शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
5
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
6
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
7
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
8
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
9
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
10
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
11
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
12
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
13
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
14
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
15
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
16
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
17
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
18
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
19
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
20
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!

४० वर्षांपासून ‘ते’ करतात रुग्णांवर नि:शुल्क उपचार

By admin | Updated: June 19, 2017 00:48 IST

स्वार्थाने बरबटलेल्या समाजात सेवाभाव जोपासणारी माणसे अगदी विरळ आहेत. मी आणि माझा परिवार, यापुढे माणसे जायला धजावत नाही.

गोवरी येथे जळालेल्यांचा कणवाळू : घरी दारिद्र्य तरीही सामाजिक बांधिलकी प्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : स्वार्थाने बरबटलेल्या समाजात सेवाभाव जोपासणारी माणसे अगदी विरळ आहेत. मी आणि माझा परिवार, यापुढे माणसे जायला धजावत नाही. मात्र समाजात अशीही काही सेवाभावी माणसे आहेत, जी आपल्या जिवाचे रान करीत समाजासाठी धडपड करीत असतात. गेल्या ४० वर्षांपासून समाजासाठी झटणारा हा वयोवृद्ध अनेकांच्या आयुष्यात दीप प्रकाशमान करणारा ठरला आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी येथील दत्तुजी जमदाडे (७०) असे या सेवाभाव जोपासणाऱ्या वयोवृद्धाचे नाव आहे. समाजात सेवाभाव जोपासणारी माणसं कमी आहेत. मात्र घरी अठराविश्वे दारिद्र्य असूनही आपलही समाजासाठी काही देणे असावे या एकाच उदात्त हेतूने ते जळलेल्या रुग्णांवर नि:शुल्क उपचार करतात. जळालेली त्वचा पूर्णवत आणण्यात त्यांचा मोठा हातगंडा आहे. चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी त्यांच्याकडे येतात. हे त्यांचे अविरत कार्य गेल्या ४० वर्षांपासून सुरू आहे. चंद्रपुरातील नामांकित डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी बोलावले. चांगला पगार देतो त्यांची भेटही घेतली. परंतु, समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या धेयवेड्या माणसाने सामाजिक बांधिलकी जोपासत सारे काही गौण ठरविले. सकाळपासून सायंकाळपर्यंत सेवा करणे हेच त्यांचे काम आजही अविरत सुरू आहे. धावपळीच्या जगात आज कुणाकडेच वेळ नाही. समाजाचे देण लागतो या आशेपोटी ते जळालेल्या रुग्णांवर आजही नि:शुल्क उपचार करीत आहेत. अंधारलेल्या आयुष्यात फुलविला प्रकाश जळाल्याने अनेकांच्या आयुष्यात नैराश्य येते. त्यामुळे ते उदासीन जीवन जगत असतात. मात्र गेल्या ४० वर्षांच्या काळात दत्तुजी जमदाडे या कफल्लक माणसाने जळालेली त्वचा पूर्ववत करून अनेकांच्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाशाचा दीप फुलविला आहे.