शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आमदारांची संघर्ष यात्रा

By admin | Updated: March 30, 2017 00:43 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकरी सन्मानासाठी निघालेली विरोधी पक्षातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांची किसान कर्जमुक्ती संघर्ष यात्रा बुधवारी सिंदेवाहीतून प्रारंभ झाली.

आमदारांचा वाढता सहभाग : टॅ्रव्हल्स आणि कारमधून सुरू झाला प्रवास चंद्रपूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकरी सन्मानासाठी निघालेली विरोधी पक्षातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांची किसान कर्जमुक्ती संघर्ष यात्रा बुधवारी सिंदेवाहीतून प्रारंभ झाली. एक टॅ्रव्हल्स, कार आणि प्रचार रथाचा लवाजमा असलेली ही यात्रा प्रथमच विदर्भातून निघाली असल्याने प्रारंभाला चैतन्याचे वातावरण पहावयास मिळाले.नागपूर मार्गे आमदारांचा ताफा नागभीडमध्ये पोहचल्यावर सकाळी ११ वाजता या यात्रेला रितसर सुरूवात झाली. प्रारंभी १२ आमदारच पोहचले होते. त्यानंतर हा आकडा वाढत जावून १९ वर पोहचला. त्यानंतर ही संख्या २२ वर गेली. चंद्रपुरात यात्रा पोहचली तेव्हा ट्रव्हल्स बसमधील ४० आसने पूर्णत: भरली होती. काही आमदार कारने यात्रेत सहभागी झाले होते.चंद्रपुरात ही यात्रा पोहचल्यावर स्थानिक जनता कॉलेज चौकात माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक आमदारांनी वाहनाखाली उतरून त्यांच्या स्वागताचा स्विकार केला. त्यानंतर याच वाहनात बसून नरेश पुगलिया घुग्घुस मार्गावरील अहमद लॉनवरील कार्यक्रम स्थळी गेले. मात्र त्यानंतर लगेच माघारी वळले. तिथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर हा ताफा घुग्घुस-वणी मार्गे यवतमाळकडे मार्गस्थ झाला. या यात्रेत राज्यभरातील विरोधी आमदारांचा सहभाग असून सिंदेवाही ते पनवेल अशी ही यात्रा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)कानपा येथे नेत्यांचे मार्गदर्शननागभीड: दरम्यान, या संघर्ष यात्रेचे चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेवरील कापना येथे जंगी स्वागत करण्यात आले. आगमन होताच चिमूरचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, जि.प.चे गटनेते डॉ. सतिश वारजुकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पं.स. उपसभापती प्रफुल्ल खापर्डे, पं.स. सभापती रवी देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, उपाध्यक्ष अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माधव बिरजे, कृउबास सभापती घनशश्याम डुकरे, नागभीडचे माजी उपसभापती दिनेश गावंडे यांनी पक्षाचे दुपट्टे व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तत्वपूर्वी या ठिकाणी सभा झाली. सभेला नागभीड व चिमूर तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाईच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती होती. यात आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, डॉ. सतिश वारजुकर, पंजाबराव गावंडे, गोविंद भेंडारकर यांचा समावेश होता.मूल शहरात जंगी स्वागतमूल: मूल शहरातील गांधी चौकात दुपारी १ वाजता यात्रेचे आगमन झाले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अजित पवार यांनी शेतकऱ्यांवरील असलेल्या कर्जातून मुक्ती झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. १९ आमदारांचे निलबं करणाऱ्या सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे यासह विविध घोषणा कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मार्लापण करुन नेतेमंडळींनी कार्यकर्त्याशी चर्चा केली. यावेळी पं. स. सदस्य संजय मारकवार, कृऊबासचे सभपती तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, उपसभापती संदीप कारमवार, माजी सभापती राकेश रत्नावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार, शहराध्यक्ष गंगाधर कुनघाडकर, जिल्हा सचिव गुरुदास गिरडकर, नगरसेवक विनोद कामडी, किशोर घडसे, राजेंद्र कन्नमवार, माजी नगरसेक बाबा अझीम, माजी सरपंच संजय फुलझेले आदी उपस्थित होते.