शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

धारोष्ण गाय दूध तपासणीची आकडेवारी बोगस

By admin | Updated: December 18, 2014 22:51 IST

सहा सदस्यीय समिती गठीत करून धारोष्ण गाय दुधाची तपासणी करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश होते. मात्र, पर्यवेक्षकांना पाठवून दुग्ध सोसायटी केंद्रावर शेतकरी दुध उत्पादकाचे नमुने घेण्यात आले.

बी.यू. बोर्डेवार - राजुरासहा सदस्यीय समिती गठीत करून धारोष्ण गाय दुधाची तपासणी करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश होते. मात्र, पर्यवेक्षकांना पाठवून दुग्ध सोसायटी केंद्रावर शेतकरी दुध उत्पादकाचे नमुने घेण्यात आले. त्यामुळे दूध तपासणीची आकडेवारी बोगस असल्याची माहिती आता समोर आली आहे. पर्यवेक्षकांनी दुधाचे नमुने योजनेच्या गुण नियंत्रण कक्षाकडे पाठवून तपासणी अहवाल शासनाला सादर केला. नागपूर विभागात झालेल्या या तपासणीत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, तालुकास्तरीय रसायनशास्त्रज्ञ, जिल्हास्तरीय दुग्ध शाळेतील शाळा रसायन सहाय्यक, स्थानिक शेतकरी, दुध संघाचा प्रतिनिधी हे सर्व व्यक्ती गावामध्ये जाऊन गाईच्या दुधाचे नमुने घ्याला पाहीजे होते. परंतु, नागपूरसह बऱ्याच ठिकाणी नमुने जागेवरच घेण्यात आले आहेत, हे स्पष्ठ होत आहे. काही अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या योजनेला बगल देऊन गाईची तपासणीच केली नाही. त्यामुळे गुणनियंत्रण पत्र क्रमांक २०१२/५४/६२२ नुसार गाय दुधाची विभागवार गुणप्रत तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष काढलेल्या धारोष्ण गाय दुधाची तपासणी करून अहवाल सादर करावयाचा होता. परंतु प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी नागपूर यांना उपआयुक्त दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी पत्र पाठवून प्रत्येक गावातील १० तर प्रत्येक तालुक्यात १०० नमुने घेऊन अहवाल पाठवण्यास सांगितले. परंतु, वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही अद्याप अहवाल मिळाला नसल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे नागपूर विभागातील अधिकारी प्रत्यक्ष गाईचे दुध न काढता दुध डेअरीवरील दुधाचे नमुने घेतल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे शासकीय कार्यक्रमात दुग्ध अधिकारी हयगय करीत असल्याचे निष्पन्न होत आहे.भेसळ प्रतिबंधात्मक कायदा १९५४ नुसार गाईच्या दुधात कमीत कमी ७.५ टक्के फॅट, ८.५ टक्के घनघटक असणे आवश्यक आहे. परंतु, गाईच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ दिसुन येत आहे. शासनाने गुणनियंत्रणात वाढ व्हावी यासाठी दुग्ध विकासासाठी करोडो रुपये खर्च केले. मात्र, या योजनेचा फायदा शेतकरी व सामान्य नागरिकांना पाहीजे त्या प्रमाणात मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठांकडून चौकशी होणे गरजेचे आहे.