शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचा वेतनासाठी लढा

By admin | Updated: November 30, 2014 23:01 IST

२००१ पासून कायम-विनाअनुदानित तत्वावर व त्यानंतर आता विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आजही वेतनापासून वंचित आहेत. शासनाने शाळांची खैरात वाटली.

नांदाफाटा : २००१ पासून कायम-विनाअनुदानित तत्वावर व त्यानंतर आता विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आजही वेतनापासून वंचित आहेत. शासनाने शाळांची खैरात वाटली. त्यानंतर अनुदान मिळेल, या आशेने शिक्षक काम करीत आहेत. मात्र, सेवेचे १४ वर्षे उलटूनही वेतन सुरू झाले नसल्याने शिक्षकांवर उपासमारीची पाळी आली आहे. राज्यात जवळपास चार हजार प्राथमिक व माध्यमिक शाळा असून यात उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. त्यात साधारणत: २० हजाराहून अधिक कर्मचारी काम करीत आहे. मध्यल्या काळात शाळांचा कायम शब्द काढल्याने शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यानंतर शासनाने जाचक अटी पुढे करुन शाळांचे मूल्यांकन केले. यात राज्यातील १३०० शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले. मात्र, पाच ते सहा महिने लोटूनही पात्र शाळांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. आजमितीला अनेक शिक्षक वयोमर्यादा पार करण्याच्या वळणावर आहे. त्यांचे विवाह होऊन १० ते १५ वर्ष उलटले. अशातच कुटुंबाचा भार वाहताना त्यांना अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.शासनाने मूल्यांकन करुन ज्या शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविले आहे, त्या शाळांचे पुर्नमूल्यांकन करण्यात येणार असल्याचे विधान नवनियुक्त शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांनी केले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांपुढे चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. गेल्या १४ वर्षांपासून विनावेतन ज्ञार्नाजनाचे काम करणारे शिक्षक हजारो विद्यार्थ्यांना संस्कारीत करीत आहेत. मात्र, त्यांच्या पोटाची खळगी भरली जात नसल्याने वेतनाच्या आशेवर जगावे लागत आहेत. याआधी राज्य विना-अनुदानित कृती समितीने मुंबई येथे आंदोलन केले. यामध्ये शाळांच्या मुल्यांकनाच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे शासनाने शिथीलता दाखवून शाळांना अनुदानाची घोषणा केली. परंतु, आता वेतनच मिळत नसल्याने शिक्षकांपुढे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या शाळांना त्वरीत अनुदान द्यावे या मागणीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार हंसराज अहीर यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. शासनाने विना अनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे. आता सरकारच्या भूमीकेकडे संघटनेचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)