शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

गोठ्याला भीषण आग, दोन गार्इंसह बैलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

पाचगाव येथील गोविंदा मडावी यांचा गावालगत जनावरांचा गोठा आहे. पावसाच्या दिवसात गोठ्या सभोवताल किडे व डासांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शेतकºयाने आगीचे धुपाटणे केले होते. तेवढ्यातच पाऊस सुरू झाल्याने मडावी यांनी लगबगीने जनावरे गोठ्यात बांधून घराकडे गेले. जेवण करून सर्व गावकरी झोपेत असतानाच गोठ्याला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून आग गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी गोठ्याकडे धाव घेतली.

ठळक मुद्देपाचगाव येथील घटना : आगीच्या धुपाटण्याने केला घात

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील पाचगाव येथील (मडावी गुडा) येथे शेतकरी गोविंदा मडावी यांच्या गोठ्याला सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने दोन गायींसह एक बैल व काही कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण आगीत शेतीची अवजारे खत, औषधी जळून खाक ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे. या घटनेत सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.पाचगाव येथील गोविंदा मडावी यांचा गावालगत जनावरांचा गोठा आहे. पावसाच्या दिवसात गोठ्या सभोवताल किडे व डासांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शेतकऱ्याने आगीचे धुपाटणे केले होते. तेवढ्यातच पाऊस सुरू झाल्याने मडावी यांनी लगबगीने जनावरे गोठ्यात बांधून घराकडे गेले. जेवण करून सर्व गावकरी झोपेत असतानाच गोठ्याला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून आग गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी गोठ्याकडे धाव घेतली. उपसरपंच गोपाल जंबुलवार यांनी राजुरा येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने दोन गायींसह एका बैल व काही कोंबड्या होरपळून ठार झाल्या. एक बैल आगीत भाजल्याने गंभीर जखमी झाला. गोठ्यातील कृषी अवजारे, खताच्या २० बॅग जळाल्या. शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून तलाठी बापूजी गेडाम यांनी पंचनामा केला. शासनाने शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी पोलीस पाटील शंकर खामनकर उपसरपंच गोपाल जंबुलवार, रूपेश गेडेकर, रामा आळे, तिरूपती इंदूरवार आदींनी केली आहे.गावकऱ्यांकडून मदतीचा हातऐन शेतीच्या हंगामात गोविंदा मडावी यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती पैसा नसल्याने हंगाम कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, गावकऱ्यांनी दोन तासात १३ हजार ९१३ रूपयांची आर्थिक मदत केली. कृषी केंद्र संचालकांनी औषधी, खत व सरकारी धान्य दुकानदारांनी धान्य देवून माणुसकीचे दर्शन घडविले.

टॅग्स :fireआग