शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

पाच दिवसांच्या पावसाची जिल्ह्याला झड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:43 IST

चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्धा नदीसह अन्य लहान नद्या व नाल्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका शेतपिकाला बसला आहे. यासोबतच सावली तालुक्यात एक जिवितहानी, ब्रह्मपुरी तालुक्यात एक जनावर दगावले.

ठळक मुद्देसर्वाधिक ८ हजार १५१ हेक्टरातील कपाशीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्धा नदीसह अन्य लहान नद्या व नाल्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका शेतपिकाला बसला आहे. यासोबतच सावली तालुक्यात एक जिवितहानी, ब्रह्मपुरी तालुक्यात एक जनावर दगावले. तसेच ३१९ घरांची पडझड झाली, तर १४ गोठे बाधित झाल्याचा शासकीय अंदाज आहे.दि. १५ आॅगस्टपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले. तेव्हापासून पावसाने पिच्छा सोडलेला नाही. कधी रिमझिम, तर कधी मुसळधार अशी संततधार सुरू आहे. यामुळे वर्धा पैनगंगा नदीपरिसरातील नाल्यांना आलेल्या पुराचा फटका बल्लारपूर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी या तालुक्यांना बसला आहे. या पाच तालुक्यातील ११ हजार ७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यातही सर्वाधिक फटका बल्लारपूर तालुक्याला बसला आहे. बल्लारपूर तालुक्यातील ४ हजार ७१० हेक्टरातील पिकांचे नुकसान झाल्याची शासकीय माहिती आहे.जिल्ह्यात ११ हजार ७४ हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले. यामध्ये सर्वाधिक ८ हजार १५३ हेक्टरातील कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले आहेत, तर १ हजार ३१२ हेक्टरातील सोयाबीन, ८३० हेक्टरातील धानपिक व ७७९ हेक्टरातील तुर पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये २ हजार ३३५ हेक्टरात ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झाले असून ८ हजार ७३९ हेक्टरात ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. राजुरा, कोरपना व गोंडपिपरी तालुक्याला पूर व बॅक वॉटरचा फटका बसला. राजुरा तालुक्यात २ हजार ७७ हेक्टर, कोरपना ३ हजार १६० हेक्टर व गोंडपिपरी तालुक्यात १ हजार १२७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे मुख्य रस्त्यांची चाळणी झाली आहे.इरईच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढपावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प समाधानकारक भरले आहे. चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पगड्डीगुड्डम, डोंगरगाव व आसोलामेंढा हे सात प्रकल्प १०० टक्के भरले आहेत, तर इरई प्रकल्पात समाधानकारक म्हणजेच ६७.३६, लालनाला ९५.७७, घोडाझरी ५३.४९ व नलेश्वर प्रकल्प ८७.८६ टक्के भरला आहे.पांढरकवड्यात पिके कुजलीपांढरकवडा: वर्धा- पैनगंगा नदीच्या पूरामुळे पांढरकवडा परिसरातील सोयाबीन कापूस, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराचा गाळ शेतात वाहून आल्याने पिके कुजली आहे. नदीकाठावरील शेतीला सर्वात मोठा फटका बसला. शेतकरी हैराण झाले आहे. कृषी विभागाकडून पाहणी सुरु करण्यात आली. अहवाल तयार करुन पाठविणार, अशी माहिती तलाठ्याने दिली आहे.पुरामुळे जनजीवन विस्कळीतचिमूर : मुसळधार पावसाने तालुक्यातील शेकडो एकर शेतीला फटका बसला. पुरामुळे मंगळवारी सकाळी खडसंगी-मुरपार, भान्सुली, पिंपळगाव, डोमा, खापरी , कान्हाळगाव म्हसली, मासळ तुकुम व केसलाबोडी गावांचे मार्ग काही तास बंद होते. नागरिक व विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. मुसळधार पाऊस व वादळाने काही गावांतील मातीच्या घरांची पडझड झाली आहे. चिमूर ते कांपा राष्ट्रीय महामार्गावरील जांभूळघाट शासकीय आश्रम शाळेजवळ मोठे झाड कोसळले. पुराचे पाणी वाढल्याने चिमूर-मासळ , पळसगाव-सिंदेवाही मार्ग दुपारपर्यंत बंद होते. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर