शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट नाही म्हणून भरला 38 लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST

विनाहेल्मेट चालविणाऱ्या ७ हजार ५८५ जणांवर वर्षभरात कारवाई करून ३७ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात केला आहे. यापैकी १२५४ जणांनी सहा लाख २७ हजार रुपयांचा दंड भरला आहे. तर ३१ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दंड अनपेड आहे.  वाहतूक नियमांबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तरीसुद्धा अनेकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन स्वत:सह इतराचा जीव धोक्यात घालतात.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाहनाच्या अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करुनच वाहन चालवावे, याबाबत वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र तरीसुद्धा अनेकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवित असल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिसांनी वर्षभरात तीन कोटी १४ लाख ५७ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये विनाहेल्मेट चालविणाऱ्या ७ हजार ५८५ जणांवर वर्षभरात कारवाई करून ३७ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात केला आहे. यापैकी १२५४ जणांनी सहा लाख २७ हजार रुपयांचा दंड भरला आहे. तर ३१ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दंड अनपेड आहे. वाहतूक नियमांबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तरीसुद्धा अनेकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन स्वत:सह इतराचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मट, विनापरवाना, ट्रीपलसीट, मोबाईलवर बोलणे आदी विविध वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी अलीकडेच सुरु झालेली आहे. यादरम्यान         वाहनचालक तीनदा विनाहेल्मेट आढळून आल्यास चक्क परवानाच रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे वाहनचालकाला मोठे महागात पडणार आहे. 

नवीन कायद्याची अंमलबजावणीकेंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी जिल्ह्यात अलीकडेच सुरु झाली आहे. या कायद्यांतर्गत दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तीनदा विनाहेल्मेट आढळून आल्यास परवानाच रद्द होणार आहे.

लॉकडाऊनमुळे दंडवसुली घटली कोरोनामुळे मागील दोन वर्षे लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडणे बंद होते. त्यामुळे दंडवसुली घटली होती. मात्र पुन्हा कारवाई सुरु केली आहे.

नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास दंडाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार नाही. आता नव्या मोटार वाहन कायद्याची अमंलबजावणी सुरु झाल्याने दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. परवाना रद्दसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करुन वाहन चालवावे.-प्रवीणकुमार पाटील, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस