शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

इरई नदीला हवा निधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:15 AM

चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचे प्रथम वाटोळे करण्यात आले.

ठळक मुद्देसिंचन विभाग हतबल : खोलीकरणाचे काम ठप्प

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचे प्रथम वाटोळे करण्यात आले. त्यानंतर आंदोलने केल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आणि इरई नदीच्या खोलीकरणासाठी प्रयत्न करू लागले. अखेर यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आणि २०१५ मध्ये नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू झाले. पावसाळ्यात हे काम थांबविण्यात आले होते. मात्र त्यानंतर हिवाळा लोटत असतानाही खोलीकरणाचे काम ठप्पच आहे. निधी नसल्यामुळे सिंचन विभागही आपली हतबलता दाखवित आहे.अलिकडच्या काळात चंद्रपूर शहरासह जिल्ह्याचा औद्योगिक विकास झाला. एमईएल, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या कोळसा खाणी व चंद्रपूर एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग आले. या उद्योगांनी इरई नदीचे वाटोळे केले. इरई नदी चंद्रपूरकरांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारी नदी आहे. चंद्रपूर शहराला ही नदी लागून असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या पात्राला लागूनच वेकोलिचे मातीचे महाकाय ढिगारे आहेत. या ढिगाºयामुळे इरई नदीचे पात्रच बदलले. याशिवाय पावसाळ्यात इरई नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे अनेकदा चंद्रपूरकरांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. याशिवाय गाळ कधीच उपसण्यात न आल्याने या नदीत प्रचंड गाळ साचला. कुशाब कायरकर यांची ‘वृक्षाई’, इरई नदी बचाव संघर्ष समिती, इको प्रो, ग्रिन प्लॅनेट या संघटनेनेही आपापल्या परीने इरई वाचविण्यासाठी लढा उभारला. प्रसंगी आंदोलने केली. ‘लोकमत’ने इरईची होत असलेली वाताहात वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. त्यामुळे प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैेसेकर यांनी यासाठी पुढाकार घेत वेकोलि व वीज केंद्राला सहकार्य करण्यास भाग पाडले. त्यातून सिंचन विभागाद्वारे इरई नदीच्या खोलीकरणाला २० मे २०१५ रोजी प्रारंभ झाला. आतापर्यंत पडोली ते चवराळापर्यंतचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले.यावर्षीच्या पावसाळ्यात खोलीकरणाचे काम थांबविण्यात आले. मात्र पावसाळा संपल्यानंतर काम सुरूच करण्यात आले नाही. हिवाळा लोटत असतानाही खोलीकरणाचे काम सुरू झालेले नाही. सिंचन विभाग निधीच नसल्याचे कारण पुढे करीत आहे. एकीकडे जिल्ह्यात विकासकामांचा सपाटा सुरू असताना चंद्रपूरच्या जीवदायिनीसाठी निधी मिळू नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.राजेंद्र सिंग यांनी लक्ष द्यावेनागपूर विभागात जलसाक्षरता केंद्र उभारण्यासाठी चंद्रपूरची निवड केली आहे. या केंद्राच्या उद्घाटनासाठी सोमवारी जलपुरुष राजेंद्र सिंग, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे चंद्रपुरात येत आहेत. पाण्याशी संबंधित एक नवा अध्याय सोमवारी चंद्रपूरशी जुळला जाणार आहे. अशावेळी इरई नदीसाठी तत्काळ निधी मिळण्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी मागणी पर्यावरणवांद्यांची आहे.असे झाले खोलीकरण२० मे २०१५ रोजी इरई नदीच्या खोलीकरणाला प्रारंभ झाला. प्रथम पडोली पुलापासून दाताळा पुलापर्यंत १५० मीटरपर्यंत नदीपात्राचे खोलीकरण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी दाताळा पुलापासून चौराळा पुलापर्यंतच्या पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. हडस्तीजवळच्या वर्धा नदीच्या संगमापर्यंत इरई नदीचे खोलीकरण करणे प्रस्तावित आहे. मात्र हे काम आता रखडले आहे.