शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

कुणबी समाजाचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:06 IST

राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य मंत्रिमंडळाला केलेल्या शिफारशीत अन्याय झाल्याचा आरोप करून ओबीसी आरक्षण समर्थक, कुणबी समाज तालुक्याच्या वतीने गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देअन्यायाविरुद्ध एल्गार : विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य मंत्रिमंडळाला केलेल्या शिफारशीत अन्याय झाल्याचा आरोप करून ओबीसी आरक्षण समर्थक, कुणबी समाज तालुक्याच्या वतीने गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.राज्य मागासवर्ग आयोगाने २८ आॅक्टोबर २०१४ ला महाराष्ट्र शासनास सादर केलेल्या क्रिमिलेअर अटीच्या शिथिलतेबाबत सादर केलेल्या शिफारसींमध्ये कुणबी समाजाला वगळण्यात आले आहे. त्याबाबत ५ ते २६ आॅक्टोबर २०१७ या कालावधीमध्ये शासनाकडून आक्षेप व सूचना मागविण्यात येत असल्याचे वृत्तपत्रामधून प्रकाशित झाले आहे. त्यामुळे कुणबी समाजाने हजारोच्या संख्येत मूक मोर्चा काढून आज आक्षेप नोंदविला. महाराष्ट्रातील कुणबी समाज हा केवळ शेतीशी निगडीत असल्याने आर्थिक व सामाजिकदृष्ट्या विकासापासून वंचित आहे. त्यामुळे या समाजास क्रिमिलेयर अट शिथिल करण्यात यावी, ओबीसी समूहासाठी लागू केलेली क्रिमिलेयरची अट असंविधानिक असल्याने रद्द करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावेळी जि.प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, विलास उरकुडे, अंजली उरकुडे, राकेश तलमले, अ‍ॅड. मनोहर उरकुडे, प्रा. प्रकाश बगमारे, सुचित्रा ठाकरे, दामोधर मिसार, हितेंद्र राऊत, वामन पारधी, वासु सौंदरकर, सचिन राऊत, वामन मिसार, विष्णू तोंडरे, प्रा. हितेंद्र धोटे, अविनाश राऊत, वेणू तोंडरे आदींसह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.कष्टकºयांची उपेक्षा थांबवाकुणबी समाज हा पूर्णत: शेतीवर निर्भर आहे. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या विकासापासून वंचित असल्याने गावखेड्यांत आजही अन्याय सुरू आहे. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानातील तरतुदीनुसार न्याय देणे, ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासनाने कष्टकरी कुणबी समाजाला विविध सोईसवलती प्रदान केल्या पाहिजे. मात्र, चुकीचे धोरण राबविणे सुरू असल्याने कुणबी समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली.