शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

शंकरपुरात साकारले जिल्ह्यातील पहिले मॉडेल ग्राम सचिवालय

By admin | Updated: June 22, 2015 01:08 IST

इच्छाशक्तीच्या बळावर काहीही होवू शकते. याच ईच्छाशक्तीच्या भरवशावर चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मॉडेल ग्रामसचिवालयाची वास्तू साकार झाली आहे.

मानाचा तुरा : अत्याधुनिक व वातानुकूलित सोयी उपलब्ध अमोद गौरकार  शंकरपूरइच्छाशक्तीच्या बळावर काहीही होवू शकते. याच ईच्छाशक्तीच्या भरवशावर चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मॉडेल ग्रामसचिवालयाची वास्तू साकार झाली आहे. अत्याधुनिक व वातानुकूलित सुविधेने हे ग्रामसचिवालय परिपूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील हे पहिलेच ग्राम सचिवालय आहे.शंकरपूर हे गाव १२ हजार लोकवस्तीचे आहे. या गावचा विकास ग्रामपंचायती मार्फत होत आहे. या गावातील सर्व रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण व डांबरीकरणने तयार झाले आहे. ९० टक्के गाव हागणदारीमुक्त झाले आहे. तर शासकीय इमारती, सभागृह, लॉन बांधून तयार आहेत. तीन मजली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाची आकर्षक वास्तू बांधण्यात आली आहे. खाली दोन्ही माळे बेरोजगार युवकांसाठी उद्योग लावण्यासाठी देण्यात आले आहे, तर वरच्या माळ्यात न्यायायशाळा व अभ्यासकेंद्र उभारण्यात आले आहे.सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या गावात महाराष्ट्रात नसेल असे ग्रामसचिवालय निर्माण करण्याचा मानस ग्रामपंचायतीचे नेतृत्व करणारे जि.प. सदस्य डॉ. सतिश वारजूकर यांनी केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी जि.प.कडून निधी प्राप्त केला आहे. जुन्या असलेल्या ग्रामसचिवालयावरच दुसऱ्या माळ्याचे बांधकाम सुरु केले. सर्वप्रथम सरपंचाची खोली, कर्मचाऱ्यांची खोली, ग्रामविस्तार अधिकाऱ्याची खोली आणि मिटींग हॉल बांधण्यात आले. या सर्व खोल्यांमध्ये वातानुकुलित यंत्रणा लावण्यात आली आहे. यासोबतच हे ग्रामसचिवालय संगणकाशी जोडण्यात आले आहे. येथील टेबल, खुर्च्या, बैठक व्यवस्था अत्याधुनिक आहे. सचिवालय पाहणारा नागरिक काही क्षणासाठी का होईना अचंबीत होतो.जग इंटरनेटशी जोडल्या जात आहे. त्यामुळे हे ग्रामसचिवालय जगाशी जोडण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वत:चे वायफाय नेटवर्क गावात स्थापन केले आहे. त्यामुळे आगामी काळात ग्रामसचिवालय पेपरलेस करण्याचा मानस आहे. याच ग्रामसचिवालयात दोन खाटेचे विश्रामगृह बांधण्यात आले आहे. गावाशेजारी पर्यटनस्थळ आहे. या पर्यटनस्थळाला बघण्यासाठी पर्यटक येत असतात. त्यांना राहण्यासाठी व गावातील पाहुण्यांना राहण्यासाठी उत्तम व्यवस्था या विश्रामगृहात केली आहे. या विश्रामगृहाचे महात्मा ज्योतिबा फुले असे नामकरणही करण्यात आले आहे. गावातील कारभार सांभाळण्यासाठी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. परंतु प्रत्येक गावात दोन खोल्यांची ग्रामपंचायत आहे. तेथूनच ते गावाचा कारभार सांभाळल्या जातो. परंतु ईच्छाशक्ती असेल तर ग्रामपंचायत भवन असेही असू शकते, हे शंकरपूर ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहे. एकूणच जिल्ह्यातील पहिलेवहिले हे ग्रामसचिवालय ठरले आहे.