शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

घोडाझरी तलाव नहराच्या नांदेड, नवरगाव वितरिकेला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड वितरिकेच्या धामणगाव चक जंगलाच्या मोरीवर  मागील वर्षी पाटबंधारे विभागाने दुरुस्तीचे काम केले होते. वर्षभरातच त्या ठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे. पाणी नहराला न जाता धामणगाव चक येथील शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. त्यामुळे  त्यांच्या शेतमालाची प्रचंड नुकसान होत आहे. तलावाच्या नवरगाव  वितरिकेवरही मोठे भगदाड पडले आहे.

राजेश बारसागडेलोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड, नवरगाव या वितरिकांची मागील वर्षीच दुरुस्तीची कामे करण्यात आली. मात्र  वर्ष पूर्ण होत नाही तोच पुन्हा या वितरिकांवर मोठे भगदाड पडले आहे. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणार की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. या  वितरिकेवरील दोन्ही भगदाड तातडीने बुजविण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबतचे निवेदन चंद्रपूर येथे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे.घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड वितरिकेच्या धामणगाव चक जंगलाच्या मोरीवर  मागील वर्षी पाटबंधारे विभागाने दुरुस्तीचे काम केले होते. वर्षभरातच त्या ठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे. पाणी नहराला न जाता धामणगाव चक येथील शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. त्यामुळे  त्यांच्या शेतमालाची प्रचंड नुकसान होत आहे. तलावाच्या नवरगाव  वितरिकेवरही मोठे भगदाड पडले आहे. दरम्यान हे दोन्ही भगदाड घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्याच्या अगोदर बुजविण्यात येऊन त्यांची योग्य ती मजबूत दुरुस्ती करण्यात यावी. नाहीतर पुढे पाणी जाणार नाही, अशी स्थिती आहे. यामुळे पुढील शिवारातील शेतकऱ्यांचे पीक पाण्याविना मरतील. इकडे अतिरिक्त पाणी झाल्यामुळे धामणगाव चकच्या शेतकऱ्यांच्या उभ्या  पिकांची नासाळी होईल. मात्र अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ देऊ नये, अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. 

घोडाझरी तलावांतर्गत समस्यांचे निरसन करातलावाच्या मुख्य नहराचा तत्काळ उपसा व सफाई  करण्यात यावी. नहराच्या विविध वितरिकांची दुरुस्ती करण्यात यावी. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पीक करपण्याच्या मार्गांवर असल्याने तलावाचे पाणी सोडण्यात यावे.

दरवर्षी १५ ऑगस्टला घोडाझरी नहराचे पाणी सोडले जाते. त्या अगोदर पाटबंधारे विभागाकडून वितरिकेची पाहणी केली जाते. पण या वर्षी तसे आढळून आले नाही. शेतकऱ्यांच्यावतीने वारंवार दुरुस्तीबाबत पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिल्या जात आहे. मात्र ते प्रतिसाद देत नाही.-होमदेव मेश्राम, माजी भाजपा तालुकाध्यक्ष,वलनी ता. नागभीड 

एकाच वर्षात केलेले नहर  वितरिकेच्या दुरुस्तीचे काम वाहून जाते व तेथे मोठे भगदाड पडते. यावरून ते काम किती दर्जाचे झाले असावे. याची कल्पना येते. या बाबीची चौकशी होऊन संबंधित अभियंता, कंत्राटदार आदी दोषींवर कार्यवाही करण्यात यावी. त्वरित भगदाड बुजवावे.            -आनंदराव शेंडे, सामाजिक कार्यकर्ते, गोविंदपूर ता.नागभीड

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प