शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

गोसीखुर्द वितरिकांची कामे मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:51 IST

गोसेखुर्द उजव्या मुख्य कालव्यावरील उपकालवा बी पाचचे काम जनकापूर ते विहीरगाव शिवारात मागील चार वर्षांपासून थंडावले असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागल आहे. त्यामुळे सदर काम त्वरित करून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देटेंडर होऊनही कामास विलंब : सिंचनासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : गोसेखुर्द उजव्या मुख्य कालव्यावरील उपकालवा बी पाचचे काम जनकापूर ते विहीरगाव शिवारात मागील चार वर्षांपासून थंडावले असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागल आहे. त्यामुळे सदर काम त्वरित करून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.जनकापूर ते विहीरगाव शेत सर्व्हे क्र. २०० पर्यंत गेल्या चार वर्षापूर्वीपासून बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या खरीप पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. कालव्याचे बांधकाम झाले नसल्याने या परिसरातील शेतकरी मागील दोन वर्षांपासून लोकवर्गणी व स्थानिक आमदारांच्या सहयोगातून अर्धवट राहिलेल्या उपकालव्याचा आधार घेत पाणी घेऊन शेतातील पीक वाचवित आहेत. विशेष म्हणजे, धानपिक जगविण्यासाठी पाणी दिल्यास संबधित विभागाला पाण्याचे मागणी बील सुद्धा देण्याचे शेतकºयांनी मान्य केले आहे. असे असले तरी हक्काचे पाणी शेतकºयांना अद्यापही मिळालेले नाही.विहिरगाव, कसरगाव, गेवराखुर्द, मंगरमेंढा या परिसरातील शेतकरी गोसेखुर्दच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. संबंधित गोसीखुर्द प्राधिकरणाकडून सावली तालुक्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात उपकालवे व वितरीकेचे कामे प्रगतीवर आहेत. मात्र गेवरा परिसरातील १० ते १५ गावात अद्यापपर्यंत कुठल्याही स्वरुपात बांधकामांचा अंदाज नसल्याने शेतकºयांकडून संबंधित विभागाला सातत्याने विचारणा केली जात आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.यासंदर्भात संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाºयांकडून माहिती घेतली असता, जनकापूर ते विहिरगाव दरम्यान बी पाच सर्व्हे क्र. २०० च्या पुढील कामे बंद पाईप लाईनद्वारे कामे केले जाणार आहे. त्याबाबत कार्य करणाºया यंत्रणेला निवीदा मंजूर करण्यात आल्या.सदर कंपनीकडून कामाचे सर्व्हेक्षण करुन आवश्यक डिझाईन व नियोजन प्रक्रियेनंतर पुढील कामे करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. असे असले तरी या भागात सिंचनाची व्यवस्था चिंतेची बाब आहे.याभागात आजतागायत कुठलीही कायमस्वरुपी ठोस सिंचन व्यवस्था नसल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला बळी ठरत आहे. त्यामुळे येथील उपकालव्याचे काम त्वरित करून संकटात सापडलेल्या शेतकºयांनी दिलासा देण्याची मागणी आता जोर धरत आहे.शेतकरी दुबार पेरणीपासून वंचितएकेरी पीक पद्धतीत अडकलेल्या या भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधेने दुबार पिके घेता येऊ शकते. मात्र यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्याच्या स्थितीत पुढील कामांच्या अनुषंगाने प्रशासनाकडून काहीच हालचाल दिसत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील अन्य भागात सुरु असलेल्या वितरीका आणि उपकालवे बांधकामाच्या प्रगतीवरुन या भागातील प्रत्येक गावातून शेतकरी चिंतेत असून काम त्वरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.