शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

आयुधनिर्माणी इतरत्र हलविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2015 01:50 IST

कोळसा खाणीसाठी भद्रावती येथील आयुधनिर्माणी अन्यत्र हलविण्याचा घाट घातला जात आहे.

चंद्रपूर : कोळसा खाणीसाठी भद्रावती येथील आयुधनिर्माणी अन्यत्र हलविण्याचा घाट घातला जात आहे. असे झाल्यास दहा हजार एकरातील जंगलावर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. तसेच ताडोबा अभयारण्यही यामुळे प्रभावित होणार असून जिल्ह्यातील पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. समृद्ध जंगलामुळे पर्यावरणाला अनुकूल असलेला जिल्हा वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रतिकूल बनला आहे. प्रदूषणात चंद्रपूर जिल्ह्याने देशभरात अगदी वरचा क्रमांक पटकाविला. जमिनीखाली असणारा दगडी कोळसा जिल्ह्यासाठी शाप बनत चालला आहे. भद्रावती येथील आयुधनिर्माणी प्रकल्प हा तब्बल सतरा हजार एकरात पसरला आहे. त्यापैकी जवळपास नऊ ते दहा हजार एकरात घनदाट जंगल आहे. एवढेच नव्हे, तर वसाहतीचा काही भाग पूर्णपणे जंगलात आहे. या प्रकल्पाच्या परिसरात सर्वसामान्य जनतेला प्रवेश निशिद्ध असल्याने या परिसरातील जंगलाला संरक्षण प्राप्त झाले आहे. माणसांचा कोणताही धोका नसल्यामुळे येथील जंगलात वन्यप्राण्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. हा प्रकल्प जंगली प्राण्यांसाठी एकप्रकारे वरदान ठरला आहे. या जंगलात पट्टेदार वाघ, बिबटे, अस्वली या मोठ्या प्राण्यांसह सर्वच प्रकारचे प्राणी येथे आढळतात. हा परिसर संरक्षित असल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची वृक्षतोड होत नाही. त्यामुळे या परिसरातील जंगल घनदाट वाढलेले आहे. जिल्ह्यातील पर्यावरणात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या जंगलाला लागूनच पर्यटकांना आकर्षित करणारे ताडोबा अभयारण्य व अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. अशास्थितीत केवळ कोळसा खाणीसाठी हा प्रकल्प हलविल्यास जवळपास दहा एकरांतील जंगल पूर्णत: नष्ट होणार आहे. (शहर प्रतिनिधी)