शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
4
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
5
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
6
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
7
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
8
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
9
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
10
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
11
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
12
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
13
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
14
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
15
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
16
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
17
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
18
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
19
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
20
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला

३ मे पर्यंत लॉकडाऊनचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 5:00 AM

जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रूग्ण नसला तरी याचा अर्थ जिल्हा धोक्याबाहेर आहे असे नाही. त्यामुळे ३ मे पर्यंत जिल्ह्यातील लॉकडाऊन कायम राहणार असून घराबाहेर निघून १४४ कलमाचे उल्लंघन करू नये. शेतकऱ्यांच्या हितासाठी आता कापूस, तूर, धान, खरेदी व विक्रीला परवानगी देण्यात आली. मात्र, नागरिकांनी मास्क लावूनच बाहेर निघावे व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे आवाहन : कापूस, तूर, धान खरेदी विक्रीला परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रूग्ण नसला तरी याचा अर्थ जिल्हा धोक्याबाहेर आहे असे नाही. त्यामुळे ३ मे पर्यंत जिल्ह्यातील लॉकडाऊन कायम राहणार असून घराबाहेर निघून १४४ कलमाचे उल्लंघन करू नये. शेतकऱ्यांच्या हितासाठी आता कापूस, तूर, धान, खरेदी व विक्रीला परवानगी देण्यात आली. मात्र, नागरिकांनी मास्क लावूनच बाहेर निघावे व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी केले.महाराष्ट्रात तसेच लगतच्या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग रूग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी आपल्या आजूबाजूच्या घरात नव्याने कोणी आल्यास त्याची तपासणी झालीच पाहिजे. पोलीस प्रशासनाने ५२ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. याशिवाय राजुरा तालुक्यातील धानोरा, सोनुर्ली, आर्वी, देवाडा, कोलगाव, वरोडा, गोवरी, साखरवाही, खामोना, पाचगाव, इसापूर, सोनापूर, विहीरगाव, नोकारी, अंतरगाव, अन्नूर, चंदनवाही, आक्सापूर, गोजोली, पोडसा, नंदाप्पा, पुनागुडा, येल्लापूर, देवलागुड्डा, आंबेझरी, धनकदेवी गावाच्या आरोग्य रक्षणासाठी आदर्श पद्धतीने काम केले जात आहे. ४३ जणांना अटक आतापर्यंत संचारबंदी उल्लंघनाचे १६४ गुन्हे तर ४३ जणांना अटक झाली असून ६८४ वाहने जप्त करण्यात आली. ही वेळ प्रत्येकांनी एकमेकाला मदत करण्याची असून स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाने मिळून गावांमध्ये नवीन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवावी व माहिती संबंधित विभागाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी केले.दररोज २ हजार ४०० शिवभोजन थाळीजिल्ह्यात ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही पण अन्नधान्याची आवश्यकता आहे. त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात संपर्क साधावा. प्रथम आपल्या नावाची नोंद करावी. कोणीही उपाशी राहणार नाही, याबाबत दक्षता घेत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये शिवभोजन योजनेला सुरुवात झाली आहे. दररोज २ हजार ४०० शिवभोजन थाळी पुरविली जात आहे. स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने संकटातील प्रत्येक व्यक्तीला मदत पोहचविण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.शेतमालाला अडवणूक करू नकाशेतमालाची वाहतूक, पशुखाद्य, पशु औषधी, कीटकनाशके, खते-बियाणे आदींची वाहतूक व विक्रीला केंद्र शासनाच्या निर्देशानंतर कोणतेही निर्बंध ठेवण्यात आले नाही. मात्र, शेतीच्या कामाला सुरूवात करताना सामाजिक दुरी राखणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने शेतकºयांची कदापि अडणूक करू नये, असे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले.२ हजार ६४३ नागरिक निगरानीखालीशुक्रवारपर्यंत कोरोना संसर्ग संशयित म्हणून ७७ नागरिकांची नोंदणी झाली आहे. ६९ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६५ नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. केवळ ४ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या २८ हजार ८६३ आहे. यापैकी २ हजार ६४३ नागरिक निगराणीखाली आहेत. १४ दिवसांच्या होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २६ हजार २२० आहे. जिल्ह्यात ७२ नागरिकांना इन्स्टिट्युशनल क्वारंन्टाईन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस