शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आयुधनिर्माणी इतरत्र हलविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2015 01:50 IST

कोळसा खाणीसाठी भद्रावती येथील आयुधनिर्माणी अन्यत्र हलविण्याचा घाट घातला जात आहे.

चंद्रपूर : कोळसा खाणीसाठी भद्रावती येथील आयुधनिर्माणी अन्यत्र हलविण्याचा घाट घातला जात आहे. असे झाल्यास दहा हजार एकरातील जंगलावर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. तसेच ताडोबा अभयारण्यही यामुळे प्रभावित होणार असून जिल्ह्यातील पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. समृद्ध जंगलामुळे पर्यावरणाला अनुकूल असलेला जिल्हा वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रतिकूल बनला आहे. प्रदूषणात चंद्रपूर जिल्ह्याने देशभरात अगदी वरचा क्रमांक पटकाविला. जमिनीखाली असणारा दगडी कोळसा जिल्ह्यासाठी शाप बनत चालला आहे. भद्रावती येथील आयुधनिर्माणी प्रकल्प हा तब्बल सतरा हजार एकरात पसरला आहे. त्यापैकी जवळपास नऊ ते दहा हजार एकरात घनदाट जंगल आहे. एवढेच नव्हे, तर वसाहतीचा काही भाग पूर्णपणे जंगलात आहे. या प्रकल्पाच्या परिसरात सर्वसामान्य जनतेला प्रवेश निशिद्ध असल्याने या परिसरातील जंगलाला संरक्षण प्राप्त झाले आहे. माणसांचा कोणताही धोका नसल्यामुळे येथील जंगलात वन्यप्राण्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. हा प्रकल्प जंगली प्राण्यांसाठी एकप्रकारे वरदान ठरला आहे. या जंगलात पट्टेदार वाघ, बिबटे, अस्वली या मोठ्या प्राण्यांसह सर्वच प्रकारचे प्राणी येथे आढळतात. हा परिसर संरक्षित असल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची वृक्षतोड होत नाही. त्यामुळे या परिसरातील जंगल घनदाट वाढलेले आहे. जिल्ह्यातील पर्यावरणात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या जंगलाला लागूनच पर्यटकांना आकर्षित करणारे ताडोबा अभयारण्य व अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. अशास्थितीत केवळ कोळसा खाणीसाठी हा प्रकल्प हलविल्यास जवळपास दहा एकरांतील जंगल पूर्णत: नष्ट होणार आहे. (शहर प्रतिनिधी)