शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:18 IST

सिगल व थ्री फेज नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी यापुढे हजार ते अडीच हजारांपर्यंत बाजारात विकत मिळत असलेली ईएलसीबी उपकरण लावणे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने अनिवार्य केल्याने ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

ठळक मुद्देईएलसीबी उपकरणाची सक्ती : नव्या नियमामुळे वीज ग्राहक वैतागले

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : सिगल व थ्री फेज नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी यापुढे हजार ते अडीच हजारांपर्यंत बाजारात विकत मिळत असलेली ईएलसीबी उपकरण लावणे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने अनिवार्य केल्याने ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.विद्युत निरीक्षक मंडळाने याबाबत सूचना निर्गमित केल्याने आर्थिक भुर्दंड सोसून ईएलसीबी लावणे अत्यावश्यक ठरले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनिमय २०१० च्या क्र. ४२ प्रमाणे सिंगल फेज व थ्री फेज नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना ईएलसीबी जोडणी करारनामा असणे अनिवार्य केल्याने ग्राहक अडचणीत सापडले आहेत.ए वन फॉर्मसोबत जोडण्यात आलेल्या विद्युत कंत्राटदाराच्या चाचणी अहवालात वीज दाबाला अनुसरून योग्य क्षमतेची ईएलसीबी लावल्याचा उल्लेख असणे आवश्यक केले आहे.नवीन विद्युत कनेक्शन घेताना यापूर्वी ईएलसीबीची आवश्यकता नसल्याने सरसकट विद्युत कनेक्शन दिले जात होते. मात्र केंद्रीय विद्युत प्राधिकरण मंडळाने याबाबत सबंधित विद्युत मंडळाच्या विभाग व उपविभागांना पत्र पाठवून ईएलसीबीशिवाय नवीन कनेक्शन न देण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसून ईएलसीबी लावणे अत्यावश्यक झाले आहे.ग्राहकांचे हित लक्षात घेऊन या संदर्भात निर्णय घेतल्याचे विद्युत कंपनीचे म्हणणे असले तरी आर्थिक भार ग्राहकांना सोसावा लागणार असल्याने नाराजीचा सूर दिसत आहे. ग्राहकांचा हिताच्या दृष्टीने विद्युत कंपनी कार्य करीत नसून महागाईच्या काळात आर्थिक झळ पोहचविण्याचे काम कंपनी करीत असल्याचा आरोप केला जात आहे.कपंनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कंपनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवित असल्याचा आरोप केला जात आहे. वीज वितरण कंपनीने ईएलसीबीची अट रद्द करण्याची मागणी आहे.ग्राहकांचे हित लक्षात घेऊ न ईएलसीबीची नवीन कनेक्शनसाठी अट घातली आहे. घरात केलेली फिटींगमध्ये ४ ते ५ वर्षांनी बदल होत असल्याने वायरिंग फाल्ट अथवा अर्थिंगचा धोका कायम असतो. अनवधनाने काही अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईएलसीबीने काही बिघाड असेल तर तो त्वरित कळतो. आणि धोका टाळला जाऊ शकतो. कंपनीने केलेली ईएलसीबीची सक्ती ग्राहकांच्या हितासाठीच आहे.-चंदन चौरसिया,उपकार्यकारी अभियंता,म. रा. वि. कंपनी, उपविभागीय मूल