शेतकरी मुलाला चक्क नकार देत असल्याचे दिसून येत आहे.पूर्वी मुला मुलींचे लग्न आईवडिलांकडून ठरविण्यात येत होते. बºयाचदा मुला व मुलींचे विचारसुद्धा विचारात घेण्यात येत नव्हते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. बहुतेक मुले व मुली स्वत: आपल्या पसंतीच्या मुलांची तर मुले आपल्या पसंतीच्या मुलींची निवड करतात. आता आॅनलाईनवर संकेतस्थळावर अनेक लग्न जुळविणाºया संस्था सुरु झाल्या आहे. त्यावर नोंदणी करुन अनेकजण आपला जोडीदार निवडत आहेत. तर विवाह मेळाव्यातूनसुद्धा लग्न जुळत आहेत.मात्र संकेतस्थाळावर किंवा विवाह मेळाव्यात मुलींनी नोंदविलेल्या अपेक्षा बघितल्या तर त्यांना सरकारी नोकरदार मुलगा पाहीजे, तर शहरातील उच्च शिक्षित मुलींना परदेशातील मोठा पगार कमवणारा नवरा हवा आहे. काही मुलींना व्यावसायिक किंवा खासगी ठिकाणी नोकरीवर असलेल्या मुलालासुद्धा पसंती दर्शविली आहे. मात्र अनेक मुलींनी चक्क शेतकरी मुलाला नाकारल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच मुलांनीसुद्धा रंग, रुपापेक्षा कमवत्या मुलीला अधिक पसंती दिली आहे. बहुतांश मुलींकडून तर मुलाच्या घरी शेती असावी, मात्र तो शेतकरी नसावा, अशा अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहेत.उच्च शिक्षण घेऊनही अनेक मुलांनी शेतीला पसंती देत आर्थिक सक्षमता मिळवली आहे. अनेकांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत स्वत: व स्वत:च्या कुटुंबाला आर्थिक स्थोर्य मिळविणाºया युवकांची संख्याही प्रचंढ वाढताना दिसून येत आहे. एककीडे तरुणांमध्ये शेतीबद्दल सकारात्मकता वाढताना विवाहएच्छूक मुलींमध्ये व त्यांच्या वडिलांमध्ये शेतकरी मुलांबद्दल व शेतकºयाबद्ल नकारात्मक्ता वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. शेतकºयाला उभा जगाचा पोशिंदा समजले जाते. पूर्वी उत्तम शेती मध्यम व्यवसाय व कनिष्ठ नोकरी अशी समजूत होते. पण आता निसर्गाच्या दृश्चक्राने परिस्थिती बदलली आहे. उत्पन्न योग्य होत नाही, पिकाला भाव नाही, शेतात राब-राब राबूनही योग्य फळ मिळत नसल्यामुळे आर्थिक स्थिती ठासळत आहे. त्याउलट शासकीय नोकरदाराच्या वेतनामध्ये प्रचंढ वाढ झाली आहे. त्यामुळे उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ शेती अशी धारणा बनली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करुन प्रगत शेतकरी ठरले आहेत. त्यासाठी त्यांना त्यांच्या अर्धागिणीची भक्कम साथ लाभली आहे.दिवसेंदिवस मुलींच्या अपेक्षा वाढत आहेत. शहरातील मुलींना तर चक्क फॉरेनमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी करणाºया मुलाची अपेक्षा आहे. मुलाच्या घरी शेती असावी, मात्र मुलगा हा पूर्णवेळ शेतकरी नसावा, अशी आगडीवेगळी अपेक्षा मुलींकडून व्यक्त होत आहे. त्यासोबतच मुलगा हा निर्व्यसनी असावा, कुटुंबापासून विभक्त राहणार असाव्या, अशा अपेक्षा व्यक्त होत असल्याची माहिती अमोली फाऊंडेशनच्या वैशाली दुर्योधन यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती