शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा, वैनगंगेचा कहर; २६ गावांना वेढा, १८१३ जणांना हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 12:47 IST

वरोरा, मूल, भद्रावती, पोंभुर्णा तालुक्यात सर्वाधिक फटका

चंद्रपूर : वर्धा व वैनगंगा नदीला पूर आल्याने आपत्ती व्यवस्थापन पथकाने वरोरा, मूल, पोंभुर्णा, भद्रावती तालुक्यातील १८१३ जणांना सुरक्षितस्थळी हलविले.

अप्पर वर्धा व इरई धरणाच्या पाण्याने माजरीत आंबेडकर वार्ड, एकता नगर, वार्ड न. ३ मध्ये हाहाकार उडाला. बल्लारपूर-राजुरा मार्ग पुरामुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बंद झाला. वरोरा, भद्रावती, मूल, पोंभुर्णा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. अनेक गावांची वीज खंडित झाल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. वरोरा तालुक्यातील करंजीच्या २५० पूरग्रस्तांना साई मंगल कार्यालयात ठेवण्यात आले.

वरोरातही शिरले पाणी

वरोरा : वर्धा नदीत धरणाचे पाणी सोडल्याने तालुक्यातील सोईट, कोहोपरा, करंजी, आष्टी, बामरडा, दिंदोळा, आमडी निलजई गावांना पुराने वेढा घातला. सोमवारी मध्यरात्री गावात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. करंजीत पाणी शिरल्याने नागरिकांनी रात्रीच जुन्या वसाहतीत व समाजभवनात आश्रय घेतला. दिंदोळा मारडा चिकणी मार्ग बंद आहे. वरोरातील यात्रा वार्डातील अनेक घरांत पाणी शिरले. नगरपरिषदने शहरातील नगर भवनात पूरग्रस्तांची व्यवस्था केली. सोईट, बोरी, निलजई, आमडी, बामर्डा, दिंदोळा पांजुर्णी नांद्रा येथील वीजपुरवठा खंडित झाला.

रेस्क्यू चमू दाखल

पुरातून बाहेर काढण्याकरिता रेस्क्यू ऑपरेशन दाखल झाली. या पथकाने सोईट येथील नागरिकांना बाहेर काढले. दिंदोळा येथील नागरिकांना नजीकच्या प्रकल्प वसाहतीत स्थलांतरित करण्यात आले.

कुचना व नागलोन शाळेत आश्रय

कुचना : अप्पर वर्धा, लोअर वर्धा व बेंबाळ प्रकल्पामुळे वर्धा नदीचे पाणी अनेक गावांत शिरले. पळसगाव येथील तीन जनावरांचा बुडून मृत्यू झाला. मनगाव-राळेगाव-थोरणा गावांचा संपर्क तुटला आहे. पाटाळा-पळसगाव-माजरी गावांतही पाणी शिरले.

पळसगावातील घरे पाण्याखाली आल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. नागरिक रात्र जागत आहेत. कुचना व नागलोन येथील पूरग्रस्तांनी शाळेत आश्रय घेतला.

माजरी तिसऱ्यांदा जलमय

भद्रावती : पुराचे पाणी तिसऱ्यांदा माजरी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नदी काठावर घरे असणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. अप्पर वर्धा व इरई धरणाच्या पाण्याने आंबेडकर वार्ड, एकता नगर, वार्ड न.३ मध्ये हाहाकार उडविला. सर्व मार्ग बंद झाले. शिरना, वर्धा नदी पूल व पाटाळा येथे माजरी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. १९९४ मध्ये अशा प्रकारचा पूर आला होता. मनगाव व थोराणा गावांचा संपर्क तुटला. राळेगावातील शेतकऱ्यांचे कृषी साहित्य पुरात वाहून गेले. अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे पूर वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पूर नियंत्रण विभागाचे निरीक्षक एम. एस. काकडे यांनी केले.

बामणी-राजुरा मार्ग बंद

बल्लारपूर : चार दिवसांपूर्वी सुरू झालेला बल्लारपूर-राजुरा मार्ग पुरामुळे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता बंद करण्यात आला. किल्ला वॉर्डाकडून विसापूरकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी शिरले. बल्लारपूर पोलीस ठाणे, रेल्वे गोल पुलावर पुराचे पाणी येण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे वस्ती भागातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली.

जुनगावचा संपर्क तुटला

देवाडा बुज (जुनगाव) : वैनगंगेच्या पुराने पोंभुर्णा तालुक्यातील जुनगावचा संपर्क तुटला. देवाडा बुज, जुनगाव, गंगापूर टोक येथील सोयाबीन व कपाशीला जोरदार फटका बसला आहे. जुनगाव हे गाव दोन नद्यांच्या संगमावर असल्याने समस्यांच्या गर्तेत सापडले.

भिंत कोसळल्याने ३ शेळ्या ठार

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील सदाशिव मड़ावी यांच्या घराची भिंत कोसळल्याने दिलीप वलके यांच्या तीन बकऱ्या ठार तर एक जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. मडावी यांच्या घराला लागूनच वलके यांचे घर आहे. शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी वलके यांनी केली.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरchandrapur-acचंद्रपूर