शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

५६ वर्षांत पहिल्यांदाच विहिरी आटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:15 IST

तालुक्यातील चितेगाव येथील विहिरी तब्बल ५६ वर्षानंतर पहिल्यांदाच आटल्या. त्यासोबतच गावात नदीद्वारे पाणी पुरवठा करणारी योजना देखील कुचकामी ठरली आहे. परिणामी चितेगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांनी पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्देचितेगावात पहिल्यांदाच भीषण पाणी टंचाई : पाण्यासाठी नागरिकांची पायपीट

राजू गेडाम।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील चितेगाव येथील विहिरी तब्बल ५६ वर्षानंतर पहिल्यांदाच आटल्या. त्यासोबतच गावात नदीद्वारे पाणी पुरवठा करणारी योजना देखील कुचकामी ठरली आहे. परिणामी चितेगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांनी पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.मूल तालुक्यातील चितेगावची लोकसंख्या १२९६ आहे. या गावात ११ विहिरी, १० बोअरवेल व नदीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जनतेनी १०० नळाचे कनेक्शन घेतले आहेत. आजपर्यंत या गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत होता. मात्र ५६ वर्षानंतर यावर्षी पहिल्यांदाच विहिरी पूर्णत: आटल्या. बोअरवेलच्या पाण्याची पातळी खाली जात आहे. गावात शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ज्या विहिरीतून पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्याच विहिर कोरडी पडल्याने शुद्ध पाण्याची योजना फसली.गावात नदीपासून नळापासून पाणी पुरवठा करणारी योजना सुरु होती. मात्र नदीतील विहिरच पूर्णत: आटल्याने दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांचे पाण्यासाठी हाल होताना दिसून येत आहेत. या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने पाण्याची पातळी खालावली असून नदीतील पाण्याची टाकी कोरडी पडली असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.सद्यास्थितीत एप्रिल महिन्यातच चितेगाव येथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असल्याने मे महिन्यात पाण्याचे मोठे संकट उद्भवण्याचे चित्र दिसून येत आहे. अशीच परिस्थीती परिसरातील गावात निर्माण होण्याअगोदर पाण्याचे नियोजन करावे, तसेच चितेगाववासियांसाठी पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी चितेगाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे.गावातील विहिरी आटत असल्याने पाण्याची समस्या गावात भेडसावत आहे. एवढ्या वर्षानंतर प्रथमच विहिरी आटत असल्याने भविष्याची चिंता निर्माण सतावत आहे. दैनंदिन कामासाठी देखील पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कपडे धुण्यासाठी गावापासून २ ते ३ किमी अंतरावरील नदीवर जावे लागत आहे.- विमलताई पुराणे,चितेगावपाण्याची पातळी खाली गेल्याने चितेगावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाय योजना सुरू आहे. खासगी विहिरी अधिग्रहण करून पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पाण्याची टंचाई भासणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न केला जाईल.- सुजित येरोजवार,ग्रामसेवक, चितेगाव 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई