शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

आयुधनिर्माणी इतरत्र हलविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2015 01:50 IST

कोळसा खाणीसाठी भद्रावती येथील आयुधनिर्माणी अन्यत्र हलविण्याचा घाट घातला जात आहे.

चंद्रपूर : कोळसा खाणीसाठी भद्रावती येथील आयुधनिर्माणी अन्यत्र हलविण्याचा घाट घातला जात आहे. असे झाल्यास दहा हजार एकरातील जंगलावर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. तसेच ताडोबा अभयारण्यही यामुळे प्रभावित होणार असून जिल्ह्यातील पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. समृद्ध जंगलामुळे पर्यावरणाला अनुकूल असलेला जिल्हा वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रतिकूल बनला आहे. प्रदूषणात चंद्रपूर जिल्ह्याने देशभरात अगदी वरचा क्रमांक पटकाविला. जमिनीखाली असणारा दगडी कोळसा जिल्ह्यासाठी शाप बनत चालला आहे. भद्रावती येथील आयुधनिर्माणी प्रकल्प हा तब्बल सतरा हजार एकरात पसरला आहे. त्यापैकी जवळपास नऊ ते दहा हजार एकरात घनदाट जंगल आहे. एवढेच नव्हे, तर वसाहतीचा काही भाग पूर्णपणे जंगलात आहे. या प्रकल्पाच्या परिसरात सर्वसामान्य जनतेला प्रवेश निशिद्ध असल्याने या परिसरातील जंगलाला संरक्षण प्राप्त झाले आहे. माणसांचा कोणताही धोका नसल्यामुळे येथील जंगलात वन्यप्राण्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. हा प्रकल्प जंगली प्राण्यांसाठी एकप्रकारे वरदान ठरला आहे. या जंगलात पट्टेदार वाघ, बिबटे, अस्वली या मोठ्या प्राण्यांसह सर्वच प्रकारचे प्राणी येथे आढळतात. हा परिसर संरक्षित असल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची वृक्षतोड होत नाही. त्यामुळे या परिसरातील जंगल घनदाट वाढलेले आहे. जिल्ह्यातील पर्यावरणात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या जंगलाला लागूनच पर्यटकांना आकर्षित करणारे ताडोबा अभयारण्य व अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. अशास्थितीत केवळ कोळसा खाणीसाठी हा प्रकल्प हलविल्यास जवळपास दहा एकरांतील जंगल पूर्णत: नष्ट होणार आहे. (शहर प्रतिनिधी)