शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

भीषण तापमानाचा पशू-पक्षांना फटका

By admin | Updated: May 24, 2017 02:09 IST

उन्हाळ्यातील वाढत्या भीषण तापमानामुळे मानवासह पशूंचाही जीव धोक्यात आला आहे.

चिमण्यांचा चिवचिवाट गायब : वन्यप्राण्यांचा मृत्यू, पाण्यासाठी भटकंती बी. यू. बोर्डेवार। लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा : उन्हाळ्यातील वाढत्या भीषण तापमानामुळे मानवासह पशूंचाही जीव धोक्यात आला आहे. एकीकडे उष्माघाताने मृत्यू होत आहेत. त्याच वेळी उन्ह लागून वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत. भीषण गरमी सामना जनावरांना करावा लागत आहे. चिमण्या, पाखरे, कावळे आदी पक्षी पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. अंगाची काहिली करणाऱ्या गरमीने जनावरांना त्राही भगवान करून सोडले आहे. पाळीव जनावरे, मोकाट जनावरे रस्त्यावर वाहणारे पाणीदेखील पित आहेत. राजुरा तालुक्याच्या ग्रामीण भागात हेच चित्र दिसत आहे. रस्त्यावर सोडलेले पाणीही पशूंसाठी वरदान ठरत आहे. जंगलातही पाणवठे आटले असल्याने पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा मृत्यू होत आहे. जंगलामध्ये पाणी नसल्याने प्राणी नागरी वस्तीच्या दिशेने धाव घेत आहेत. सोमवारी सकाळी एक चितळ पाण्यासाठी वणवण भटकले. रस्त्यावर आले तरी त्याला पाणी मिळाले नाही. पाण्याअभावी त्याचा मृत्यू झाला. तसेच सकाळी गावात चिवचिव करणाऱ्या चिमण्या व पाखरांचा आवाज थांबला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावेळी तापमानाने कहर केला आहे. चंद्रपूरचा पारा ४६.८ अंशापर्यंत गेला आहे. या तापमानात शेतकरी बैलांना जपण्यासाठी त्यांच्या अंगावर पाणी शिंपडत आहेत. तसेच सायंकाळी गाई-बैल झाडाखाली निवांत बसलेले असतात. मनुष्याची काळजी घेतली जाते. त्याप्रमाणे पशूंचीही काळजी घेणे आवश्यक झाले आहे.