शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत द्यावी

By admin | Updated: June 22, 2017 00:43 IST

राज्यात साप हा वन्य प्राणी असल्यामुळे त्याला पकडण्यास आणि मारण्यास बंदी आहे.

वामनराव चटप : पालकमंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात साप हा वन्य प्राणी असल्यामुळे त्याला पकडण्यास आणि मारण्यास बंदी आहे. परंतु, विषारी सापांच्या दंशाने तातडीने वैद्यकीय मदत न मिळाल्यास मृत्यू अटळ आहे. म्हणुन सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या अथवा नागरिकांच्या वारसांना इतर वन्य प्राण्यांप्रमाणे देय असलेली आर्थीक मदत देण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेवून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. वानमनराव चटप यांनी राज्य सरकारकडे केली आहे.सन २०१३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख दशरथ कान्होबा बोबडे साप चावून मरणाऱ्या शेतकऱ्यास इतर वन्य प्राण्यांप्रमाणे आर्थिक अनुदान, मदत मिळावी, यासाठी वणी येथे उपोषण केले होते. त्यानंतर माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी ग्रामीण भागात अत्यंत जिव्हाळ्याची असलेली ही समस्या राज्याचे तत्कालीन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचकडे उपस्थित केली होती. तेव्हा अशी मदत दिली जाईल, असे डॉ. कदम यांनी घोषित केले होते. वनखात्याच्या उच्चस्तरीय समितीनेही आर्थिक मदत देण्याचे मान्य केले होते. हा प्रस्ताव वनखात्याकडून अर्थ व नियोजन खात्याकडे आल्यानंतर इतर राज्यात काय व्यवस्था आहे, हे बघून शासनाने मदत देण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशा शेऱ्यासह वनखात्याकडे प्रस्ताव परत आला होता. यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार येवून ३१ महीने झाले आहे. परंतु, या राज्यातील सत्ता परिवर्तनानंतरही अशी मदत देणारा शासन निर्णय अद्यापही झालेला नाही. याकडेही अ‍ॅड. चटप यांनी लक्ष केले आहे.राज्य सरकारने इतर वन्य प्राण्याप्रमाणे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना न्यायोचित असलेली अथवा वन्य प्राण्यांप्रमाणेच देय असलेली आर्र्थिक मदत द्यावी. यासाठी सरकारने तातडीने धोरणात्मक निर्णय घेवून परिपत्रक काढावे, आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फ डणविस व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनातून केली आहे.