शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
3
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
4
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
5
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
6
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
7
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
8
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
9
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
10
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
11
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
12
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
13
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
14
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
15
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
16
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
17
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
18
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
19
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
20
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मूल महामार्ग बांधणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

मूल हायवे संदर्भात वारंवार सूचना करूनदेखील संबंधित कंत्राटदार लक्ष देत नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर मंगळवारी रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये महामार्गाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी व अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : अपघातासाठी कंत्राटदाराला दोषी ठरविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वारंवार सूचना देऊनही प्रलंबित कामे पूर्ण होत नसेल, तर मूल हायवेवरील अपघातासाठी यापुढे संबंधित कंत्राटदाराला दोषी पकडण्यात यावे. या संदर्भातील तक्रारी संबंधित पोलीस विभागाला देण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी दिले.मूल हायवे संदर्भात वारंवार सूचना करूनदेखील संबंधित कंत्राटदार लक्ष देत नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर मंगळवारी रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये महामार्गाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी व अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मूल महामार्गाच्या कामाला तातडीने पूर्ण करण्यात यावे, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.मूल हायवेवर अनेक ठिकाणी खासगी बांधकाम सुरू असून या बांधकामांना तातडीने पूर्ण करण्यात यावे. तसेच बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकण्यात येऊ नये याबाबतही जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी बजावले आहे. त्यानंतर सदर मार्गाची पाहणी केली. महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने यासंदर्भात कारवाई करून बांधकाम साहित्य रस्त्यावर न टाकण्याचे निर्देश द्यावेत. कारवाई करावी, असेही त्यांनी आज स्पष्ट केले.या बैठकीला मुख्य अभियंता सुषमा सुरवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, महानगर पालिकेचे शहर अभियंता महेश बारई, अभियंता मत्ते, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यादव आदींची उपस्थिती होती.८० टक्के पीक पंचनामे पूर्णपरतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या पंचनामाला बुधवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले आहे. तालुक्यातील विविध शिवारात भेटी देऊन त्यांनी झालेल्या नुकसानाची मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यामध्ये अवकाळी व परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्यांची पिके काढण्यात आलेली नव्हती व नुकसान झालेले आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी विभागाकडून केल्या जात आहेत. कृषी विभागाने सोमपर्यंत ७० टक्के पंचनामे पूर्ण केले होते. उर्वरित पंचनामे दोन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बुधवारपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्यात यावे व अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. उदय पाटील यांना देण्यात आले. बुधवारी सायंकाळपर्यंत राज्यातील सर्व ठिकाणचे पंचनामे तयार होणार आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी