शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपुरात साकारले जिल्ह्यातील पहिले मॉडेल ग्राम सचिवालय

By admin | Updated: June 22, 2015 01:08 IST

इच्छाशक्तीच्या बळावर काहीही होवू शकते. याच ईच्छाशक्तीच्या भरवशावर चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मॉडेल ग्रामसचिवालयाची वास्तू साकार झाली आहे.

मानाचा तुरा : अत्याधुनिक व वातानुकूलित सोयी उपलब्ध अमोद गौरकार  शंकरपूरइच्छाशक्तीच्या बळावर काहीही होवू शकते. याच ईच्छाशक्तीच्या भरवशावर चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मॉडेल ग्रामसचिवालयाची वास्तू साकार झाली आहे. अत्याधुनिक व वातानुकूलित सुविधेने हे ग्रामसचिवालय परिपूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील हे पहिलेच ग्राम सचिवालय आहे.शंकरपूर हे गाव १२ हजार लोकवस्तीचे आहे. या गावचा विकास ग्रामपंचायती मार्फत होत आहे. या गावातील सर्व रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण व डांबरीकरणने तयार झाले आहे. ९० टक्के गाव हागणदारीमुक्त झाले आहे. तर शासकीय इमारती, सभागृह, लॉन बांधून तयार आहेत. तीन मजली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाची आकर्षक वास्तू बांधण्यात आली आहे. खाली दोन्ही माळे बेरोजगार युवकांसाठी उद्योग लावण्यासाठी देण्यात आले आहे, तर वरच्या माळ्यात न्यायायशाळा व अभ्यासकेंद्र उभारण्यात आले आहे.सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या गावात महाराष्ट्रात नसेल असे ग्रामसचिवालय निर्माण करण्याचा मानस ग्रामपंचायतीचे नेतृत्व करणारे जि.प. सदस्य डॉ. सतिश वारजूकर यांनी केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी जि.प.कडून निधी प्राप्त केला आहे. जुन्या असलेल्या ग्रामसचिवालयावरच दुसऱ्या माळ्याचे बांधकाम सुरु केले. सर्वप्रथम सरपंचाची खोली, कर्मचाऱ्यांची खोली, ग्रामविस्तार अधिकाऱ्याची खोली आणि मिटींग हॉल बांधण्यात आले. या सर्व खोल्यांमध्ये वातानुकुलित यंत्रणा लावण्यात आली आहे. यासोबतच हे ग्रामसचिवालय संगणकाशी जोडण्यात आले आहे. येथील टेबल, खुर्च्या, बैठक व्यवस्था अत्याधुनिक आहे. सचिवालय पाहणारा नागरिक काही क्षणासाठी का होईना अचंबीत होतो.जग इंटरनेटशी जोडल्या जात आहे. त्यामुळे हे ग्रामसचिवालय जगाशी जोडण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वत:चे वायफाय नेटवर्क गावात स्थापन केले आहे. त्यामुळे आगामी काळात ग्रामसचिवालय पेपरलेस करण्याचा मानस आहे. याच ग्रामसचिवालयात दोन खाटेचे विश्रामगृह बांधण्यात आले आहे. गावाशेजारी पर्यटनस्थळ आहे. या पर्यटनस्थळाला बघण्यासाठी पर्यटक येत असतात. त्यांना राहण्यासाठी व गावातील पाहुण्यांना राहण्यासाठी उत्तम व्यवस्था या विश्रामगृहात केली आहे. या विश्रामगृहाचे महात्मा ज्योतिबा फुले असे नामकरणही करण्यात आले आहे. गावातील कारभार सांभाळण्यासाठी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. परंतु प्रत्येक गावात दोन खोल्यांची ग्रामपंचायत आहे. तेथूनच ते गावाचा कारभार सांभाळल्या जातो. परंतु ईच्छाशक्ती असेल तर ग्रामपंचायत भवन असेही असू शकते, हे शंकरपूर ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहे. एकूणच जिल्ह्यातील पहिलेवहिले हे ग्रामसचिवालय ठरले आहे.