शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

गोसीखुर्द वितरिकांची कामे मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:51 IST

गोसेखुर्द उजव्या मुख्य कालव्यावरील उपकालवा बी पाचचे काम जनकापूर ते विहीरगाव शिवारात मागील चार वर्षांपासून थंडावले असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागल आहे. त्यामुळे सदर काम त्वरित करून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देटेंडर होऊनही कामास विलंब : सिंचनासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : गोसेखुर्द उजव्या मुख्य कालव्यावरील उपकालवा बी पाचचे काम जनकापूर ते विहीरगाव शिवारात मागील चार वर्षांपासून थंडावले असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागल आहे. त्यामुळे सदर काम त्वरित करून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.जनकापूर ते विहीरगाव शेत सर्व्हे क्र. २०० पर्यंत गेल्या चार वर्षापूर्वीपासून बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या खरीप पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. कालव्याचे बांधकाम झाले नसल्याने या परिसरातील शेतकरी मागील दोन वर्षांपासून लोकवर्गणी व स्थानिक आमदारांच्या सहयोगातून अर्धवट राहिलेल्या उपकालव्याचा आधार घेत पाणी घेऊन शेतातील पीक वाचवित आहेत. विशेष म्हणजे, धानपिक जगविण्यासाठी पाणी दिल्यास संबधित विभागाला पाण्याचे मागणी बील सुद्धा देण्याचे शेतकºयांनी मान्य केले आहे. असे असले तरी हक्काचे पाणी शेतकºयांना अद्यापही मिळालेले नाही.विहिरगाव, कसरगाव, गेवराखुर्द, मंगरमेंढा या परिसरातील शेतकरी गोसेखुर्दच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. संबंधित गोसीखुर्द प्राधिकरणाकडून सावली तालुक्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात उपकालवे व वितरीकेचे कामे प्रगतीवर आहेत. मात्र गेवरा परिसरातील १० ते १५ गावात अद्यापपर्यंत कुठल्याही स्वरुपात बांधकामांचा अंदाज नसल्याने शेतकºयांकडून संबंधित विभागाला सातत्याने विचारणा केली जात आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.यासंदर्भात संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाºयांकडून माहिती घेतली असता, जनकापूर ते विहिरगाव दरम्यान बी पाच सर्व्हे क्र. २०० च्या पुढील कामे बंद पाईप लाईनद्वारे कामे केले जाणार आहे. त्याबाबत कार्य करणाºया यंत्रणेला निवीदा मंजूर करण्यात आल्या.सदर कंपनीकडून कामाचे सर्व्हेक्षण करुन आवश्यक डिझाईन व नियोजन प्रक्रियेनंतर पुढील कामे करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. असे असले तरी या भागात सिंचनाची व्यवस्था चिंतेची बाब आहे.याभागात आजतागायत कुठलीही कायमस्वरुपी ठोस सिंचन व्यवस्था नसल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला बळी ठरत आहे. त्यामुळे येथील उपकालव्याचे काम त्वरित करून संकटात सापडलेल्या शेतकºयांनी दिलासा देण्याची मागणी आता जोर धरत आहे.शेतकरी दुबार पेरणीपासून वंचितएकेरी पीक पद्धतीत अडकलेल्या या भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधेने दुबार पिके घेता येऊ शकते. मात्र यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्याच्या स्थितीत पुढील कामांच्या अनुषंगाने प्रशासनाकडून काहीच हालचाल दिसत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील अन्य भागात सुरु असलेल्या वितरीका आणि उपकालवे बांधकामाच्या प्रगतीवरुन या भागातील प्रत्येक गावातून शेतकरी चिंतेत असून काम त्वरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.