शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:18 IST

सिगल व थ्री फेज नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी यापुढे हजार ते अडीच हजारांपर्यंत बाजारात विकत मिळत असलेली ईएलसीबी उपकरण लावणे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने अनिवार्य केल्याने ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

ठळक मुद्देईएलसीबी उपकरणाची सक्ती : नव्या नियमामुळे वीज ग्राहक वैतागले

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : सिगल व थ्री फेज नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी यापुढे हजार ते अडीच हजारांपर्यंत बाजारात विकत मिळत असलेली ईएलसीबी उपकरण लावणे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने अनिवार्य केल्याने ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.विद्युत निरीक्षक मंडळाने याबाबत सूचना निर्गमित केल्याने आर्थिक भुर्दंड सोसून ईएलसीबी लावणे अत्यावश्यक ठरले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनिमय २०१० च्या क्र. ४२ प्रमाणे सिंगल फेज व थ्री फेज नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना ईएलसीबी जोडणी करारनामा असणे अनिवार्य केल्याने ग्राहक अडचणीत सापडले आहेत.ए वन फॉर्मसोबत जोडण्यात आलेल्या विद्युत कंत्राटदाराच्या चाचणी अहवालात वीज दाबाला अनुसरून योग्य क्षमतेची ईएलसीबी लावल्याचा उल्लेख असणे आवश्यक केले आहे.नवीन विद्युत कनेक्शन घेताना यापूर्वी ईएलसीबीची आवश्यकता नसल्याने सरसकट विद्युत कनेक्शन दिले जात होते. मात्र केंद्रीय विद्युत प्राधिकरण मंडळाने याबाबत सबंधित विद्युत मंडळाच्या विभाग व उपविभागांना पत्र पाठवून ईएलसीबीशिवाय नवीन कनेक्शन न देण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसून ईएलसीबी लावणे अत्यावश्यक झाले आहे.ग्राहकांचे हित लक्षात घेऊन या संदर्भात निर्णय घेतल्याचे विद्युत कंपनीचे म्हणणे असले तरी आर्थिक भार ग्राहकांना सोसावा लागणार असल्याने नाराजीचा सूर दिसत आहे. ग्राहकांचा हिताच्या दृष्टीने विद्युत कंपनी कार्य करीत नसून महागाईच्या काळात आर्थिक झळ पोहचविण्याचे काम कंपनी करीत असल्याचा आरोप केला जात आहे.कपंनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कंपनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवित असल्याचा आरोप केला जात आहे. वीज वितरण कंपनीने ईएलसीबीची अट रद्द करण्याची मागणी आहे.ग्राहकांचे हित लक्षात घेऊ न ईएलसीबीची नवीन कनेक्शनसाठी अट घातली आहे. घरात केलेली फिटींगमध्ये ४ ते ५ वर्षांनी बदल होत असल्याने वायरिंग फाल्ट अथवा अर्थिंगचा धोका कायम असतो. अनवधनाने काही अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईएलसीबीने काही बिघाड असेल तर तो त्वरित कळतो. आणि धोका टाळला जाऊ शकतो. कंपनीने केलेली ईएलसीबीची सक्ती ग्राहकांच्या हितासाठीच आहे.-चंदन चौरसिया,उपकार्यकारी अभियंता,म. रा. वि. कंपनी, उपविभागीय मूल