शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

वर्धा, वैनगंगेचा कहर; २६ गावांना वेढा, १८१३ जणांना हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 12:47 IST

वरोरा, मूल, भद्रावती, पोंभुर्णा तालुक्यात सर्वाधिक फटका

चंद्रपूर : वर्धा व वैनगंगा नदीला पूर आल्याने आपत्ती व्यवस्थापन पथकाने वरोरा, मूल, पोंभुर्णा, भद्रावती तालुक्यातील १८१३ जणांना सुरक्षितस्थळी हलविले.

अप्पर वर्धा व इरई धरणाच्या पाण्याने माजरीत आंबेडकर वार्ड, एकता नगर, वार्ड न. ३ मध्ये हाहाकार उडाला. बल्लारपूर-राजुरा मार्ग पुरामुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बंद झाला. वरोरा, भद्रावती, मूल, पोंभुर्णा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. अनेक गावांची वीज खंडित झाल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. वरोरा तालुक्यातील करंजीच्या २५० पूरग्रस्तांना साई मंगल कार्यालयात ठेवण्यात आले.

वरोरातही शिरले पाणी

वरोरा : वर्धा नदीत धरणाचे पाणी सोडल्याने तालुक्यातील सोईट, कोहोपरा, करंजी, आष्टी, बामरडा, दिंदोळा, आमडी निलजई गावांना पुराने वेढा घातला. सोमवारी मध्यरात्री गावात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. करंजीत पाणी शिरल्याने नागरिकांनी रात्रीच जुन्या वसाहतीत व समाजभवनात आश्रय घेतला. दिंदोळा मारडा चिकणी मार्ग बंद आहे. वरोरातील यात्रा वार्डातील अनेक घरांत पाणी शिरले. नगरपरिषदने शहरातील नगर भवनात पूरग्रस्तांची व्यवस्था केली. सोईट, बोरी, निलजई, आमडी, बामर्डा, दिंदोळा पांजुर्णी नांद्रा येथील वीजपुरवठा खंडित झाला.

रेस्क्यू चमू दाखल

पुरातून बाहेर काढण्याकरिता रेस्क्यू ऑपरेशन दाखल झाली. या पथकाने सोईट येथील नागरिकांना बाहेर काढले. दिंदोळा येथील नागरिकांना नजीकच्या प्रकल्प वसाहतीत स्थलांतरित करण्यात आले.

कुचना व नागलोन शाळेत आश्रय

कुचना : अप्पर वर्धा, लोअर वर्धा व बेंबाळ प्रकल्पामुळे वर्धा नदीचे पाणी अनेक गावांत शिरले. पळसगाव येथील तीन जनावरांचा बुडून मृत्यू झाला. मनगाव-राळेगाव-थोरणा गावांचा संपर्क तुटला आहे. पाटाळा-पळसगाव-माजरी गावांतही पाणी शिरले.

पळसगावातील घरे पाण्याखाली आल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. नागरिक रात्र जागत आहेत. कुचना व नागलोन येथील पूरग्रस्तांनी शाळेत आश्रय घेतला.

माजरी तिसऱ्यांदा जलमय

भद्रावती : पुराचे पाणी तिसऱ्यांदा माजरी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नदी काठावर घरे असणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. अप्पर वर्धा व इरई धरणाच्या पाण्याने आंबेडकर वार्ड, एकता नगर, वार्ड न.३ मध्ये हाहाकार उडविला. सर्व मार्ग बंद झाले. शिरना, वर्धा नदी पूल व पाटाळा येथे माजरी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. १९९४ मध्ये अशा प्रकारचा पूर आला होता. मनगाव व थोराणा गावांचा संपर्क तुटला. राळेगावातील शेतकऱ्यांचे कृषी साहित्य पुरात वाहून गेले. अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे पूर वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पूर नियंत्रण विभागाचे निरीक्षक एम. एस. काकडे यांनी केले.

बामणी-राजुरा मार्ग बंद

बल्लारपूर : चार दिवसांपूर्वी सुरू झालेला बल्लारपूर-राजुरा मार्ग पुरामुळे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता बंद करण्यात आला. किल्ला वॉर्डाकडून विसापूरकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी शिरले. बल्लारपूर पोलीस ठाणे, रेल्वे गोल पुलावर पुराचे पाणी येण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे वस्ती भागातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली.

जुनगावचा संपर्क तुटला

देवाडा बुज (जुनगाव) : वैनगंगेच्या पुराने पोंभुर्णा तालुक्यातील जुनगावचा संपर्क तुटला. देवाडा बुज, जुनगाव, गंगापूर टोक येथील सोयाबीन व कपाशीला जोरदार फटका बसला आहे. जुनगाव हे गाव दोन नद्यांच्या संगमावर असल्याने समस्यांच्या गर्तेत सापडले.

भिंत कोसळल्याने ३ शेळ्या ठार

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील सदाशिव मड़ावी यांच्या घराची भिंत कोसळल्याने दिलीप वलके यांच्या तीन बकऱ्या ठार तर एक जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. मडावी यांच्या घराला लागूनच वलके यांचे घर आहे. शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी वलके यांनी केली.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरchandrapur-acचंद्रपूर