शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

मूल महामार्ग बांधणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

मूल हायवे संदर्भात वारंवार सूचना करूनदेखील संबंधित कंत्राटदार लक्ष देत नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर मंगळवारी रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये महामार्गाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी व अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : अपघातासाठी कंत्राटदाराला दोषी ठरविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वारंवार सूचना देऊनही प्रलंबित कामे पूर्ण होत नसेल, तर मूल हायवेवरील अपघातासाठी यापुढे संबंधित कंत्राटदाराला दोषी पकडण्यात यावे. या संदर्भातील तक्रारी संबंधित पोलीस विभागाला देण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी दिले.मूल हायवे संदर्भात वारंवार सूचना करूनदेखील संबंधित कंत्राटदार लक्ष देत नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर मंगळवारी रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये महामार्गाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी व अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मूल महामार्गाच्या कामाला तातडीने पूर्ण करण्यात यावे, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.मूल हायवेवर अनेक ठिकाणी खासगी बांधकाम सुरू असून या बांधकामांना तातडीने पूर्ण करण्यात यावे. तसेच बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकण्यात येऊ नये याबाबतही जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी बजावले आहे. त्यानंतर सदर मार्गाची पाहणी केली. महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने यासंदर्भात कारवाई करून बांधकाम साहित्य रस्त्यावर न टाकण्याचे निर्देश द्यावेत. कारवाई करावी, असेही त्यांनी आज स्पष्ट केले.या बैठकीला मुख्य अभियंता सुषमा सुरवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, महानगर पालिकेचे शहर अभियंता महेश बारई, अभियंता मत्ते, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यादव आदींची उपस्थिती होती.८० टक्के पीक पंचनामे पूर्णपरतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या पंचनामाला बुधवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले आहे. तालुक्यातील विविध शिवारात भेटी देऊन त्यांनी झालेल्या नुकसानाची मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यामध्ये अवकाळी व परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्यांची पिके काढण्यात आलेली नव्हती व नुकसान झालेले आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी विभागाकडून केल्या जात आहेत. कृषी विभागाने सोमपर्यंत ७० टक्के पंचनामे पूर्ण केले होते. उर्वरित पंचनामे दोन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बुधवारपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्यात यावे व अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. उदय पाटील यांना देण्यात आले. बुधवारी सायंकाळपर्यंत राज्यातील सर्व ठिकाणचे पंचनामे तयार होणार आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी