शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

घोडाझरी तलाव नहराच्या नांदेड, नवरगाव वितरिकेला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड वितरिकेच्या धामणगाव चक जंगलाच्या मोरीवर  मागील वर्षी पाटबंधारे विभागाने दुरुस्तीचे काम केले होते. वर्षभरातच त्या ठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे. पाणी नहराला न जाता धामणगाव चक येथील शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. त्यामुळे  त्यांच्या शेतमालाची प्रचंड नुकसान होत आहे. तलावाच्या नवरगाव  वितरिकेवरही मोठे भगदाड पडले आहे.

राजेश बारसागडेलोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड, नवरगाव या वितरिकांची मागील वर्षीच दुरुस्तीची कामे करण्यात आली. मात्र  वर्ष पूर्ण होत नाही तोच पुन्हा या वितरिकांवर मोठे भगदाड पडले आहे. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणार की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. या  वितरिकेवरील दोन्ही भगदाड तातडीने बुजविण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबतचे निवेदन चंद्रपूर येथे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे.घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड वितरिकेच्या धामणगाव चक जंगलाच्या मोरीवर  मागील वर्षी पाटबंधारे विभागाने दुरुस्तीचे काम केले होते. वर्षभरातच त्या ठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे. पाणी नहराला न जाता धामणगाव चक येथील शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. त्यामुळे  त्यांच्या शेतमालाची प्रचंड नुकसान होत आहे. तलावाच्या नवरगाव  वितरिकेवरही मोठे भगदाड पडले आहे. दरम्यान हे दोन्ही भगदाड घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्याच्या अगोदर बुजविण्यात येऊन त्यांची योग्य ती मजबूत दुरुस्ती करण्यात यावी. नाहीतर पुढे पाणी जाणार नाही, अशी स्थिती आहे. यामुळे पुढील शिवारातील शेतकऱ्यांचे पीक पाण्याविना मरतील. इकडे अतिरिक्त पाणी झाल्यामुळे धामणगाव चकच्या शेतकऱ्यांच्या उभ्या  पिकांची नासाळी होईल. मात्र अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ देऊ नये, अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. 

घोडाझरी तलावांतर्गत समस्यांचे निरसन करातलावाच्या मुख्य नहराचा तत्काळ उपसा व सफाई  करण्यात यावी. नहराच्या विविध वितरिकांची दुरुस्ती करण्यात यावी. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पीक करपण्याच्या मार्गांवर असल्याने तलावाचे पाणी सोडण्यात यावे.

दरवर्षी १५ ऑगस्टला घोडाझरी नहराचे पाणी सोडले जाते. त्या अगोदर पाटबंधारे विभागाकडून वितरिकेची पाहणी केली जाते. पण या वर्षी तसे आढळून आले नाही. शेतकऱ्यांच्यावतीने वारंवार दुरुस्तीबाबत पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिल्या जात आहे. मात्र ते प्रतिसाद देत नाही.-होमदेव मेश्राम, माजी भाजपा तालुकाध्यक्ष,वलनी ता. नागभीड 

एकाच वर्षात केलेले नहर  वितरिकेच्या दुरुस्तीचे काम वाहून जाते व तेथे मोठे भगदाड पडते. यावरून ते काम किती दर्जाचे झाले असावे. याची कल्पना येते. या बाबीची चौकशी होऊन संबंधित अभियंता, कंत्राटदार आदी दोषींवर कार्यवाही करण्यात यावी. त्वरित भगदाड बुजवावे.            -आनंदराव शेंडे, सामाजिक कार्यकर्ते, गोविंदपूर ता.नागभीड

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प