शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

१२ हजारांवर रेशनकार्ड धारकांचे मोफत धान्य होणार कायमचे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:44 IST

सहा महिन्यांपासून धान्याची नियमित उचल नाही : जिल्ह्यातील लाभार्थ्यांची सुरू आहे पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील सहा महिन्यांपासून रेशन दुकानातून धान्याची उचल न करणाऱ्यांचा लाभ आता बंद करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १२ हजार ३५० लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्याच्या हालचाली पुरवठा विभागाने सुरू केल्या आहेत. सध्या प्रत्येक स्वस्त धान्य दुकान स्तरावर लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

जे लाभार्थी धान्याची उचल करत नाहीत, अशा लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षीच निर्देश दिले होते. यानुसार, दर महिन्याला मागील सहा महिन्यांत धान्य उचल न करणाऱ्यांची यादी पुरवठा विभागाकडे पाठविण्यात येते. जिल्ह्यातील १२ हजार ३५० लाभार्थ्यांनी मागील सहा महिन्यांत धान्य घेतलेले नव्हते त्यांची यादी सहा महिन्यांपूर्वी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना देण्यात आली. यात स्थलांतरित झालेल्या लाभार्थ्यांचीही समावेश आहे. 

लाभ बंद करण्याचा नियमधान्य न घेणारे रेशन कार्ड लाभार्थी सायलेन्ट समजून त्या रेशनधारकांची पडताळणी करण्यात येत आहे, असे लाभार्थी एपीएल (बिगर प्राधान्य कुटुंब लाभार्थी) योजनेत वर्ग केले जातात. सहा महिने धान्य न घेतलेल्या रेशन दुकानातील धान्याची गरज नाही, असे समजून त्यांचा धान्याचा हक्क बंद होतो, असा नियम आहे.

५ हजार१२ रेशन कार्डमधील १२ हजार ३५० लाभार्थ्यांनी सहा महिन्यांपासून धान्याची उचल केली नाही. यामुळे अशा लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यासाठी पुरवठा विभागाकडून पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. संपूर्ण लाभार्थ्यांच्या पडताळणीनंतर धान्य बंद करण्यात येणार आहे.

"पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारामार्फत मागील सहा महिन्यांपासून धान्याची उचल न करणाऱ्यांची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. ५ हजार १२ कार्डच्या १२ हजार ३५० लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे."- आर. आर. बहादूरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर