शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाजाचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:06 IST

राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य मंत्रिमंडळाला केलेल्या शिफारशीत अन्याय झाल्याचा आरोप करून ओबीसी आरक्षण समर्थक, कुणबी समाज तालुक्याच्या वतीने गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देअन्यायाविरुद्ध एल्गार : विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य मंत्रिमंडळाला केलेल्या शिफारशीत अन्याय झाल्याचा आरोप करून ओबीसी आरक्षण समर्थक, कुणबी समाज तालुक्याच्या वतीने गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.राज्य मागासवर्ग आयोगाने २८ आॅक्टोबर २०१४ ला महाराष्ट्र शासनास सादर केलेल्या क्रिमिलेअर अटीच्या शिथिलतेबाबत सादर केलेल्या शिफारसींमध्ये कुणबी समाजाला वगळण्यात आले आहे. त्याबाबत ५ ते २६ आॅक्टोबर २०१७ या कालावधीमध्ये शासनाकडून आक्षेप व सूचना मागविण्यात येत असल्याचे वृत्तपत्रामधून प्रकाशित झाले आहे. त्यामुळे कुणबी समाजाने हजारोच्या संख्येत मूक मोर्चा काढून आज आक्षेप नोंदविला. महाराष्ट्रातील कुणबी समाज हा केवळ शेतीशी निगडीत असल्याने आर्थिक व सामाजिकदृष्ट्या विकासापासून वंचित आहे. त्यामुळे या समाजास क्रिमिलेयर अट शिथिल करण्यात यावी, ओबीसी समूहासाठी लागू केलेली क्रिमिलेयरची अट असंविधानिक असल्याने रद्द करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावेळी जि.प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, विलास उरकुडे, अंजली उरकुडे, राकेश तलमले, अ‍ॅड. मनोहर उरकुडे, प्रा. प्रकाश बगमारे, सुचित्रा ठाकरे, दामोधर मिसार, हितेंद्र राऊत, वामन पारधी, वासु सौंदरकर, सचिन राऊत, वामन मिसार, विष्णू तोंडरे, प्रा. हितेंद्र धोटे, अविनाश राऊत, वेणू तोंडरे आदींसह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.कष्टकºयांची उपेक्षा थांबवाकुणबी समाज हा पूर्णत: शेतीवर निर्भर आहे. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या विकासापासून वंचित असल्याने गावखेड्यांत आजही अन्याय सुरू आहे. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानातील तरतुदीनुसार न्याय देणे, ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासनाने कष्टकरी कुणबी समाजाला विविध सोईसवलती प्रदान केल्या पाहिजे. मात्र, चुकीचे धोरण राबविणे सुरू असल्याने कुणबी समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली.