शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचा विधिमंडळावर मोर्चा

By admin | Updated: December 4, 2015 01:21 IST

शेतकऱ्यानना कर्जमाफी, दुष्काळग्रस्तांना मदत या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने ८ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

८ डिसेंबरला आयोजन : जिल्ह्यातून कार्यकर्ते जाणारचंद्रपूर: शेतकऱ्यानना कर्जमाफी, दुष्काळग्रस्तांना मदत या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने ८ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत.या मोर्चासंदर्भात माहिती देण्यासाठी चंद्रपूर महानगर काँग्रेस कमेटीचे शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांच्यासह प्रदेश सचिव सुनिता लोढीया, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, केशव रामटेके, संजय रत्नपारखी, ज्योती कवठेवर आदींच्या उपस्थितीत गुरूवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना नंदू नागरकर म्हणाले, राज्यातील शेतकरी दुष्काळात भरडत असतानाही सरकारचे याकडे लक्ष नाही. चंद्रपूर जिल्याकतील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. धान, सोयाबिन, कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहेत. अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. राज्यातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. गुन्हेगारी डोके वर काढत आहे. ओबीसी जनतेच्या आरक्षणाचा मुद्दा अद्यापही तसाच पडला आहे. सुनिता लोढीया म्हणाल्या, चंद्रपूर महानगर पालिकेतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. भरमसाठ करवाढ करून सर्वसामान्य चंद्रपूरकरांवर बोझा टाकला आहे. निविदा घोटाळाही ताजाच आहे. पिण्याचे पाणीही योग्यपणे मिळत नाही. राज्यात आणि चंद्रपूर शहरात भाजपाचेच शासन आहे. तरीही अन्यायच सुरू असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. सर्वसामान्यांच्या आहारातील तूरडाळ २०० रूपये किलोवर गेली आहे. सरकारच्या तिजोरीत पैसा वाढविण्याएवजी एलबीडी, पथकरनाके बंद करण्यात आले. त्याऐवजी नागरिकांवर अवाजवी करवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांच्या आणि गरिबांच्या योजना या सरकारने बंद पाडल्या. त्यातून पैसा वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार करीत आहे. सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आवश्वासने पाळण्यात सरकार मागे पडले आहे. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. हा रोष व्यक्त करण्यासाठी ८ डिसेंबरच्या नागपुरातील मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या मोर्चात महिला काँंग्रेस, एनएसयूआय, युवक काँग्रेस, सेवादल यांच्यासह पक्षाच्या विविध आघाडींचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असून सुमारे १० हजारांवर कार्यकर्ते जिल्ह्यातून सहभागी होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)