शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

५६ वर्षांत पहिल्यांदाच विहिरी आटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:15 IST

तालुक्यातील चितेगाव येथील विहिरी तब्बल ५६ वर्षानंतर पहिल्यांदाच आटल्या. त्यासोबतच गावात नदीद्वारे पाणी पुरवठा करणारी योजना देखील कुचकामी ठरली आहे. परिणामी चितेगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांनी पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्देचितेगावात पहिल्यांदाच भीषण पाणी टंचाई : पाण्यासाठी नागरिकांची पायपीट

राजू गेडाम।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील चितेगाव येथील विहिरी तब्बल ५६ वर्षानंतर पहिल्यांदाच आटल्या. त्यासोबतच गावात नदीद्वारे पाणी पुरवठा करणारी योजना देखील कुचकामी ठरली आहे. परिणामी चितेगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांनी पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.मूल तालुक्यातील चितेगावची लोकसंख्या १२९६ आहे. या गावात ११ विहिरी, १० बोअरवेल व नदीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जनतेनी १०० नळाचे कनेक्शन घेतले आहेत. आजपर्यंत या गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत होता. मात्र ५६ वर्षानंतर यावर्षी पहिल्यांदाच विहिरी पूर्णत: आटल्या. बोअरवेलच्या पाण्याची पातळी खाली जात आहे. गावात शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ज्या विहिरीतून पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्याच विहिर कोरडी पडल्याने शुद्ध पाण्याची योजना फसली.गावात नदीपासून नळापासून पाणी पुरवठा करणारी योजना सुरु होती. मात्र नदीतील विहिरच पूर्णत: आटल्याने दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांचे पाण्यासाठी हाल होताना दिसून येत आहेत. या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने पाण्याची पातळी खालावली असून नदीतील पाण्याची टाकी कोरडी पडली असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.सद्यास्थितीत एप्रिल महिन्यातच चितेगाव येथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असल्याने मे महिन्यात पाण्याचे मोठे संकट उद्भवण्याचे चित्र दिसून येत आहे. अशीच परिस्थीती परिसरातील गावात निर्माण होण्याअगोदर पाण्याचे नियोजन करावे, तसेच चितेगाववासियांसाठी पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी चितेगाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे.गावातील विहिरी आटत असल्याने पाण्याची समस्या गावात भेडसावत आहे. एवढ्या वर्षानंतर प्रथमच विहिरी आटत असल्याने भविष्याची चिंता निर्माण सतावत आहे. दैनंदिन कामासाठी देखील पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कपडे धुण्यासाठी गावापासून २ ते ३ किमी अंतरावरील नदीवर जावे लागत आहे.- विमलताई पुराणे,चितेगावपाण्याची पातळी खाली गेल्याने चितेगावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाय योजना सुरू आहे. खासगी विहिरी अधिग्रहण करून पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पाण्याची टंचाई भासणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न केला जाईल.- सुजित येरोजवार,ग्रामसेवक, चितेगाव 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई