शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी पर्यटन स्थळाचा ‘लूक’ बदलला

By admin | Updated: June 3, 2017 00:34 IST

पूर्व विदर्भात एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या घोडाझरीने आणकी कात टाकली आहे.

पर्यटकांची गर्दी : विविध विकास कामे मार्गीघनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : पूर्व विदर्भात एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या घोडाझरीने आणकी कात टाकली आहे. घोडाझरीत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून या सुधारणा पर्यटकांना भूरळ घालत आहेत. खरोखरच घोडाझरीचा चेहरा मोहराच बदलून गेला आहे.तसेही घोडाझरीचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालणारेच आहे. तिन्ही बाजूला नैसर्गिक टेकड्या असल्याने एका बाजूला बांध घालून इंग्रजांनी या तलावाची निर्मिती १९०५ मध्ये केली. तलावाची निर्मिती केली त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन उपलब्ध व्हावे, अशी इंग्रजांची कल्पना असावी. पण आता हे तलाव नागभीड-सिंदेवाही या तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीस सिंचन तर उपलब्ध करून देत आहेच, पण त्याच बरोबर हे तलाव पूर्व विदर्भातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहे आणि म्हणूनच वर्षभर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यातील पर्यटक येथे भेट देत असतात. तसेच जिल्ह्यातील शाळांच्या सहलीही येथे येत असतात.सद्यस्थितीत घोडाझरीच्या व्यवस्थापनाने घोडाझरीत आणखी नव्याने अनेक सोयी उपलब्ध केल्या आहेत. यात विविध प्रकारच्या बोटींगचा समावेश आहे. आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. आतापर्यंत नसलेली निवासाची सोय, आकर्षक झाडांची लागवड करण्यात आली आहे. विशाल अशा तलावाच्या आणि त्यासमोरील हिरव्या गर्द वनराईचा बसून मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी गवताच्या झोपड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. गेस्ट हाऊसचाही जीर्णेोद्धार करण्यात आला आहे.घोडाझरीचे बदललेले हे स्वरूप खरोखर डोळ्यात साठवण्याजोगे आहे. आता तर महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडून ‘इको टुरीझम’ म्हणून घोडाझरीचा संपुर्ण जंगल परिसर विकसीत करण्यात येत आहे. वनविभागाचे हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वनविभागाच्या या इको टुरीझमने पर्यटकांना अनासायास दुग्धशर्करा योगाचा लाभ होणार आहे. येथे एकाच दिवशी जंगलभ्रमंती होणार असून या जंगमभ्रमंतीत जंगली पशुपक्षांचे दर्शन आणि घोडाझरीच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन पर्यटकांना अनुभवता येणार आहे.घोडाझरी-कोरंबी हे अंतर ७ कि.मी.चे आहे. सध्या हा रस्ता कच्चा आहे. ‘इको टुरीझम’च्या माध्यमातून हा रस्ता विकसित करण्यात आला, तर या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू शकते. कारण हे जंगल घनदाट असून येथे प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि या निमित्ताने घोडाझरी आणि कोरंबीलाही महत्त्व प्राप्त होईल.- केशव खंडातेमाजी उपसरपंच, कोरंबी.