शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

पाच दिवसांच्या पावसाची जिल्ह्याला झड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:43 IST

चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्धा नदीसह अन्य लहान नद्या व नाल्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका शेतपिकाला बसला आहे. यासोबतच सावली तालुक्यात एक जिवितहानी, ब्रह्मपुरी तालुक्यात एक जनावर दगावले.

ठळक मुद्देसर्वाधिक ८ हजार १५१ हेक्टरातील कपाशीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्धा नदीसह अन्य लहान नद्या व नाल्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका शेतपिकाला बसला आहे. यासोबतच सावली तालुक्यात एक जिवितहानी, ब्रह्मपुरी तालुक्यात एक जनावर दगावले. तसेच ३१९ घरांची पडझड झाली, तर १४ गोठे बाधित झाल्याचा शासकीय अंदाज आहे.दि. १५ आॅगस्टपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले. तेव्हापासून पावसाने पिच्छा सोडलेला नाही. कधी रिमझिम, तर कधी मुसळधार अशी संततधार सुरू आहे. यामुळे वर्धा पैनगंगा नदीपरिसरातील नाल्यांना आलेल्या पुराचा फटका बल्लारपूर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी या तालुक्यांना बसला आहे. या पाच तालुक्यातील ११ हजार ७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यातही सर्वाधिक फटका बल्लारपूर तालुक्याला बसला आहे. बल्लारपूर तालुक्यातील ४ हजार ७१० हेक्टरातील पिकांचे नुकसान झाल्याची शासकीय माहिती आहे.जिल्ह्यात ११ हजार ७४ हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले. यामध्ये सर्वाधिक ८ हजार १५३ हेक्टरातील कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले आहेत, तर १ हजार ३१२ हेक्टरातील सोयाबीन, ८३० हेक्टरातील धानपिक व ७७९ हेक्टरातील तुर पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये २ हजार ३३५ हेक्टरात ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झाले असून ८ हजार ७३९ हेक्टरात ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. राजुरा, कोरपना व गोंडपिपरी तालुक्याला पूर व बॅक वॉटरचा फटका बसला. राजुरा तालुक्यात २ हजार ७७ हेक्टर, कोरपना ३ हजार १६० हेक्टर व गोंडपिपरी तालुक्यात १ हजार १२७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे मुख्य रस्त्यांची चाळणी झाली आहे.इरईच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढपावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प समाधानकारक भरले आहे. चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पगड्डीगुड्डम, डोंगरगाव व आसोलामेंढा हे सात प्रकल्प १०० टक्के भरले आहेत, तर इरई प्रकल्पात समाधानकारक म्हणजेच ६७.३६, लालनाला ९५.७७, घोडाझरी ५३.४९ व नलेश्वर प्रकल्प ८७.८६ टक्के भरला आहे.पांढरकवड्यात पिके कुजलीपांढरकवडा: वर्धा- पैनगंगा नदीच्या पूरामुळे पांढरकवडा परिसरातील सोयाबीन कापूस, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराचा गाळ शेतात वाहून आल्याने पिके कुजली आहे. नदीकाठावरील शेतीला सर्वात मोठा फटका बसला. शेतकरी हैराण झाले आहे. कृषी विभागाकडून पाहणी सुरु करण्यात आली. अहवाल तयार करुन पाठविणार, अशी माहिती तलाठ्याने दिली आहे.पुरामुळे जनजीवन विस्कळीतचिमूर : मुसळधार पावसाने तालुक्यातील शेकडो एकर शेतीला फटका बसला. पुरामुळे मंगळवारी सकाळी खडसंगी-मुरपार, भान्सुली, पिंपळगाव, डोमा, खापरी , कान्हाळगाव म्हसली, मासळ तुकुम व केसलाबोडी गावांचे मार्ग काही तास बंद होते. नागरिक व विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. मुसळधार पाऊस व वादळाने काही गावांतील मातीच्या घरांची पडझड झाली आहे. चिमूर ते कांपा राष्ट्रीय महामार्गावरील जांभूळघाट शासकीय आश्रम शाळेजवळ मोठे झाड कोसळले. पुराचे पाणी वाढल्याने चिमूर-मासळ , पळसगाव-सिंदेवाही मार्ग दुपारपर्यंत बंद होते. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर