शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजारांवर रेशनकार्ड धारकांचे मोफत धान्य होणार कायमचे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:44 IST

सहा महिन्यांपासून धान्याची नियमित उचल नाही : जिल्ह्यातील लाभार्थ्यांची सुरू आहे पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील सहा महिन्यांपासून रेशन दुकानातून धान्याची उचल न करणाऱ्यांचा लाभ आता बंद करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १२ हजार ३५० लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्याच्या हालचाली पुरवठा विभागाने सुरू केल्या आहेत. सध्या प्रत्येक स्वस्त धान्य दुकान स्तरावर लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

जे लाभार्थी धान्याची उचल करत नाहीत, अशा लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षीच निर्देश दिले होते. यानुसार, दर महिन्याला मागील सहा महिन्यांत धान्य उचल न करणाऱ्यांची यादी पुरवठा विभागाकडे पाठविण्यात येते. जिल्ह्यातील १२ हजार ३५० लाभार्थ्यांनी मागील सहा महिन्यांत धान्य घेतलेले नव्हते त्यांची यादी सहा महिन्यांपूर्वी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना देण्यात आली. यात स्थलांतरित झालेल्या लाभार्थ्यांचीही समावेश आहे. 

लाभ बंद करण्याचा नियमधान्य न घेणारे रेशन कार्ड लाभार्थी सायलेन्ट समजून त्या रेशनधारकांची पडताळणी करण्यात येत आहे, असे लाभार्थी एपीएल (बिगर प्राधान्य कुटुंब लाभार्थी) योजनेत वर्ग केले जातात. सहा महिने धान्य न घेतलेल्या रेशन दुकानातील धान्याची गरज नाही, असे समजून त्यांचा धान्याचा हक्क बंद होतो, असा नियम आहे.

५ हजार१२ रेशन कार्डमधील १२ हजार ३५० लाभार्थ्यांनी सहा महिन्यांपासून धान्याची उचल केली नाही. यामुळे अशा लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यासाठी पुरवठा विभागाकडून पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. संपूर्ण लाभार्थ्यांच्या पडताळणीनंतर धान्य बंद करण्यात येणार आहे.

"पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारामार्फत मागील सहा महिन्यांपासून धान्याची उचल न करणाऱ्यांची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. ५ हजार १२ कार्डच्या १२ हजार ३५० लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे."- आर. आर. बहादूरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर