शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

निर्वाह भत्त्यासाठी वन कामगार उतरणार रस्त्यावर

By admin | Updated: June 3, 2017 00:36 IST

वन विकास महामंडळ वन विभाग तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कामगारांचा मेळावा विठ्ठल पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

बैठकीत निर्णय : शासनाने दखल घेण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वन विकास महामंडळ वन विभाग तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कामगारांचा मेळावा विठ्ठल पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दहीवडे उपस्थित होते. यावेळी वन कामगारांच्या निर्वाह भत्त्यासाठी आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. प्रास्ताविकातून बाबाराव मून यांनी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत १३ संरक्षण कुटी तसेच ७ तपासणी नाके आहेत. तसेच मोहर्ली मध्ये चार संरक्षण कुटी व चार गेट आहेत. कोळसा रेंज अंतर्गत ६ संरक्षण कुटी व चार गेट आहेत. अवैध जंगल तोड रोखणे, वन्य प्राण्यांची बेकायदेशिर शिकारीला आवर घालणे, वनामध्ये वनवा लागला तर तो विझविणे, तसेच वनरक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पायदळ गस्त करण्यासाठी संरक्षणकुटी कामगारांना कामावर लावले जाते. दिवसभर काम केल्यानंतर रात्र देखील संरक्षण कुटीवरच काढावी लागते. त्यामुळे गुलामाप्रमाणे कामगारांना राबविल्या जाते. साप्ताहीक सुट्टी देखील दिल्या जात नाही. कामगार कायद्यानुसार आठ तासाचे काम संरक्षण कुटीवरील कामगाराकडून करुन घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. प्रा. दहीवडे यांनी, वनविभागात नव्याने ठेकापद्धतीचे आगमन झाले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कामगारांच्या वेतनातून मासीक ५०० रुपयाची कपात तर मध्य चांदा वन विभाग अंतर्गत काम करणाऱ्या जिवती तथा राजुरा रेंज मधील कामगारांच्या वेतनातून ठेकेदाराच्या कमीशनच्या नावाखाली मासिक ९०० रुपयांची कपात करण्यात आली. ती कपात तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली.शरद मडावी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी शामराव नेवारे, सायमन उंबरकर, नोगेंद्र पडोळे, शत्रुघ्न रायपूरे, रत्नापूर मोटघरे, गजानन बोटरे, रुपेश चनकापुरे यांनी मेळाव्यासाठी परिश्रम घेतले. १६ जूनच्या धरणे आंदोलनात सहभागी व्हा !वन कामगारांनी वेळोवेळी मागणी करुनही निर्वाह भत्याची थकबाकी देण्यात आली नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार करूनसुद्धा पत्राला केराची टोपली दाखविल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे १६ जूनला वनविकास महामंडळ अंतर्गत वनविभागात काम करणाऱ्या वन कामगारांचा तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांचा धरणे कार्यक्रम १६ जूनला आयोजित करण्यात आला आहे. आपल्या या न्याय मागणीला घेऊन होणाऱ्या धरणे कार्यक्रमात दुपारी १२ वाजता मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. दहीवडे यांनी केले.