शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

चार हजार जुने वीज मीटर बदलविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:24 AM

बंगाली कॅम्प परिसरात वाहनधारकांवर कारवाई चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेवून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या चार वाहनचालकांवर बुधवारी ...

बंगाली कॅम्प परिसरात वाहनधारकांवर कारवाई

चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेवून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या चार वाहनचालकांवर बुधवारी दुपारी ४ वाजता शहर पोलिसांनी बंगाली कॅम्प परिसरात कारवाई केली. वाहनचालकांवर कलम भांदवि २८३ अन्वये गुन्हा दाखल केला.

दादमहल वाॅर्डातील

नाल्या घाणीने तुंबल्या

चंद्रपूर : दादमहल वाॅर्डातील नाल्यांमध्ये घाण साचली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. काही वाॅर्डांमध्ये नालीचे बांधकाम अर्धवट असल्याचा आरोप नागरिकांनी केला. मनपाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

गतिरोधक नसल्याने

अपघाताची शक्यता

चंद्रपूर : चंद्रपूर ते दुर्गापूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. परंतु, बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. सकाळी व सायंकाळी नागरिकांची गर्दी असते. संभाव्य धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने गतिरोधक बांधण्यांची मागणी आहे.

गंज वाॅर्डातून जड

वाहतूक बंद करावी

चंद्रपूर : गंज वाॅर्डात भाजीपाला, धान्य बाजार, सरदार पटेल कॉलेज, खासगी दवाखाने, बँका आहेत. याच परिसरातील सिटी हायस्कूल, हिंदी सिटी हायस्कूल, ज्युबिली हायस्कूल, काही मंगल कार्यालयेही आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जड वाहने रस्त्यावर उभी करून नयेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अपघातग्रस्त स्थळांवर

फलक लावावे

चंद्रपूर : शहरातील अपघातप्रवण स्थळांवर फलक नसल्याने धोका आहे. फलकाअभावी वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. काही दिवसांपूर्वी या स्थळांवरील फलक नागरिकांनी चोरून नेले. जागरूक नागरिकांनी ही माहिती मनपाला दिली. मात्र, अद्याप नवीन फलक लावण्यात आले नाही.

शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षा

गोंडपिपरी : तालुक्यातील शेकडो कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. पण, विम्याची रक्कम मिळाली नाही. अतिपावसामुळे खरिपातील धानाचे पीक वाया गेले होते. विमा काढणारे शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत असल्याचे दिसून आहे.

जलनगरातील पथदिवे

दुरुस्त करावे

चंद्रपूर : शहरातील जलनगर परिसरातील पथदिवे काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही खांबांचे दिवे फ्युज झाले तर काही दिवे फुटले आहेत. त्यामुळे या खांबाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रभागातील नागरिकांनी केली आहे.

११ हजार जुने वीज

मीटर बदलविले

चंद्रपूर : नवीन वीजजोडणीसाठी किंवा नादुरुस्त झालेले वीजमीटर बदलून घेण्यासाठी मीटरच्या उपलब्धतेबाबत सातत्याने शंका उपस्थित केली जात होते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने वीज मीटर बदलवून देण्याची मोहीम सुरू केली आहे. महावितरण कंपनीकडून जिल्ह्यात ११ हजार नवे मीटर उपलब्ध करून दिले आहेत.

सुमित्रानगरात भुरट्या

चोरांचा धुमाकूळ

चंद्रपूर : तुकूम परिसरातील सुमित्रा नगरात मागील काही दिवसांपासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ सुरू केला. रात्री काहींच्या घरातील जीवनोपयोगी वस्तू चोरून नेण्याच्या घटना वाढत आहेत. चोरलेल्या वस्तू भंगारात विकल्याचा प्रकारही गत आठवड्यात उघडकीस आला होता.