शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत द्यावी

By admin | Updated: June 22, 2017 00:43 IST

राज्यात साप हा वन्य प्राणी असल्यामुळे त्याला पकडण्यास आणि मारण्यास बंदी आहे.

वामनराव चटप : पालकमंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात साप हा वन्य प्राणी असल्यामुळे त्याला पकडण्यास आणि मारण्यास बंदी आहे. परंतु, विषारी सापांच्या दंशाने तातडीने वैद्यकीय मदत न मिळाल्यास मृत्यू अटळ आहे. म्हणुन सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या अथवा नागरिकांच्या वारसांना इतर वन्य प्राण्यांप्रमाणे देय असलेली आर्थीक मदत देण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेवून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. वानमनराव चटप यांनी राज्य सरकारकडे केली आहे.सन २०१३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख दशरथ कान्होबा बोबडे साप चावून मरणाऱ्या शेतकऱ्यास इतर वन्य प्राण्यांप्रमाणे आर्थिक अनुदान, मदत मिळावी, यासाठी वणी येथे उपोषण केले होते. त्यानंतर माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी ग्रामीण भागात अत्यंत जिव्हाळ्याची असलेली ही समस्या राज्याचे तत्कालीन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचकडे उपस्थित केली होती. तेव्हा अशी मदत दिली जाईल, असे डॉ. कदम यांनी घोषित केले होते. वनखात्याच्या उच्चस्तरीय समितीनेही आर्थिक मदत देण्याचे मान्य केले होते. हा प्रस्ताव वनखात्याकडून अर्थ व नियोजन खात्याकडे आल्यानंतर इतर राज्यात काय व्यवस्था आहे, हे बघून शासनाने मदत देण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशा शेऱ्यासह वनखात्याकडे प्रस्ताव परत आला होता. यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार येवून ३१ महीने झाले आहे. परंतु, या राज्यातील सत्ता परिवर्तनानंतरही अशी मदत देणारा शासन निर्णय अद्यापही झालेला नाही. याकडेही अ‍ॅड. चटप यांनी लक्ष केले आहे.राज्य सरकारने इतर वन्य प्राण्याप्रमाणे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना न्यायोचित असलेली अथवा वन्य प्राण्यांप्रमाणेच देय असलेली आर्र्थिक मदत द्यावी. यासाठी सरकारने तातडीने धोरणात्मक निर्णय घेवून परिपत्रक काढावे, आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फ डणविस व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनातून केली आहे.