शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

बाम्हणीतील पूर ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

पूर ओसरल्यानंतर तलाठयांच्या चमुने बाम्हणी गावातील बाधीत घरांचे सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात या चमुला बाम्हणीतील ३५० घरांना बाधा पोचली असल्याचे आढळून आले. तर ३९ घरे अंशत: पडली असल्याचे दिसून आले. नुकसानीनुसार या आपदग्रस्तांना लवकरच नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : शुक्रवारी बाम्हणीत पुराच्या पाण्याने घातलेल्या थैमानाने जवळजवळ ३५० घरे बाधित झाली असून ३९ घरे अंशत: पडली आहेत. या पुराने शेकडो एकर शेतातील धान पिकाची नासाडी झाली आहे. पूर ओसरल्यानंतर घरांचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. घरांचे सर्व्हेक्षण आटोपताच शेतीच्या सर्व्हेक्षणास प्रारंभ होणार असल्याचे तहसिलदार मनोहर चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पूर ओसरल्यानंतर तलाठयांच्या चमुने बाम्हणी गावातील बाधीत घरांचे सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात या चमुला बाम्हणीतील ३५० घरांना बाधा पोचली असल्याचे आढळून आले. तर ३९ घरे अंशत: पडली असल्याचे दिसून आले. नुकसानीनुसार या आपदग्रस्तांना लवकरच नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.घरांसोबतच बाम्हणी परिसरातील शेतीचेही या पुराने मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली होती. यावर हजारो रूपयांचा खर्च या शेतकऱ्यांनी केला होता. मात्र शुक्रवारी बिकली शिवारातील तीन चार तलाव व बंधारे ओव्हरफ्लो झाले. यामुळे हे सर्व पाणी बाम्हणी शिवारात व गावात पसरले. या पाण्यामुळे संपूर्ण बाम्हणी हे गाव पाण्याखाली तर आलेच पण त्याचबरोबर बाम्हणी परिसरातील धानाचे रोवणेही या पाण्याखाली आल्याने वाहून गेले. या नुकसानीचेही सर्व्हेक्षण करण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे. प्रशासनाने शेतीच्या झालेल्या नुकसानीची दखल घेतली असून घरांचे सर्व्हेक्षण आटोपताच महसूल विभागाचे कर्मचारी शेतीचेही सर्व्हेक्षण करणार असल्याची माहिती नागभीडचे तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.बाम्हणीसोबतच विलम, चिखलपरसोडी, चिकमारा, भिकेश्वर, बालापूर खुर्द, नवखळा, बोथली, जिवनापूर, टेकरी, पेंढरी व तळोधी रा.नि.मंडळातील काही गावांना या अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला असल्याची माहितीही तहसिलदार चव्हाण यांनी यावेळी दिली. सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचा अहवाल शासनाला सादर होईल. त्यानंतर मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर