शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मुली म्हणतात, शेतकरी नवरा नको गं बाई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:36 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला अस्मानी व सुलतानी संकटाला सामोर जावे लागत आहे. मात्र शासनाकडूनसुद्धा उपाययोजना होत नसल्याने शेतकरी अधोगतीकडे चालला आहे. त्याची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. मात्र पैसा हेच सर्वस्व समजणाºया मुलींचीही संख्या कमी नाही.

ठळक मुद्देनोकरीवालाच मुलगा हवा; मुलींसह आईवडिलांच्या अपेक्षा वाढल्या

परिमल डोहणे ।चंद्रपूर : निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला अस्मानी व सुलतानी संकटाला सामोर जावे लागत आहे. मात्र शासनाकडूनसुद्धा उपाययोजना होत नसल्याने शेतकरी अधोगतीकडे चालला आहे. त्याची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. मात्र पैसा हेच सर्वस्व समजणाºया मुलींचीही संख्या कमी नाही. त्यामुळे शेतकरी नवरा त्यांना सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे विवाहयोग्य मुली शेतकरी मुलाला कमी प्रतिष्ठेचे समजून शासकीय नोकरदाराला पसंती देत असून शेतकरी मुलाला चक्क नकार देत असल्याचे दिसून येत आहे.पूर्वी मुला मुलींचे लग्न आईवडिलांकडून ठरविण्यात येत होते. बºयाचदा मुला व मुलींचे विचारसुद्धा विचारात घेण्यात येत नव्हते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. बहुतेक मुले व मुली स्वत: आपल्या पसंतीच्या मुलांची तर मुले आपल्या पसंतीच्या मुलींची निवड करतात. आता आॅनलाईनवर संकेतस्थळावर अनेक लग्न जुळविणाºया संस्था सुरु झाल्या आहे. त्यावर नोंदणी करुन अनेकजण आपला जोडीदार निवडत आहेत. तर विवाह मेळाव्यातूनसुद्धा लग्न जुळत आहेत.मात्र संकेतस्थाळावर किंवा विवाह मेळाव्यात मुलींनी नोंदविलेल्या अपेक्षा बघितल्या तर त्यांना सरकारी नोकरदार मुलगा पाहीजे, तर शहरातील उच्च शिक्षित मुलींना परदेशातील मोठा पगार कमवणारा नवरा हवा आहे. काही मुलींना व्यावसायिक किंवा खासगी ठिकाणी नोकरीवर असलेल्या मुलालासुद्धा पसंती दर्शविली आहे. मात्र अनेक मुलींनी चक्क शेतकरी मुलाला नाकारल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच मुलांनीसुद्धा रंग, रुपापेक्षा कमवत्या मुलीला अधिक पसंती दिली आहे. बहुतांश मुलींकडून तर मुलाच्या घरी शेती असावी, मात्र तो शेतकरी नसावा, अशा अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहेत.उच्च शिक्षण घेऊनही अनेक मुलांनी शेतीला पसंती देत आर्थिक सक्षमता मिळवली आहे. अनेकांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत स्वत: व स्वत:च्या कुटुंबाला आर्थिक स्थोर्य मिळविणाºया युवकांची संख्याही प्रचंढ वाढताना दिसून येत आहे. एककीडे तरुणांमध्ये शेतीबद्दल सकारात्मकता वाढताना विवाहएच्छूक मुलींमध्ये व त्यांच्या वडिलांमध्ये शेतकरी मुलांबद्दल व शेतकºयाबद्ल नकारात्मक्ता वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. शेतकºयाला उभा जगाचा पोशिंदा समजले जाते. पूर्वी उत्तम शेती मध्यम व्यवसाय व कनिष्ठ नोकरी अशी समजूत होते. पण आता निसर्गाच्या दृश्चक्राने परिस्थिती बदलली आहे. उत्पन्न योग्य होत नाही, पिकाला भाव नाही, शेतात राब-राब राबूनही योग्य फळ मिळत नसल्यामुळे आर्थिक स्थिती ठासळत आहे. त्याउलट शासकीय नोकरदाराच्या वेतनामध्ये प्रचंढ वाढ झाली आहे. त्यामुळे उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ शेती अशी धारणा बनली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करुन प्रगत शेतकरी ठरले आहेत. त्यासाठी त्यांना त्यांच्या अर्धागिणीची भक्कम साथ लाभली आहे.दिवसेंदिवस मुलींच्या अपेक्षा वाढत आहेत. शहरातील मुलींना तर चक्क फॉरेनमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी करणाºया मुलाची अपेक्षा आहे. मुलाच्या घरी शेती असावी, मात्र मुलगा हा पूर्णवेळ शेतकरी नसावा, अशी आगडीवेगळी अपेक्षा मुलींकडून व्यक्त होत आहे. त्यासोबतच मुलगा हा निर्व्यसनी असावा, कुटुंबापासून विभक्त राहणार असाव्या, अशा अपेक्षा व्यक्त होत असल्याची माहिती अमोली फाऊंडेशनच्या वैशाली दुर्योधन यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती